शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:37 IST

उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता.

मधुकर ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : निसर्ग चक्रीवादळाने उरणमध्ये चांगलाच तडाखा दिला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या उरण तालुक्यातील अनेक गावांमधील रहिवाशांच्या घरांचे पत्रे हवेतच उडून गेले तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळून पडली आहेत. मंगळवारपासूनच दहशतीचे सावट घेऊन आलेले निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी रायगड जिल्ह्यातील अलिबागला धडकले.ताशी सागरी ४० ते ५० नॉटिकल मैलाने रायगडात दाखल झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील अनेक भागांबरोबरच उरणलाही चांगलाच तडाखा दिला.घारापुरी, मोरा, पीरवाडी, करंजा, नागाव, बांधपाडा, आवरे, कडापे आणि अन्य गावांतील अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. तर अनेक घरांवर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरच झाडे कोसळून रहदारी ठप्प झाली होती.उरणमध्ये शेकडो घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.घरांचे पत्रे उडाल्याने आणि पडझड झाल्याने अनेक कुटुंबांतील लोकांना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात भिजतच रात्र काढावी लागणार आहे.

उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, खबरदारी म्हणून उरण किनारपट्टीवरील गावांतील १८०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.यापैकी ५०० नागरिकांना शाळेत तर उर्वरितांना त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.महाडमध्ये महामार्ग झाला ठप्प, गावांत भीतीचे वातावरणसिकंदर अनवारे।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण महाडमध्ये सोसाट्याच्या वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली; त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महाड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महाड तालुक्यात दुपारी बारानंतर वाºयाचा वेग वाढला. त्यामुळे संपूर्ण महाडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी तालुक्यातील जवळपास संपूर्ण गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली. अनेक घरांवर झाडे कोसळल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. या चक्रीवादळाने तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दोन दिवस अंधारात राहावे लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरदेखील अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने महामार्गही काही काळ ठप्प झाला होता.जोरदार वारा, आवाजाचा लोकांनी घेतला धसकासंजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : बुधवार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी ११ पासून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. हळूहळू वाºयाचा वेग व पावसाचा वेगही वाढल्याने समस्त जनता भयग्रस्त झाली. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून समुद्रकिनारी असणाºया लोकांना मराठी शाळा क्रमांक १ अंजुमन हायस्कूल शिंपी समाज मंदिर माळी समाज हॉल व कालभैरव मंदिर आदी ठिकाणी ठेवण्यात आले. वाºयाचा वेग एवढा जबरदस्त होता की सिमेंट काँक्रिटचे पत्रे, लोखंडी पत्रे रस्त्यावर येऊन पडले. समुद्रकिनारी वाºयाचा वेग जास्त असल्याने लाटा किनाºयाला मोठ्या स्वरूपात धडकत होत्या. नारळाची उंच उंच झाडे प्रचंड वाºयामुळे जोराने हलत होती. वारा जास्त असल्याने समुद्रकिनारी जाणे मोठे कठीण झाले होते. वाºयाच्या वेगामुळे घरावरील पत्रे फटाक्याच्या आवाजाप्रमाणे गर्जत होते. त्यामुळे एकंदर भीतीदायक वातावरण होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ