शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

दिवेआगारात ३६७ कासवांची अंडी संरक्षित

By admin | Updated: January 22, 2017 03:11 IST

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे.

- जयंत धुळप, अलिबाग

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे निसर्गप्रेमी राऊंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि काही निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या ४ जानेवारी रोजी ११७, ५ जानेवारी रोजी १३०, तर १२ जानेवारी रोजी १२० अशी एकूण ३६७ सागरी कासवाची अंडी यंदाच्या विणीच्या हंगामात दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात शोधून काढण्यात या चमूला यश आले आहे. भारतात सागरी कासवांची एकूण ५ कुळे व ३१ जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो. भारतामध्ये त्याची लेदरबॅक ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या आॅलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकिबल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो. २००२मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षणात आॅलिव्ह रिडले ही प्रजाती विणीसाठी येत असल्याचे आढळून आले होते.किनाऱ्यावर आढळणाऱ्या कासवांची अंडी पळविणे, मांसाचा वापर अन्नपदार्थ म्हणून करणे, तसेच कुत्रे, कोल्हे, तरस, डुक्कर हे प्राणीसुद्धा कासवाचीअंडी खातात. तेल काढण्यासाठी व कासवाच्या कवचापासून शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठीही कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शिवाय मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणे किंवा वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने अशा अनेक कारणांमुळे समुद्रीकासवांचे जीवन धोक्यात आले आहे. ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यशस्थानिक ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाला तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती केली. किनारपट्टीवरील १५ ते २० ठिकाणी कासवांच्या अंड्यांसाठी ६०० ते ७०० घरटी तयार केली जातात. गेल्या १० ते १२ वर्षांत कार्यकर्ते, पर्यटकांनी ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यश मिळविले आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एखादी चळवळ सुरू व्हावी आणि ती चळवळ वन विभागाने अखंडित सुरू ठेवावी, याचे हे देशातील एक आगळे उदाहरणच म्हणावे लागेल.संरक्षण मोहिमेला चळवळीचे रूप : भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सागरी कासवांचे संवर्धन झाले पाहिजे, त्यासाठी किनारीभागात चळवळ उभी केली. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात आणि पिल्ले बाहेर येण्याची वाट न पाहता निघून जात असल्याचे आढळून आले.- 2002मध्ये मंडळाने सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. वेळास सागरीकिनारी पहिल्या वर्षी कार्यकर्त्यांना कासवांनी ५० अंडी घातल्याचे लक्षात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्ले समुद्रात सोडण्याचा आनंद लुटला. महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथोर, मुरूड, रायगड जिल्ह्यात दिवेआगार, मारळ हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश मिळविले. या ठिकाणी कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कम्पाऊंड तयार केली.