शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

By admin | Updated: April 27, 2017 00:04 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते.या आधी १५ उमेदवारांनी अलिबागच्या सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. दोन्ही यंत्रणांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ७ मे रोजी पार पडणार आहे. एकूण २१ सदस्य या महासंघात निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या नुकतीच पार पडली होती. गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक हे वेगवेगळ्या मतदार संघातील दिले होते. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे.महासंघाच्या उपविधी १:१ नुसार निवडणुकीकरिता संचालक मंडळाचे जे विभाग केलेले आहेत. ते विभाग म्हणजे मतदार संघ नाहीत, तसेच निवडून द्यावयाच्या सर्व जागांकरिता प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये सूचक, अनुमोदक वेगळ्या मतदार संघातील आहेत या कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आणि सदरचा निर्णय कायम ठेवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निणर्य चुकीचा आहे असा मुद्दा याचिकाकत्यांच्या वकिलांनी याचिकेत केला होता.अलिबागचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी दिलेला निर्णय योग्य तसेच सहकारी कायदा आणि निवडणूक नियमांना धरून आहे, असा युक्तिवाद सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य १४ जणांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सी.जी. गावणेकर यांनी काम पाहिले, तर सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ संपतराव पवार, मुग्धा पाटील यांनी काम पाहिले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून गिरीश तुळपुळे गटाचे महासंघावर असलेले वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)