शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कोरोनामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेते धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 23:33 IST

व्यवसाय डबघाईला येण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : २०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामुळे आर्थिक टंचाईचे गेले. सर्वच व्यवसाय आणि नोकऱ्यांवर या कोरोनाने गदा आणली. नवे वर्ष सुरू होतानाच काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या शाळा आणि कोरोनाने पुन्हा वर काढलेले डोके यामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद पडल्या, तर व्यवसाय पूर्णतः डबघाईला येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्याने स्टेशनरी विक्रेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. शाळेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारातील वह्या, पेन, विविध प्रकारचे कागद, खडू, पेन्सिल आदी साहित्य विक्री सुरू झाली. यामुळे शैक्षणिक साहित्य पुरवठादारांनीदेखील साहित्य पुरवठा करण्यास सुरुवात केली. शैक्षणिक साहित्यामध्ये गुंतलेला पैसा आणि अनेकांनी या व्यवसायासाठी काढलेले कर्जे गेली वर्षभर फेडणे अशक्य झाले होते. शाळा सुरू झाल्याने या व्यवसायाचे चक्र पुन्हा सुरू झाले होते. मात्र हे चक्र पुन्हा थांबते की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. महाडमध्ये छोटे-मोठे धरून किमान २० ते २५ शैक्षणिक साहित्य विक्रेते आहेत. संपूर्ण तालुक्यातील आणि शहरातील शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारे शैक्षणिक साहित्य महाड शहरातूनच नेले जाते. शिक्षण ऑनलाईन सुरू असल्याने शैक्षणिक साहित्याची मागणी पूर्णतः बंद आहे.संचारबंदी, कोरोना या सगळ्यामध्ये लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेली वर्षभर शाळा बंद राहिल्याने शैक्षणिक साहित्याची विक्री ठप्प झाली आणि पडून राहिलेल्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान झाले आहे. आता पुन्हा अशी स्थिती निर्माण झाली, तर हा व्यवसाय डबघाईला येईल - सुरेंद्र नाझरे, दुकानदार, महाड

२०२० मध्ये शाळा सुरू होण्याच्या तोंडावर मागणी केलेले शैक्षणिक साहित्य कोरोनामुळे पडून राहिल्याने हे साहित्य खराब झाले आहे. यामुळे शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. पेनची शाई खराब होणे, कागदावर धूळ बसल्याने कागद खराब होणे, विविध प्रकारातील रंग सुकून गेले, अशाप्रकारचे नुकसान शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांना सहन करावे लागले आहे.- मुबीन देशमुख, दुकानदार, महाड