शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकाचे नुकसान; शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 23:23 IST

दीड हजार गावांमधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीला फटका

पाली : ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले असून, शेतकरी व्याकूळ झाला आहे. सरकारने सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात दीड हजार गावामधील १० हजार हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अतिवृष्टीने उभे पीक शेतात आडवे झाले, तर अनेक ठिकाणी कापलेल्या पिकांची नासाडी झाली. परिणामी, येथील शेतकºयांच्या हाता-तोंडातील घास गळून पडल्याने शेतकरी चिंतातुर व व्याकूळ झाला आहे.

यंदा पावसाने बºयापैकी कृपादृष्टी ठेवल्याने शेतात चांगलेच पीक बहरले होते. दसरा दिवाळीत शेतकरी भातकापणीचे नियोजन करीत होता. काही ठिकाणी भातकापणीचे जोरात काम सुरूही झाले होते. मात्र, पावसामुळे शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. एके काळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया रायगड जिल्ह्यातील शेती व शेतकरी सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे शिकार होत असल्याने सरकारने आधार देणे गरजेचे आहे, असे बाळाराम काटकर या शेतकºयाने सांगितले.

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी जगला तरच आपल्या सर्वांना जगता येईल. अन्यथा भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल,अशा प्रकारे शेतकºयांना फटका बसत असल्याने मोठी चिंता वाढली आहे, असे शरद गोळे या शेतकºयाने सांगितले.दरम्यान, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाने भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.१ सप्टेंबर, २०१९च्या शासन निर्णयानुसार पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले.तालुक्यातील भाताची रोपे पावसाने दडी मारल्याने उगवली नव्हती. त्या नुकसानीचे पंचनामे शासनाकडून कले होते. मात्र, अद्याप त्या सर्व शेतकºयांना शासनाची मदत मिळाली नाही, तर दुसरीकडे शासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरत्या पावसाने शेतीचे झालेले नुकसानीबद्दल पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मागील नुकसान भरपाई मिळाली नाही. आताच्या नुकसानीची मोजदाद कधी होणार? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

कर्जत तालुक्यातील भाताची शेती हे तालुक्यातील अर्ध्या भागातील लोकांचे उदरनिवाहाचे साधन आहे. पावसाळी शेती करणाºया शेतकºयांना जून २०१९ मध्ये जमिनीत भाताचे रोप टाकले होते. मात्र, पावसाने दडी मारल्याने भाताची रोपे सुकून गेली होती. त्यात शेतकºयांनी मोठी रक्कम मोजून बियाणे खरेदी केली होती. बियाणे शेतातून बाहेर पडले नाही. त्यामुळे बियाणे नव्याने खरेदी करण्याची वेळ आली होती. जुलै महिन्यात अचानक झालेल्या पावसामुळे रस्ते वाहून आजूबाजूच्या शेतात गेली होती. त्यामुळे देखील भाताच्या रोपांचे नुकसान झाले होते. त्या बद्दल शासनाने दिलेल्या आदेशाने कर्जत तालुक्यातील तब्बल १,३०० शेतकºयांचे पंचनामे केले गेले. त्यावेळी सर्व शेतकºयांना तात्काळ नुकसान भरपाई केली जाईल, असे वाटले होते. त्याच्यानंतर आता सुरू असलेल्या सरत्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून सरत्या पावसाने आपली उपस्थिती लावल्याने भाताचे पीक खराब झाले आहे. भाताचे पीक काही ठिकाणी शेतात कापून ठेवले आहे तर काही ठिकाणी ते उभे असून सुकल्याने काळपट पडू लागले आहे. तर काही ठिकाणी शेतात कोसळलेले भाताचे पीक शेतात पावसाचे पाणी असल्याने जमिनीवर कुजून जात आहे.