शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

गणेश पंचायतन मंदिरात गर्दी

By admin | Updated: February 1, 2017 00:34 IST

समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे

अलिबाग : समुद्रातील कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन प्राचीन आणि राज्यातील एकमेव अशा गणेश पंचायत मंदिरात माघ शुद्ध विनायकी चतुर्थी श्री गणेश जयंती माघी गणेशोत्सवाचे मंगळवारी प्रतिवर्षीप्रमाणे कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजन केले होते. नवसाला पावणारे आणि मनोकामना पूर्ण करणारे हे गणेश पंचायतन असल्याची मोठी श्रद्धा भाविकांमध्ये असल्याने राज्यभरातून भाविक दर्शनाकरिता आले होते. नवस फेडण्याकरिता भाविकांनी सोमवारी रात्रीच किल्ल्यात मुक्कामास येवून पहाटे पाच वाजता महापूजा झाल्यावर गणेश पंचायतनचे दर्शन घेवून आपले नवस फेडले. कुलाबा किल्ला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अलिबाग शहरातील दानशूरांच्या सहयोगातून येथे दरवर्षी येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद (भोजन) देण्याचा उपक्रम करते. कोळी समाज आणि शहरातील सुमारे २५० भाविक हा महाप्रसाद गणेश सेवा या भावनेतून तयार करीत असतात. यंदा ५० हजारपेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती मंडळाचे सदस्य बाळाराम भगत यांनी दिली.अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आंग्रेकालीन ‘गणेश पंचायतन’ मंदिर अलिबागच्या समुद्रातील कुलाबा किल्ल्यात आहे. किल्ल्यातील पोखरणीच्या (तलावाच्या) पश्चिमेस हे गणेश मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी दगडी चौथऱ्यावर उजव्या सोंडेचा श्री सिद्धिविनायक गणपती, पुढील बाजूस डावीकडे ‘सांब’ तर उजवीकडे ‘विष्णू’ आणि मागील बाजूस डावीकडे ‘सूर्य’ तर उजवीकडे ‘देवी’ अशा एकूण पाच मूर्तींच्या या समूहास गणेश पंचायतन असे संबोधले जाते. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर थोरल्या राघोजी आंग्रे यांनी बांधले. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कार्तिकस्वामी व उजव्या बाजूस गणपतीची प्रतिमा आहे. मंदिराचे सभागृहसुद्धा अष्टकोनी असून येथे आल्यावर भाविकांना एक आगळी शांती प्राप्त होत असल्याचे दर्शनास आलेल्या काही भाविकांनीच सांगितले. अलिबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी बंदोबस्त उपलब्ध करुन दिला होता. (विशेष प्रतिनिधी)वरदविनायकाच्या जन्मोत्सवासाठी भाविकांची गर्दीवावोशी : महड येथील गणपती मंदिरात श्री वरदविनायकाचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी श्री गणपती संस्थान महडचे विश्वस्त सिद्धार्थ विनायक जोशी यांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली, तर पुणे येथील कपणाने यांचे सुश्राव्य असे कीर्तन पार पडले. गणेश जन्मानंतर नवसाचा नारळ घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळत होते. मंदिरामध्ये काढलेली आकर्षक रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. वरद विनायक फूल रांगोळी मंडळ यांनी रांगोळी साकारली होती. रांगोळी काढण्यासाठी १५० किलो फुलांचा वापर करण्यात आला. ही रांगोळी काढण्यासाठी वीस तास लागले. दर्शनरांग दोन किमीपेक्षा लांब गेली होती.