शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

कोर्लईचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:49 IST

मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- अमूलकुमार जैनबोर्ली मांडला  - मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कुंडलिका नदीच्या दक्षिणेला कोर्लई गावाजवळ १५२१मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लई किल्ला बांधला. १५९४मध्ये पोर्तुगिजांकडे गेलेला हा किल्ला पेशवाईच्या काळात चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. जवळपास पाच शतकांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यावरील शंकराच्या देवळाची पडझड झाली आहे. तोफा अस्ताव्यस्त पडल्या आहेत.किल्ल्यावर पाण्याची विहीर असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तटबंदी ढासळू लागली आहे. पोर्तुगिजांनी लावलेला फलकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी किल्ल्यावर लागलेल्या आगीमध्ये वनसंपदा नष्ट झाली आहे. पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.कोर्लई किल्ला पुरातत्त्व व वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. पुरातत्त्व विभागाने येथील पुरातन चर्चचे नूतनीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासाठी सुरू केलेले काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात; परंतु किल्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. पुरातत्त्व विभागाने किल्ला संवर्धनासाठी ठोस प्रयत्न सुरू करावेत, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगडhistoryइतिहास