शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

धरणाच्या बाजूचा पूल तयार, मात्र वाहतूक बंदच; स्थानिकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:35 IST

सात आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना मारावा लागतो लांबचा फेरा

नेरळ : मार्च, २०१८ मध्ये कोसळलेला नेरळ गणेशघाट आणि ब्रिटिशकालीन धरण येथील पूल एक महिन्यांपूर्वी तयार झाला आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकली नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाचीवाडी, तसेच आजूबाजूच्या सात वाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी नागरिकांनी कामाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यात नेरळ येथे ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली माथेरानच्या डोंगरातून वाहत येणाºया ओहोळावर असलेला पूल मार्च, २०१८ मध्ये कोसळला होता. तेव्हापासून त्या पुलाचा वापर करणारे नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी, तसेच सात आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे लोक चार किलोमीटरचा फेरा मारून घरी जात आहेत. या पुलाची पुन्हा उभारणी व्हावी, यासाठी नेरळ ग्रामपंचायत आणि स्थानिक रहिवासी दीड वर्षे पाठपुरावा करीत होते. स्थानिकांना पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने करावी लागणारी पायपीट यामुळे कंटाळले असून, त्यांना मोहाचीवाडी गावातून कल्याण रस्त्याने येऊन नेरळ बाजारपेठेत जावे लागत आहे. दोन पावसाळे होत आले असून, पुलाचे काम पूर्ण झाले नाही. तब्बल दोन वेळा पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन नारळ फोडले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊन काळात पुलाचे बांधकाम सुरू झाले, पण चार महिने होऊनही पुलाचे काम अपूर्णच आहे. त्यात मागील दीड महिन्यांपूर्वी पुलावरील स्लॅब टाकून झाला असून, पुलावरून वाहतूक मात्र सुरू केलेली नाही. दोन्ही बाजूला असलेला रस्ता जोडण्याचे काम जेमतेम दोन दिवसांत पूर्ण होणारे आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे पुलाच्या दोन्ही बाजू जोडल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही.

परिणामी मोहाचीवाडीपासून सात आदिवासी वाडीमधील लोकांना पुलाअभावी चार किलोमीटरचा फेरा मारून घरी किंवा बाजारपेठेत यावे लागते आहे. मानवाधिकार आयोगाचे गोरख शेप यांनी गेली दोन वर्षे या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला असून, त्यांनी मोहाचीवाडी ग्रामस्थ आणि आदिवासी लोकांना एकत्र करीत रायगड जिल्हा परिषदेत जाऊन पुलाच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी करीत होते.पुलाच्या कामासाठी४० लाखांचा निधीनेरळ विकास प्राधिकरणकडून या पुलाच्या कामासाठी ४० लाखांचा निधी प्राप्त झाला होता आणि त्या निधीमधून पुलाचे काम पूर्ण केले जात आहे. मात्र, दोन्ही बाजू जोडण्याचे काम चार दिवसांत झाले, तर मोहाचीवाडी आणि पुलाचा वापर करीत असलेल्या आदिवासी वाड्यांना नेरळ गावात येणे सोयीचे होऊ शकते. याबाबत नेरळ विकास प्राधिकरणकडे माहिती घेतली असता, प्राधिकरणचे शाखा अभियंता नाही? याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत.