शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
7
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
8
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
9
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
10
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
11
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
12
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
13
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
14
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
15
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
16
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
17
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
18
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
19
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
20
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी

न्यायहक्कांसाठी कामगारांची साथ मोलाची

By admin | Updated: October 25, 2015 00:21 IST

कोणत्याही आंदोलनात कोणत्याही मंत्र्याबरोबर चर्चेला बसत नाही, पण ज्यांच्या बरोबर बसतो तेव्हा यशस्वी निर्णय घेऊनच बाहेर पडतो. येथील रिलायन्समध्ये किती कामगार संघटना

नागोठणे : कोणत्याही आंदोलनात कोणत्याही मंत्र्याबरोबर चर्चेला बसत नाही, पण ज्यांच्या बरोबर बसतो तेव्हा यशस्वी निर्णय घेऊनच बाहेर पडतो. येथील रिलायन्समध्ये किती कामगार संघटना आहेत व आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी त्या न्यायालयात गेल्या आहेत का, हे मला माहीत नाही. मात्र आपल्या मागण्यांसाठी सर्व संघटना एकत्र होण्यासाठी कामगारांची साथ असणे गरजेचे असून, त्यांची साथ नसेल तर काहीही साध्य होत नाही, असे विचार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे -पाटील यांनी मांडले.रिलायन्स कंपनीतील कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आ. भाई जगताप यांच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सदस्य असलेल्या कामगार संघटनेने शुक्र वारपासून कुहिरे येथे धरणे आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी कोळसे-पाटील यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. या सभेला महासंघाचे उपाध्यक्ष सदाभाई चव्हाण, पाताळगंगा रिलायन्सचे कामगार नेते श्रीनिवास पत्की, रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष उमेश ठाकूर, कामगार नेते उद्धव कुथे, संघटनेचे युनिट अध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे आदी मान्यवरांसह शेकडो कामगार उपस्थित होते. डी. ए. तीन वर्षे गठित करता येत नसला तरी येथील रिलायन्स कंपनीत तो केला गेला आहे. अंबानी सध्या पंतप्रधानांचीच भूमिका बजावत आहेत. सर्व संघटना एकत्र येत नसल्यामुळेच कामगारांवर अन्याय केला जात असल्याचे मला दिसून येत होते. न्यायहक्कांसाठी एकजूट करा, अन्याय सहन करणे बंद करा. तुम्ही एकत्र या, पन्नास वकील तुमच्या पाठीशी उभे करतो. मीसुद्धा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आंदोलनाची वेळ आली तर जेलमध्ये जाणारा मी प्रथम असेन, असे उद्गारही यावेळी त्यांनी काढले. यावेळी अनेक कामगार नेत्यांची भाषणे झाली. (वार्ताहर)