शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

कोर्लईचा ऐतिहासिक ठेवा नामशेष होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:49 IST

मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

- अमूलकुमार जैनबोर्ली मांडला  - मुरुड तालुक्यातील ४९७ वर्षांची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोर्लई किल्ल्याचे खंडरात रूपांतर झाले आहे. किल्ल्याचे संवर्धन करण्याकडे पुरातत्त्व व वनविभागाने दुर्लक्ष केले असून, अशीच स्थिती राहिली तर राज्यातील प्रमुख जलदुर्ग असलेल्या कोर्लईचे अस्तित्वच नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.कुंडलिका नदीच्या दक्षिणेला कोर्लई गावाजवळ १५२१मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोर्लई किल्ला बांधला. १५९४मध्ये पोर्तुगिजांकडे गेलेला हा किल्ला पेशवाईच्या काळात चिमाजी आप्पा यांच्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. जवळपास पाच शतकांचा इतिहास लाभलेल्या या किल्ल्याचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. किल्ल्यावरील शंकराच्या देवळाची पडझड झाली आहे. तोफा अस्ताव्यस्त पडल्या आहेत.किल्ल्यावर पाण्याची विहीर असून, ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तटबंदी ढासळू लागली आहे. पोर्तुगिजांनी लावलेला फलकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यापूर्वी किल्ल्यावर लागलेल्या आगीमध्ये वनसंपदा नष्ट झाली आहे. पुन्हा वृक्षारोपण करण्यासाठी परवानगी दिली जात नाही.कोर्लई किल्ला पुरातत्त्व व वनविभागाच्या अखत्यारित येत आहे. पुरातत्त्व विभागाने येथील पुरातन चर्चचे नूतनीकरण करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासाठी सुरू केलेले काम अर्धवट अवस्थेमध्ये आहे. किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात; परंतु किल्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त करत आहेत. पुरातत्त्व विभागाने किल्ला संवर्धनासाठी ठोस प्रयत्न सुरू करावेत, अन्यथा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगडhistoryइतिहास