शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

By admin | Updated: April 27, 2017 00:04 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते.या आधी १५ उमेदवारांनी अलिबागच्या सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. दोन्ही यंत्रणांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ७ मे रोजी पार पडणार आहे. एकूण २१ सदस्य या महासंघात निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या नुकतीच पार पडली होती. गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक हे वेगवेगळ्या मतदार संघातील दिले होते. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे.महासंघाच्या उपविधी १:१ नुसार निवडणुकीकरिता संचालक मंडळाचे जे विभाग केलेले आहेत. ते विभाग म्हणजे मतदार संघ नाहीत, तसेच निवडून द्यावयाच्या सर्व जागांकरिता प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये सूचक, अनुमोदक वेगळ्या मतदार संघातील आहेत या कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आणि सदरचा निर्णय कायम ठेवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निणर्य चुकीचा आहे असा मुद्दा याचिकाकत्यांच्या वकिलांनी याचिकेत केला होता.अलिबागचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी दिलेला निर्णय योग्य तसेच सहकारी कायदा आणि निवडणूक नियमांना धरून आहे, असा युक्तिवाद सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य १४ जणांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सी.जी. गावणेकर यांनी काम पाहिले, तर सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ संपतराव पवार, मुग्धा पाटील यांनी काम पाहिले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून गिरीश तुळपुळे गटाचे महासंघावर असलेले वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)