शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

न्यायालयाने १५ उमेदवारांच्या याचिका फेटाळल्या

By admin | Updated: April 27, 2017 00:04 IST

रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज

अलिबाग : रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांना चांगलाच फटका बसल्याचे बोलले जाते.या आधी १५ उमेदवारांनी अलिबागच्या सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली होती. दोन्ही यंत्रणांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता.रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ७ मे रोजी पार पडणार आहे. एकूण २१ सदस्य या महासंघात निवडून द्यायचे आहेत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रि या नुकतीच पार पडली होती. गिरीश तुळपुळे, बाबूराव भोनकर, अ‍ॅड. नीलिमा पाटील, किशोर जैन यांच्यासह अन्य ११ दिग्गज उमेदवारांनी आपापल्या उमेदवारी अर्जावर सूचक आणि अनुमोदक हे वेगवेगळ्या मतदार संघातील दिले होते. त्याचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे.महासंघाच्या उपविधी १:१ नुसार निवडणुकीकरिता संचालक मंडळाचे जे विभाग केलेले आहेत. ते विभाग म्हणजे मतदार संघ नाहीत, तसेच निवडून द्यावयाच्या सर्व जागांकरिता प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये सूचक, अनुमोदक वेगळ्या मतदार संघातील आहेत या कारणास्तव उमेदवारी अर्ज फेटाळण्याचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय आणि सदरचा निर्णय कायम ठेवण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा निणर्य चुकीचा आहे असा मुद्दा याचिकाकत्यांच्या वकिलांनी याचिकेत केला होता.अलिबागचे सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक यांनी या प्रकरणी दिलेला निर्णय योग्य तसेच सहकारी कायदा आणि निवडणूक नियमांना धरून आहे, असा युक्तिवाद सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांनी केला होता. उच्च न्यायालयाने तो ग्राह्य धरला. गिरीश तुळपुळे यांच्यासह अन्य १४ जणांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ विधिज्ञ सी.जी. गावणेकर यांनी काम पाहिले, तर सुरेश पाटील यांच्यासह अन्य जणांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ संपतराव पवार, मुग्धा पाटील यांनी काम पाहिले. पतसंस्थेच्या स्थापनेपासून गिरीश तुळपुळे गटाचे महासंघावर असलेले वर्चस्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)