शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाला नुकसानीचा ब्रेकअप

By admin | Updated: March 21, 2017 02:03 IST

तालुक्यातील धेरंड-शहापूर येथील रिलायन्सने २०१२ साली कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प गुंडाळला होता. बेकायदा भूसंपादन

आविष्कार देसाई / अलिबागतालुक्यातील धेरंड-शहापूर येथील रिलायन्सने २०१२ साली कोळशावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्प गुंडाळला होता. बेकायदा भूसंपादन करीत काही शेतकऱ्यांची जमीन संपादित केली होती.भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनामार्फत सरकारकडे सुमारे एकरी एक लाख ६५ हजार ७०० रुपये नुकसानभरपाई मागितली. रिलायन्सच्या प्रकल्पामुळे सुमारे २१०० खातेदारांना प्रकल्पाचा फटका बसला होता. त्याअर्थी नुकसानभरपाईचा आकडा हा तब्बल ३४ कोटी ७९ लाख ७० हजार रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.२००६ साली सरकारने एकट्या रायगड जिल्ह्यामध्ये २६ सेझ विशेष आर्थिक क्षेत्र मंजूर केले होते. पैकी धेरंड शहापूर येथे रिलायन्स चार हजार २०० मेगावॉटच्या कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी दिली होती. याच वेळी याच पाच किलोमीटरच्या परिघामध्ये टाटा, पटनी, इस्पात यासह अन्य एका प्रकल्पालाही मंजुरी दिली होती. रिलायन्स आणि टाटा यांचे प्रकल्प तर एकमेकांना खेटूनच होते. विनाशकारी प्रकल्पांना नऊ गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. १८९४ चा भूसंपादन कायदा जमीन संपादनासाठी लावण्यात आला होता.रिलायन्सच्या प्रकल्पासाठी सुमारे दोन हजार १०० खातेदारांची दोन हजार ५०० एकर जमीन संपादित केली जाणार होती. शेतकऱ्यांनी विरोध केल्याने सरकारने बेकायदा भूसंपादनाची प्रक्रिया शेतकऱ्यांवर लादली. त्यामुळे सरकार विरुध्द शेतकरी असा संघर्ष सुरु झाला होता. साम, दाम, दंड, भेद अशा विविध प्रकारच्या क्लृप्त्या शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी आजमावण्यात आल्या. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी नऊ गाव संघर्ष समितीने श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून आंदोलनाचा निर्णय घेतला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. विहित मुदतीमध्ये सरकार जमीन संपादित करू न शकल्याने रिलायन्सला २०१२ साली आपला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी सात बारावरील रिलायन्सचे शिक्के दूर करण्यासाठी यशस्वी आंदोलन केले. बेकायदा लादलेल्या संपादनामुळे प्रकल्प पूर्ण झाला नाही. या पाच वर्षांच्या कालावधीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले होते.त्यामुळे १८९४ भूसंपादन कलम ४८ (२) अन्वये नुकसान भरपाईची मागणी २०१२ सालीच केली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांकडे आर्थिक नुकसानीचे ब्रेक अप मागितले होते. त्यानुसार सोमवारी २०० शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचे ब्रेकअप जिल्हा प्रशासनाला सादर करून एकरी एक लाख ७० हजार रु.ची मागणी केली.