शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

Corona Vaccination: जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:21 IST

बहुतांश लसीकरण केंद्रे शुक्रवारी सायंकाळपर्यंत बंद हाेण्याची चिन्हे; काही ठिकाणी नागरिक रिकाम्या हाती परतले

- निखिल म्हात्रेअलिबाग : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यातील नागरिकांना लसीकरण करण्यात येत असले तरी जिल्ह्यात फक्त तीन हजार काेराेना लसींचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडणार आहेत. अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये काही प्रमाणातच साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लसीकरणाला नागरिकांनी फारसा उत्साह दाखवल्याचे दिसून आले नाही. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील अन्य लसीकरण केंद्राची झाली हाेती. काही ठिकाणी तर नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागले आहे.रायगड जिल्ह्यात सुरुवातीला कोव्हॅक्सिन आणि नंतर कोविशिल्ड अशा दोन्ही प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानंतर अगदी सुरुवातीला या कोविड लसीकरण मोहिमेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. नंतर मात्र या लसीकरणाबाबत लोकांमध्ये विश्‍वास वाढल्याने प्रतिसाद वाढला. लसीच्या मागणीप्रमाणे पुरवठा वाढला होता; परंतु लस घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने लसीकरण केंद्रांची संख्यादेखील वाढवण्यात आली.जिल्ह्यात एकूण ८४ लसीकरण केंद्र असून त्यापैकी ५९ लसीकरण केंद्र सुरू आहेत तर २५ केंद्र लसीच्या कमतरतेमुळे बंद आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार १०९ जणांचे सलीकरण पूर्ण झाले आहे. तर ३ हजार ७८० डोस शिल्लक आहेत. मात्र, ते ही आजच्या लसीकरणात संपतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली. लसीकरणाचा वेगही मंदावला. त्यामुळे सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी झाल्यानंतर मिळणारी लस लगेच मिळेनाशी झाली. नोंदणी करणाऱ्या नागरिकांना लसीकरणासाठी पुढील तारीख मिळू लागली.सरकार, प्रशासन सतर्क जिल्ह्यात काेराेनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डाेके वर काढले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन चांगलेच सतर्क झाले आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने ३५ हजार ६७० आराेग्यसेवक आणि फ्रंटलाइन वर्कर यांना लस देण्यात आली आहे. ४५ वर्षांच्या पुढे असणारे २३ हजार ९५७ नागरिक आहेत. ५५ हजार ७३१ ज्येष्ठ नागरिकांनीही लस घेतली आहे. जिल्हा साठवण केंद्रातील लसीचे वितरण झाले आहे. मिळालेल्या अहवालानुसार अनेक लसीकरण केंद्रांवरील लस संपली आहे. जेथे शिल्लक आहे तेथे एक दिवस पुरेल इतकाच साठा आहे. आम्ही नवीन लसीची मागणी केली आहे. ती उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण वेगाने सुरू होईल.- डॉ. गजानन गुंजकर,जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण२५ केंद्रे बंद आराेग्य विभागाने सुरुवातीला ८० केंद्रांपैकी ५० केंद्रे बंद झाल्याचे सांगितले हाेते. त्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने नव्याने आकडेवारी जाहीर करत फक्त २५ केंद्र बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे समन्वयाचा अभाव असल्याचे समाेर आले आहे. मात्र, विश्र्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील लस संपली असल्याचे सांगितले आहे.ग्रामीण भागात तुटवडाजिल्हा मुख्य लस साठवण केंद्रातील लसींचा साठा संपला आहे. अनेक केंद्रांवरील विशेषतः ग्रामीण भागातील लसीकरण लसीअभावी थांबवण्यात आले आहे. तर ज्या केंद्रांवर लस शिल्लक आहे तेथे एक ते दोन दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यासाठी आतापर्यंत १ लाख ३९ हजार १०९ जणांना लस देण्यात आली. तर १३ हजार ५८९ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. शहरी भागात बऱ्यापैकी लसीकरण झाले असले तरी ग्रामीण रायगडमधील नागरिक अजूनही लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस