शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:23 IST

दीड हजार गावांमधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीला फटका

पाली : ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दीड हजार गावामधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अतिवृष्टीने उभे पीक शेतात आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी, येथील शेतकºयांच्या हाता-तोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर व व्याकूळ झाला आहे.

यंदा पावसाने बºयापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पीक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरूही झाले होते. मात्र, पावसामुळे शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे शिकार होत असल्याने सरकारने आधार देणे गरजेचे आहे, असे बाळाराम काटकर या शेतकºयाने सांगितले.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला तरच आपल्या सर्वांना जगता येईल. अन्यथा भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल,अशा प्रकारे शेतकºयांना फटका बसत असल्याने मोठी चिंता वाढली आहे, असे शरद गोळे या शेतकºयाने सांगितले.दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.१ सप्टेंबर, २०१९च्या शासन निर्णयानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.तालुक्यातील भाताची रोपे पावसाने दडी मारल्याने उगवली नव्हती. त्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून कले होते. मात्र, अद्याप त्या सर्व शेतकºयांना शासनाची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या पावसाने शेतीचे झालेले नुकसानीबद्दल पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील नुकसान भरपाई मिळाली नाही. आताच्या नुकसानीची मोजदाद कधी होणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

कर्जत तालुक्यातील भाताची शेती हे तालुक्यातील अर्ध्या भागातील लोकांचे उदरनिवाहाचे साधन आहे. पावसाळी शेती करणाºया शेतकºयांना जून २०१९ मध्ये जमिनीत भाताचे रोप टाकले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकून गेली होती. त्यात शेतकºयांनी मोठी रक्कम मोजून बियाणे खरेदी केली होती. बियाणे शेतातून बाहेर पडले नाही. त्यामुळे बियाणे नव्याने खरेदी करण्याची वेळ आली होती. जुलै महिन्यात अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहून आजूबाजूच्या शेतात गेली होती. त्यामुळे देखील भाताच्या रोपांचे नुकसान झाले होते. त्या बद्दल शासनाने दिलेल्या आदेशाने कर्जत तालुक्यातील तब्बल १,३०० शेतकºयांचे पंचनामे केले गेले. त्यावेळी सर्व शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई केली जाईल, असे वाटले होते. त्याच्यानंतर आता सुरू असलेल्या सरत्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून सरत्या पावसाने आपली उपस्थिती लावल्याने भाताचे पीक खराब झाले आहे. भाताचे पीक काही ठिकाणी शेतात कापून ठेवले आहे तर काही ठिकाणी ते उभे असून सुकल्याने काळपट पडू लागले आहे. तर काही ठिकाणी शेतात कोसळलेले भाताचे पीक शेतात पावसाचे पाणी असल्याने जमिनीवर कुजून जात आहे.