शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांची कर्जतच्या भात खरेदी केंद्रावर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 00:22 IST

पावसाच्या भीतीने चिंता

विजय मांडेलोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : तालुक्यात शेतकरी सहकारी खरेदी-विक्री केंद्र कशेळे येथील आदिवासी क्षेत्रातील भात खरेदी केंद्र आणि नेरळ अशी तीन हमीभाव भात खरेदी केंद्र आहेत. यंदा कशेळे आणि नेरळ हमीभाव भात खरेदी केंद्र बंद असल्याने, तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी कर्जत भात खरेदी केंद्रावर गर्दी केल्याने या केंद्रावरील कामाचा ताण वाढला आहे. मोठ्या प्रमाणात भात खरेदी करून ठेवण्यास गोदामे अपुरी पडत असल्याने भात खरेदीला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रासमोर शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल भात खरेदी न होता, तसाच उघड्यावर पडून आहे. त्यातच पावसाची शक्यता असल्याने भात भिजते की काय? अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

भात खरेदी केंद्रावर भात आणून ठेवले आहे, पण खरेदीसाठी आपला नंबर लागतो की नाही? या विवंचनेत शेतकरी असून अचानक पाऊस आल्यास भाताचे नुकसान होण्याची भीतीही शेतकऱ्यांना सतावत आहे. यापूर्वी भात खरेदी केंद्राला शासनाकडून अतिरिक्त गोदामांची सोय केली जात होती. गोदामांच्या भाड्याचा भार शासन उचलत असे. मात्र, बदलत्या शासन निर्णयानुसार आता गोदाम हवे असल्यास, भात खरेदी केंद्रालाच स्वतः सोय करावी लागेल. शासन गोदामाचे भाडे देणार नसल्याने आर्थिकदृष्ट्या भात खरेदी केंद्राला हे परवडणारे नसल्याने नेरळ भात खरेदी केंद्र बंद आहे. यापूर्वी नेरळ केंद्राला शासनाने उपलब्ध करून दिलेले गोदाम परत घेतले आहे. कशेळे केंद्रात खरेदी केलेले भात ठेवण्यासाठी लागणाऱ्या बारदानाची कमतरता आहे. या कारणाने दोन्ही केंद्र बंद असल्याचे कर्जत भात खरेदी केंद्रांचे व्यवस्थापक केतन खडे यांनी सांगितले. थोडक्यात, शासनाच्या या बदलत्या निर्णयाचा फटका भात खरेदी केंद्रांना बसला आहे. कोरोनाच्या काळात शासनाने मोठ्या प्रमाणात धान्याचे वाटप केले. यामुळे बहुतांश शेतकरी आपल्याकडील सर्वच भात घरी न ठेवता हमीभाव मिळावा, यासाठी खरेदी केंद्रावर आणत आहेत. 

तालुक्यातील अन्य दोन्ही भात खरेदी केंद्र बंद असल्याने, कर्जतच्या केंद्रावर गर्दी वाढली आहे, तसेच शासनाच्या बदलत्या निर्णयामुळे गोदाम मिळण्यास अडचण येत आहे. - केतन खडे, व्यवस्थापक, खरेदी विक्री केंद्र

कर्जत भात खरेदी केंद्रावर कामगारांची कमतरता असल्याने, दिवसाला जेमतेम चारशे ते साडेचारशे पोत्याचा काटा होतो. अतिरिक्त गोदामांची सोय उपलब्ध करून सर्व शेतकऱ्यांचा भात खरेदी करावा.                                    -दशरथ मुने, शेतकरी