शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

कोर्लईचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:49 IST

मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- अमूलकुमार जैनबोर्ली मांडला  - मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कुंडलिका नदीच्या दक्षिणेला कोर्लई गावाजवळ १५२१मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लई किल्ला बांधला. १५९४मध्ये पोर्तुगिजांकडे गेलेला हा किल्ला पेशवाईच्या काळात चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. जवळपास पाच शतकांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यावरील शंकराच्या देवळाची पडझड झाली आहे. तोफा अस्ताव्यस्त पडल्या आहेत.किल्ल्यावर पाण्याची विहीर असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तटबंदी ढासळू लागली आहे. पोर्तुगिजांनी लावलेला फलकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी किल्ल्यावर लागलेल्या आगीमध्ये वनसंपदा नष्ट झाली आहे. पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.कोर्लई किल्ला पुरातत्त्व व वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. पुरातत्त्व विभागाने येथील पुरातन चर्चचे नूतनीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासाठी सुरू केलेले काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात; परंतु किल्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. पुरातत्त्व विभागाने किल्ला संवर्धनासाठी ठोस प्रयत्न सुरू करावेत, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगडhistoryइतिहास