शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

चक्रीवादळाचा जोरदार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:37 IST

उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता.

मधुकर ठाकूर।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : निसर्ग चक्रीवादळाने उरणमध्ये चांगलाच तडाखा दिला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या उरण तालुक्यातील अनेक गावांमधील रहिवाशांच्या घरांचे पत्रे हवेतच उडून गेले तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे कोसळून पडली आहेत. मंगळवारपासूनच दहशतीचे सावट घेऊन आलेले निसर्ग चक्रीवादळ हे बुधवारी रायगड जिल्ह्यातील अलिबागला धडकले.ताशी सागरी ४० ते ५० नॉटिकल मैलाने रायगडात दाखल झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यातील अनेक भागांबरोबरच उरणलाही चांगलाच तडाखा दिला.घारापुरी, मोरा, पीरवाडी, करंजा, नागाव, बांधपाडा, आवरे, कडापे आणि अन्य गावांतील अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडाले आहेत. तर अनेक घरांवर झाडे कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी रस्त्यांवरच झाडे कोसळून रहदारी ठप्प झाली होती.उरणमध्ये शेकडो घरांचे पत्रे, कौले उडाली आहेत. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.घरांचे पत्रे उडाल्याने आणि पडझड झाल्याने अनेक कुटुंबांतील लोकांना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात भिजतच रात्र काढावी लागणार आहे.

उरणमधील अनेक गावांमधील वीजपुरवठा सकाळपासूनच खंडित झाला होता. संध्याकाळपर्यंत तरी खंडित वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आलेला नव्हता. दरम्यान, खबरदारी म्हणून उरण किनारपट्टीवरील गावांतील १८०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.यापैकी ५०० नागरिकांना शाळेत तर उर्वरितांना त्यांच्या नातेवाइकांकडे ठेवण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.महाडमध्ये महामार्ग झाला ठप्प, गावांत भीतीचे वातावरणसिकंदर अनवारे।लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : बुधवारी सकाळपासूनच संपूर्ण महाडमध्ये सोसाट्याच्या वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली; त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महाड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.महाड तालुक्यात दुपारी बारानंतर वाºयाचा वेग वाढला. त्यामुळे संपूर्ण महाडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी तालुक्यातील जवळपास संपूर्ण गावांमध्ये अनेक घरांची छपरे उडाली. अनेक घरांवर झाडे कोसळल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले. या चक्रीवादळाने तालुक्यातील अनेक ठिकाणी विजेचे खांब जमीनदोस्त केले आहेत. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांना दोन दिवस अंधारात राहावे लागणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरदेखील अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने महामार्गही काही काळ ठप्प झाला होता.जोरदार वारा, आवाजाचा लोकांनी घेतला धसकासंजय करडे।लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : बुधवार सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली व सकाळी ११ पासून जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. हळूहळू वाºयाचा वेग व पावसाचा वेगही वाढल्याने समस्त जनता भयग्रस्त झाली. प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून समुद्रकिनारी असणाºया लोकांना मराठी शाळा क्रमांक १ अंजुमन हायस्कूल शिंपी समाज मंदिर माळी समाज हॉल व कालभैरव मंदिर आदी ठिकाणी ठेवण्यात आले. वाºयाचा वेग एवढा जबरदस्त होता की सिमेंट काँक्रिटचे पत्रे, लोखंडी पत्रे रस्त्यावर येऊन पडले. समुद्रकिनारी वाºयाचा वेग जास्त असल्याने लाटा किनाºयाला मोठ्या स्वरूपात धडकत होत्या. नारळाची उंच उंच झाडे प्रचंड वाºयामुळे जोराने हलत होती. वारा जास्त असल्याने समुद्रकिनारी जाणे मोठे कठीण झाले होते. वाºयाच्या वेगामुळे घरावरील पत्रे फटाक्याच्या आवाजाप्रमाणे गर्जत होते. त्यामुळे एकंदर भीतीदायक वातावरण होते.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ