शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

दाेन चिमुकल्यांना पाेलादपूर पाेलिसांनी दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 1:13 AM

घरच्यांची आठवण आल्याने मुंबईला निघाले चालत

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : महाबळेश्वर येथील एका अनाथाश्रमातील दाेन लहान मुले पायी प्रवास करत निघाले हाेते. पाेलादपूरमार्गावरील वाहनांना हात करून थांबण्याची विनंती करत हाेते. याची माहिती पाेलादपूर पाेलिसांना मिळताच त्यांनी पाेलादपूर रस्त्यावरील मुलांंचा शाेध घेऊन त्या चिमुकल्यांना पाेलीस ठाण्यात आणले, तेव्हा धक्कादायक बाब समाेर आली. दाेन चिमुकल्यांना घरच्यांची आठवण आल्याने त्यांनी घरचा रस्ता धरला हाेता.

११ जानेवारी रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यातील बीटमार्शल गणेश किर्वे आणि हाेमगार्ड विकी कापडेकर हे पेट्राेलिंग करत हाेते. पोलादपूर बसस्थानकाजवळील रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने त्यांना माहिती दिली की, मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने दाेन लहान मुले चालत जात आहेत. तसेच ते वाहनांना हात करत थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती मिळताच किर्वे आणि कापडेकर हे या मुलांचा शोध घेण्याकरिता निघाले. तेव्हा त्यांना ग्रामीण रुग्णालय पोलादपूरजवळ दोन लहान मुले दिसली. किर्वे आणि कापडेकर यांनी मुलांच्या जवळ जाऊन विचारपूस केली. आम्ही मुंबईला जात आहाेत, असे त्या दाेन चिमुकल्यांनी सांगितले. साेबत काेणी माेठी व्यक्ती नाही याचा दाेन्ही पाेलिसांना संशय आला. दाेन्ही मुलांंबराेबर गाेड बाेलून त्यांना पाेलीस ठाण्यात आणले.  त्यातील एकाचे नाव आफ्रिदी बद्रूझम शेख (९) आणि दुसऱ्या मुलाने अब्दुल  मेहमूद मेहताब शेख (८) असे सांगितले. मात्र, या व्यतिरिक्त ते काेणतीही माहिती देत नव्हते. त्यानंतर, पाेलिसांना पाेलादपूर येथील सत्तार इस्माईल निगुडकर यांना बाेलवून घेतले. त्यांच्यामार्फत मुलांकडे विचारपूस केली असता त्यांना घरच्यांची आठवण येत असल्याने ते अंजुमन उर्दू यतीमखाना महाबळेश्वर येथून गुपचूप घरी जात होते; परंतु तिकिटाला पैसे नसल्याने ते पायी मुंबईला चालत जात असल्याचे सांगितले. त्यानंतर या मुलांकडे त्यांच्या आईवडिलांचा पत्ता विचारला असता त्यातील आफ्रिदी शेख याने त्याचे वडील बद्रूझम शेख यांचा मोबाइल नंबर दिला. तर अब्दुलने मोबाइल नंबर आणि मुंबई सेंट्रल येथे राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव, पाेलीस उपनिरीक्षक अनिल चांदणे, अंमलदार विजय चव्हाण यांनी या मुलांच्या पालकांशी संवाद साधला. त्यानंतर, पालकांच्या म्हणण्याप्रमाणे मुलांना जेवण देऊन अंजुमन उर्दू यतीमखाना महाबळेश्वर, जिल्हा सातारा येथे नेले. तेथील प्राचार्या शबाना शेख आणि त्यांचे पती असद इम्रान इक्बाल शेख यांच्या ताब्यात दिले.

का पळाली मुलं?दाेन्ही मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांनी मुलांना अनाथाश्रमात ठेवले आहे. मुले अनाथाश्रमातून का पळाली, हा विषय महत्त्वाचा आहे. त्या ठिकाणी त्यांना त्रास हाेत आहे का, याची माहिती आम्ही घेत आहाेत, असे पाेलादपूरचे सहायक पाेलीस निरीक्षक प्रशांत जाधव यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड