शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; आकडेवारीवरून स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:49 IST

CoronaVirus Raigad News: सरासरी ५५ पर्यंत रुग्ण मिळण्याचे प्रमाण खाली

अलिबाग : रायगड जिल्ह्यात जुलैनंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या आकड्याने अचानक उसळी मारली होती. त्यानंतर, कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सरकारसह जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात कमी होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.जिल्ह्यात मागील दोन महिन्यांत रुग्णवाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. त्या दरम्यान, दररोज १० ते १५ जणांचा मृत्यू होत होता. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविणे चिंतेची बाब ठरली होती. जिल्ह्यात दररोज ७०० पर्यंत जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३०० ते ३५० वर येऊन थांबली आहे. गेल्या पाच दिवसांत १ हजार ७०४ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर २ हजार १९७ रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सरासरी ५५ पर्यंत रुग्ण मिळण्याचे प्रमाण खाली आले आहे. त्यामुळे आता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता मंदावत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केलेल्या उपाय-योजनांमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे.प्रादुर्भाव काही प्रमाणात स्थिरावला : मागील १५ दिवसांपासून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव काही प्रमाणात स्थिरावला आहे. त्यामुळे नागरिकांसह सेवेस तत्पर असणाºया वैद्यकीय अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्युदर अजूनही ३ टक्क्यांपेक्षा कमी आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना स्वत:ची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.आरोग्याविषयी नागरिक सजग-जिल्हाधिकारी : स्वत:च्या आरोग्याविषयी आता नागरिकही सजग झाले आहेत. सरकारच्या ‘माझे कुटुंंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचे कर्मचारी गावागावांमध्ये जाऊन नागरिकांची माहिती घेत आहेत. कुणा नागरिकास सर्दी, ताप, खोकला असेल, तर त्या कुटुंबाची माहिती आरोग्य विभागाला देऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. वेळीच औषधोपचार मिळाल्याने आता कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या