शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा मुक्ती दिनासाठी पत्रव्यवहार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:48 IST

मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे.

नांदगाव/ मुरूड : मुरुड शालेय विद्यार्थ्यांनी आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. पत्रकार संघटनांच्या माध्यमातून अशा कार्यक्र माद्वारे लोक जागृती होऊन जंजिरा मुक्ती दिनाचे महत्त्व असंख्य लोकांना कळणार आहे. जंजिरा मुक्ती दिन हा शासनामार्फत साजरा व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे. मुक्ती दिन साजरा करण्यासाठी शासनाकडे जो पत्रव्यवहार करावा लागणार आहे तो मी लवकरच पुन्हा एकदा करून जास्तीत जास्त प्रयत्न करेल अभिवचन या वेळी तहसीलदार उमेश पाटील यांनी दिले.मुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार पाटील बोलत होते. या वेळी कार्यक्र मात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समाजसेवक जाहिद फकजी व सर्पमित्र संदीप घरत या दोघांना शाल श्रीफळ,व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. या वेळी तहसीलदार उमेश पाटील म्हणाले की, भारत देश एकसंघ राहण्यासाठी देशातील ५६५ संस्थाने विलीन होणे खूप गरजेचे होते. संरक्षण मंत्री वल्लभभाई पटेल यांनी त्या वेळी धाडसी निर्णय घेतल्यामुळेच संस्थाने भारतात विलीन झाली. जंजिरा मुक्ती दिनासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी कष्ट केले आहेत त्यांचे आज स्मरण करणे आवश्यक बाब आहे. त्यांच्या आंदोलनामुळेच जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले आहे ही गोष्ट नाकारता येत नाही. एक चांगला उपक्र म पत्रकार संघटनांनी केल्याबद्दल त्यांनी विशेष शब्दात कौतुक केले.विजय मोकल यांनी सुद्धा मार्गदर्शनपर भाषण करत गोवा महामार्गातील इंदापूर ते पळस्पे हा रस्ता होण्यासाठी गेली १४ वर्षे प्रेस क्लब झगडत आहे. त्यांच्या मागणीचा विचार शासनाला करावा लागला त्याचप्रमाणे जंजिरा मुक्ती दिन हा लोकमहोत्सव होण्यासाठी शासन दरबारी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. या कार्यक्र मासाठी पाणीपुरवठा सभापती प्रमोद भायदे आदी मान्यवर उपस्थित होते.आझाद मैदान चौकात ध्वजारोहणमुरु ड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मुरु ड येथे जंजिरा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. मुरु ड, म्हसळा व श्रीवर्धन या तीन तालुक्यांवर जंजिरा नवाबाची सत्ता होती. ३१ जानेवारी १९४८ रोजी शामील नाम्यावर सही झाल्याने हे तिन्ही तालुके भारतात शामील झाले होते. ३१ जानेवारी हा दिन जंजिरा मुक्ती दिन म्हणून पत्रकार संघाच्यावतीने साजरा करण्यात येतो. या वेळी सकाळी ९ वाजता आझाद चौकात रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्र म समाप्त होताच नगरपरिषद हॉल येथे मोठ्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन साजराच्म्हसळा : म्हसळा शहरात जंजिरा मुक्ती दिन रायगड जिल्हा परिषद शाळा म्हसळा नं.१ येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.च्म्हसळा शहरात रायगड प्रेस क्लब व म्हसळा प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसºया वर्षी जंजिरा मुक्ती दिनानिमित्त ध्वजारोहण म्हसळा प्रेस क्लबचे अध्यक्ष अशोक काते यांच्या हस्ते करण्यात आले.च्याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे यांनी जंजिरा मुक्ती दिन हा शासकीय कार्यक्र म झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, तर जिजामाता शिक्षण संस्था, म्हसळाचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पुढील वर्षापासून जंजिरा मुक्ती दिन संस्थेत साजरा करणार असल्याचे अभिवचन उपस्थितांना संबोधित करताना दिले.च्कार्यक्र माचे सूत्रसंचालन अंकुश गाणेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुशील यादव यांनी मानले.या कार्यक्र मासाठी म्हसळा पंचायत समिती उपसभापती मधुकर गायकर, म्हसळा नगराध्यक्ष कविता बोरकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Raigadरायगड