शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:22 IST

पावसाच्या भीतीने चिंता

विजय मांडेलोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र कशेळे येथील आदिवासी क्षेत्रातील भात खरेदी केंद्र आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. यंदा कशेळे आणि नेरळ हमीभाव भात खरेदी केंद्र बंद असल्याने, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जत भात खरेदी केंद्रावर गर्दी केल्याने या केंद्रावरील कामाचा ताण वाढला आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता, तसाच उघड्यावर पडून आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने भात भिजते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

भात खरेदी केंद्रावर भात आणून ठेवले आहे, पण खरेदीसाठी आपला नंबर लागतो की नाही? या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र, बदलत्या शासन निर्णयानुसार आता गोदाम हवे असल्यास, भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागेल. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. यापूर्वी नेरळ केंद्राला शासनाने उपलब्ध करून दिलेले गोदाम परत घेतले आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणाऱ्या बारदानाची कमतरता आहे. या कारणाने दोन्ही केंद्र बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले. थोडक्यात, शासनाच्या या बदलत्या निर्णयाचा फटका भात खरेदी केंद्रांना बसला आहे. कोरोनाच्या काळात शासनाने मोठ्या प्रमाणात धान्याचे वाटप केले. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता हमीभाव मिळावा, यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. 

तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने, कर्जतच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे, तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. - केतन खडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री केंद्र

कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने, दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्याचा काटा होतो. अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा.                                    -दशरथ मुने, शेतकरी