शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

धरणाच्या बाजूचा पूल तयार, मात्र वाहतूक बंदच; स्थानिकांची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 23:35 IST

सात आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना मारावा लागतो लांबचा फेरा

नेरळ : मार्च, २०१८ मध्ये कोसळलेला नेरळ गणेशघाट आणि ब्रिटिशकालीन धरण येथील पूल एक महिन्यांपूर्वी तयार झाला आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे या पुलावरून वाहतूक सुरू होऊ शकली नाही. नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील मोहाचीवाडी, तसेच आजूबाजूच्या सात वाड्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी नागरिकांनी कामाच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यात नेरळ येथे ब्रिटिशकालीन धरणाच्या खाली माथेरानच्या डोंगरातून वाहत येणाºया ओहोळावर असलेला पूल मार्च, २०१८ मध्ये कोसळला होता. तेव्हापासून त्या पुलाचा वापर करणारे नेरळ ग्रामपंचायतीमधील मोहाचीवाडी, तसेच सात आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे लोक चार किलोमीटरचा फेरा मारून घरी जात आहेत. या पुलाची पुन्हा उभारणी व्हावी, यासाठी नेरळ ग्रामपंचायत आणि स्थानिक रहिवासी दीड वर्षे पाठपुरावा करीत होते. स्थानिकांना पुलावरून होणारी वाहतूक बंद झाल्याने करावी लागणारी पायपीट यामुळे कंटाळले असून, त्यांना मोहाचीवाडी गावातून कल्याण रस्त्याने येऊन नेरळ बाजारपेठेत जावे लागत आहे. दोन पावसाळे होत आले असून, पुलाचे काम पूर्ण झाले नाही. तब्बल दोन वेळा पुलाच्या कामाचे भूमिपूजन होऊन नारळ फोडले गेले आहेत. मात्र, लॉकडाऊन काळात पुलाचे बांधकाम सुरू झाले, पण चार महिने होऊनही पुलाचे काम अपूर्णच आहे. त्यात मागील दीड महिन्यांपूर्वी पुलावरील स्लॅब टाकून झाला असून, पुलावरून वाहतूक मात्र सुरू केलेली नाही. दोन्ही बाजूला असलेला रस्ता जोडण्याचे काम जेमतेम दोन दिवसांत पूर्ण होणारे आहे. मात्र, ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे पुलाच्या दोन्ही बाजू जोडल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळे पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही.

परिणामी मोहाचीवाडीपासून सात आदिवासी वाडीमधील लोकांना पुलाअभावी चार किलोमीटरचा फेरा मारून घरी किंवा बाजारपेठेत यावे लागते आहे. मानवाधिकार आयोगाचे गोरख शेप यांनी गेली दोन वर्षे या पुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला असून, त्यांनी मोहाचीवाडी ग्रामस्थ आणि आदिवासी लोकांना एकत्र करीत रायगड जिल्हा परिषदेत जाऊन पुलाच्या कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी करीत होते.पुलाच्या कामासाठी४० लाखांचा निधीनेरळ विकास प्राधिकरणकडून या पुलाच्या कामासाठी ४० लाखांचा निधी प्राप्त झाला होता आणि त्या निधीमधून पुलाचे काम पूर्ण केले जात आहे. मात्र, दोन्ही बाजू जोडण्याचे काम चार दिवसांत झाले, तर मोहाचीवाडी आणि पुलाचा वापर करीत असलेल्या आदिवासी वाड्यांना नेरळ गावात येणे सोयीचे होऊ शकते. याबाबत नेरळ विकास प्राधिकरणकडे माहिती घेतली असता, प्राधिकरणचे शाखा अभियंता नाही? याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत.