शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:22 IST

पावसाच्या भीतीने चिंता

विजय मांडेलोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र कशेळे येथील आदिवासी क्षेत्रातील भात खरेदी केंद्र आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. यंदा कशेळे आणि नेरळ हमीभाव भात खरेदी केंद्र बंद असल्याने, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जत भात खरेदी केंद्रावर गर्दी केल्याने या केंद्रावरील कामाचा ताण वाढला आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता, तसाच उघड्यावर पडून आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने भात भिजते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

भात खरेदी केंद्रावर भात आणून ठेवले आहे, पण खरेदीसाठी आपला नंबर लागतो की नाही? या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र, बदलत्या शासन निर्णयानुसार आता गोदाम हवे असल्यास, भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागेल. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. यापूर्वी नेरळ केंद्राला शासनाने उपलब्ध करून दिलेले गोदाम परत घेतले आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणाऱ्या बारदानाची कमतरता आहे. या कारणाने दोन्ही केंद्र बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले. थोडक्यात, शासनाच्या या बदलत्या निर्णयाचा फटका भात खरेदी केंद्रांना बसला आहे. कोरोनाच्या काळात शासनाने मोठ्या प्रमाणात धान्याचे वाटप केले. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता हमीभाव मिळावा, यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. 

तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने, कर्जतच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे, तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. - केतन खडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री केंद्र

कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने, दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्याचा काटा होतो. अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा.                                    -दशरथ मुने, शेतकरी