शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

चक्रिवादळ निवारण प्रकल्प प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 02:26 IST

कोकण विभागातील अलिबाग (रायगड), रत्नागिरी आणि सातपाटी (पालघर) येथे ३७९ कोटी ८५ लाख रुपये खर्चांचा राष्ट्रीय चक्रि वादळ धोके निवारण प्रकल्प प्रगतिपथावर आहे.

अलिबाग : कोकण विभागातील अलिबाग (रायगड), रत्नागिरी आणि सातपाटी (पालघर) येथे ३७९ कोटी ८५ लाख रुपये खर्चांचा राष्ट्रीय चक्रि वादळ धोके निवारण प्रकल्प प्रगतिपथावर आहे. याअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने करावयाच्या रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित कामांचा आढावा गुरुवारी जागतिक बँकेच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.राष्ट्रीय चक्रि वादळ धोके निवारण प्रकल्पात राज्यातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांचा व जिल्ह्यांचा समावेश आहे. यात कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सातपाटी या ठिकाणी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. या संबंधित शहरात भूमिगत विद्युत वितरण प्रणाली, खार बंधारे बांधणे आणि बहु उद्देशीय चक्रि वादळ निवारा केंद्र उभारणे, या कामांचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील किहिम, श्रीवर्धन तालुक्यातील दिघी, मुरुड तालुक्यातील बोर्ली या तीन ठिकाणी बहुउद्देशीय चक्रि वादळ निवारा केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत.बैठकीस राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहसचिव अरु ण उन्हाळे, अवर सचिव श्रीरंग घोलप, जागतिक बँक आढावा पथकाचे प्रमुख एम. ए. दशरक्षी, वेंकटक विनोदकुमार गौतम, आशिष बोधले, पी. गोपाल कृष्णन, शिरीष कुलकर्णी, सी. एम. मिश्रा, एस. पी. स्वामी, एम. ए. भोसले, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे उपअभियंता एस. जे. शिरसाठ, महावितरणचे अभियंता माणिकलाल तपासे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.अलिबाग तालुक्यात काचळी पिटकरी, फणसापूर-कुर्डूस, पेण तालुक्यात नारवेल बेनवले, मोराकोठा, कोकेरी आणि मुरुड तालुक्यात नांदगाव-माझगाव या ठिकाणी खारभूमी बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे.अलिबाग शहर, वरसोली, चेंढरेसह येथील विद्युत वितरण प्रणाली भूमिगत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.बहुउद्देशीय चक्रिवादळ निवारा केंद्र उभारण्यासाठी जागांची मोजणी करून रेखांकन करणे, आवश्यक प्रमाणपत्रे मिळवणे, खार बंधाºयांसाठी शेतकºयांची संमतीपत्रे प्राप्त करणे आदी कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर करावीत, असे निर्देश जागतिक बँक आढावा पथकाने या वेळी दिले आहेत.>भूमिगत विद्युत वितरण प्रणाली नियोजनात प्रभावी उपाययोजनाराष्ट्रीय चक्रि वादळ धोके निवारण प्रकल्पात राज्यातील समुद्रकिनारी असलेल्या शहरांचा व जिल्ह्यांचा समावेश आहे. यात कोकणातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सातपाटी या ठिकाणी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकणात सर्वत्र आजही लोखंडी खांबांवरून वीजवाहक तारांचे जाळे आहे.चक्रिवादळ जरी नसले तरी पावसाळ््याच्या दिवसांत कोकणातील नारळाचे झाप वा नारळाची झाडे जोरदार पावसामुळे तुटून खाली पडतात, त्या वेळी खाबांवरील वीजवाहक तारा तुटून अपघात होणे, त्यात मानवीहानी होणे आणि त्याचबरोबर प्रदीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहून जनजीवन विस्कळीत होणे, अत्यावश्यक सेवा विजेअभावी बंद पडणे, अशा समस्यांना सातत्याने सामोरे जावे लागते. या समस्येवर मात करण्याकरिता शहरात भूमिगत विद्युत वितरण प्रणाली कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.>सुरेक्षेसाठी बहुउद्देशीय चक्रि वादळ निवारा केंद्रसागरीकिनारपट्टीतील त्सुनामी, ओखी वा तत्सम वादळे व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोठ्या गंभीर परिस्थितीस किनारी भागातील लोकांना सामोरे जावे लागते. किनारी भागातील मच्छीमार बांधवांच्या निवाºयांची तत्कालिक व्यवस्था अशा वेळी सत्वर करावी लागते. मात्र, चक्रिवादळे वा तत्सम नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना या किनारी भागातील लोकांना देणे शक्य झाले आणि अशा परिस्थितीचा मुकाबला करण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले. तर सर्व प्रथम मानवीहानी टाळता येऊ शकते आणि तद्नंतर वित्तीयहानीही टाळणे शक्य होऊ शकते, असा अनुभव केंद्रीय आपत्ती निवारण यंत्रणेचा आहे. याच अनुभवातून बहुउद्देशीयचक्रि वादळ निवारा केंद्रांची संकल्पना पुढे आली आहे.>कोकणातील भौगोलिक परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळीसागरकिनाºयावरील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांच्या किनारी भागातील भौगोलिक परिस्थिती मध्य व उत्तर भारतातील भौगोलिक परिस्थितीपेक्षा खूपच निराळी आहे.परिणामी, संपूर्ण देशाचे आपत्ती निवारण विषयक केलेले नियोजन किनारी भागातील आपत्तींच्या वेळी मुकाबला करताना अपुरे पडते, याची प्रचिती आजवरच्या विविध सागरी व नैसर्गिक वादळे व आपत्तीच्या वेळी आल्यानंतर सागरी किनारपट्टीच्या राज्यांकरिता स्वतंत्र आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीयचक्रि वादळ धोके निवारण प्रकल्प हा विशेष महत्त्वाकांक्षी प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने हाती घेतला.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात असल्याने, तसेच महाराष्ट्रालाही सागरकिनारा असल्याने महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीकरिता राष्ट्रीय चक्रि वादळ धोके निवारण प्रकल्प हा लागू करण्यात आला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे, याचा यामध्ये प्रामुख्याने विचार केला आहे.