शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:23 IST

दीड हजार गावांमधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीला फटका

पाली : ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दीड हजार गावामधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अतिवृष्टीने उभे पीक शेतात आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी, येथील शेतकºयांच्या हाता-तोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर व व्याकूळ झाला आहे.

यंदा पावसाने बºयापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पीक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरूही झाले होते. मात्र, पावसामुळे शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे शिकार होत असल्याने सरकारने आधार देणे गरजेचे आहे, असे बाळाराम काटकर या शेतकºयाने सांगितले.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला तरच आपल्या सर्वांना जगता येईल. अन्यथा भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल,अशा प्रकारे शेतकºयांना फटका बसत असल्याने मोठी चिंता वाढली आहे, असे शरद गोळे या शेतकºयाने सांगितले.दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.१ सप्टेंबर, २०१९च्या शासन निर्णयानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.तालुक्यातील भाताची रोपे पावसाने दडी मारल्याने उगवली नव्हती. त्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून कले होते. मात्र, अद्याप त्या सर्व शेतकºयांना शासनाची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या पावसाने शेतीचे झालेले नुकसानीबद्दल पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील नुकसान भरपाई मिळाली नाही. आताच्या नुकसानीची मोजदाद कधी होणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

कर्जत तालुक्यातील भाताची शेती हे तालुक्यातील अर्ध्या भागातील लोकांचे उदरनिवाहाचे साधन आहे. पावसाळी शेती करणाºया शेतकºयांना जून २०१९ मध्ये जमिनीत भाताचे रोप टाकले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकून गेली होती. त्यात शेतकºयांनी मोठी रक्कम मोजून बियाणे खरेदी केली होती. बियाणे शेतातून बाहेर पडले नाही. त्यामुळे बियाणे नव्याने खरेदी करण्याची वेळ आली होती. जुलै महिन्यात अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहून आजूबाजूच्या शेतात गेली होती. त्यामुळे देखील भाताच्या रोपांचे नुकसान झाले होते. त्या बद्दल शासनाने दिलेल्या आदेशाने कर्जत तालुक्यातील तब्बल १,३०० शेतकºयांचे पंचनामे केले गेले. त्यावेळी सर्व शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई केली जाईल, असे वाटले होते. त्याच्यानंतर आता सुरू असलेल्या सरत्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून सरत्या पावसाने आपली उपस्थिती लावल्याने भाताचे पीक खराब झाले आहे. भाताचे पीक काही ठिकाणी शेतात कापून ठेवले आहे तर काही ठिकाणी ते उभे असून सुकल्याने काळपट पडू लागले आहे. तर काही ठिकाणी शेतात कोसळलेले भाताचे पीक शेतात पावसाचे पाणी असल्याने जमिनीवर कुजून जात आहे.