शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

कंत्राटी कामगारांचे आंदोलन; महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 03:02 IST

महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना दिले आहे तर दुसरीकडे रायगड जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

अलिबाग : महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचाºयांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहे तर दुसरीकडे रायगड जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कंत्राटी कामगारांच्या उपोषणाला अधिक धार आली आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत माघार नाही या मुद्यावर आंदोलक ठाम असल्याने पहिल्याच दिवशी आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आंदोलनामध्ये राज्यातील ७५०, तर जिल्ह्यातील २४ कर्मचाºयांचा समावेश आहे. आंदोलनामुळे जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील सुमारे १०५ कोटी ३३ लाख रुपयांच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहेत. योजना यशस्वी करण्यासाठी सरकारने कंत्राटी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. कंत्राटी कर्मचाºयांना अद्यापही नियमित केलेले नाही. कर्मचाºयांना नियमित करण्यात येत नसल्यामुळे ते राजीनामा देत आहेत. त्यामुळे कर्मचाºयांची संख्या कमी होत आहे. कर्मचाºयांचे वय वाढत असल्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जाण्याला निर्बंध येत आहेत. वाढत्या महागाईमुळे देण्यात येणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. तसेच कामे सुरू असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी वाहनाने जावे लागते, परंतु पेट्रोलचे दरही वाढतच आहेत. त्यामुळे तेही परवडत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. वाहन चालकांना मिळणारे मानधन हे नियमित वाहन चालकांना मिळणाºया वेतनाच्या २५ टक्केही देण्यात येत नसल्याची खंत कर्मचाºयांनी व्यक्त केली आहे. कर्मचाºयांना विमा संरक्षणही देण्यात येत नसल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. मागण्यांबाबत सरकारकडे वेळोवेळी दाद मागितली, मात्र सरकार कंत्राटी कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याची संस्थेची धारणा झाली आहे.आंदोलकांनी पुकारलेले आंदोलन हे बेकायदेशीर असल्याने आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करावी. त्यांना आंदोलन करण्यापासून रोखावे आणि सुरु असलेली कामे सुरळीत सुरु कशी राहतील याकडे लक्ष द्यावे असे सरकारने मुख्य अभियंता आाणि कार्यकारी अभियंता यांना लेखी कळवले आहे. सरकारचे हे कृत्य म्हणजे आंदोलकांचे आंदोलन चिरडून टाकण्याचाच प्रकार आहे. त्यामुळेच सरकारने असे धमकी देणारे पत्रक काढले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.काम बंद आंदोलनामुळे विविध योजनांची कामे ठप्प होण्याची शक्यतारायगड जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची (सन २०१२-१३ आणि २०१७-१८) १३ कोटी पाच लाख, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची (सन २०१६-१७) ४२ कोटी १५ लाख तसेच (सन २०१७-१८) ४९ कोटी ६८ लाख रुपयांची विकासकामे होत आहेत. कंत्राटी कर्मचारी उपोषणामध्ये सहभागी झाले तर अशा एकूण १०५ कोटी ३३ लाख रुपयांची कामे ठप्प पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Raigadरायगड