शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शिडाच्या बोटीची वाहतूक पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 06:57 IST

संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.

- संजय कारंडेमुरुड जंजिरा -  संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.जंजिरा किल्ला पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. समुद्रामधील हा किल्ला अजिंक्य समजला जात होता. किल्ल्याची अभेद्य तटबंदी, समुद्रात असूनही किल्ल्यावर असणारे गोड्या पाण्याचे तलाव यामुळे पर्यटकांची पसंती या ठिकाणाला मिळत असते. जंजिरावरून किल्ल्याकडे जाण्यासाठी शिडाच्या बोटीचा उपयोग करावा लागतो. वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीच्या वादामुळे मागील १५ दिवसांपासून शिडाच्या बोटीची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, यावरून मतभेद निर्माण झाले होते. यावर तोडगा निघत नसल्याने तब्बल १५ दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. परीक्षा संपत आल्याने जंजिरा पाहण्यासाठी येणाºया नागरिकांची संख्या वाढत असून, शिडाच्या बोटींची वाहतूक बंद असल्याने पर्यटकांना निराश होऊन परत जावे लागत होते. अनेक पर्यटकांनीही वाहतूक पूर्ववत सुरू व्हावी, अशी मागणी केली होती. अखेर दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. पर्यटकांना शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर जाण्यास खूप मज्जा वाटते. बोटी सुरू झाल्याने अनेक पर्यटकांनी आनंद व्यक्त केला आहे.संघटनांनी आपापसात समन्वय साधावादोन्ही संघटनांच्या वादाची दखल महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डानेही घेतली आहे. दोन्ही संघटनांनी आपापसात समन्वय साधून, कोणालाही त्रास होणार नाही, अशाप्रकारे व्यवसाय करावा, असे परखड मत व्यक्त केले आहे. शिडांच्या बोटी सुरू झालेल्या असल्या तरी वेलकम सोसायटी व जंजिरा पर्यटक सोसायटीची सयुंक्तिक सभा मेरी टाइम बोर्डाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यामध्ये कोणाच्या किती बोटी किल्ल्यावर सोडायच्या, हे प्रमाण दोन्ही संघटनांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येणार असल्याची माहिती कॅप्टन सूरज नाईक यांनी दिली आहे. ही बैठक १७ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. जंजिरा पर्यटक सोसायटीचे व्यवस्थापक नाझभाई कादरी यांनी शिडाच्या बोटी सुरू केल्याबद्दल स्थानिक आमदार पंडित पाटील व कॅप्टन सूरज नाईक यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.किल्ला पाहाण्यासाठी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. मेरी टाइम बोर्डाचे राजपुरी येथील वाहनतळ चारचाकी गाड्यांची प्रचंड गर्दी दिसून येत होती. नाशिक, सोलापूर, नागपूर, यवतमाळ, ठाणे, मुंबई येथील पर्यटकांनी हा किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या