शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दिवेआगारात ३६७ कासवांची अंडी संरक्षित

By admin | Updated: January 22, 2017 03:11 IST

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे.

- जयंत धुळप, अलिबाग

नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवाच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे निसर्गप्रेमी राऊंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि काही निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या ४ जानेवारी रोजी ११७, ५ जानेवारी रोजी १३०, तर १२ जानेवारी रोजी १२० अशी एकूण ३६७ सागरी कासवाची अंडी यंदाच्या विणीच्या हंगामात दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात शोधून काढण्यात या चमूला यश आले आहे. भारतात सागरी कासवांची एकूण ५ कुळे व ३१ जाती आढळतात. यापैकी ‘उर्मोचिलिड’ व ‘चिलोनिडी’ या कुळांमध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो. भारतामध्ये त्याची लेदरबॅक ही एकमेव जात सापडते. तर चिलोनिडी कुळामध्ये भारतीय समुद्रकिनाऱ्यावर आढळणाऱ्या आॅलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉकिबल, लॉगर हेड या चार जातींचा समावेश होतो. २००२मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षणात आॅलिव्ह रिडले ही प्रजाती विणीसाठी येत असल्याचे आढळून आले होते.किनाऱ्यावर आढळणाऱ्या कासवांची अंडी पळविणे, मांसाचा वापर अन्नपदार्थ म्हणून करणे, तसेच कुत्रे, कोल्हे, तरस, डुक्कर हे प्राणीसुद्धा कासवाचीअंडी खातात. तेल काढण्यासाठी व कासवाच्या कवचापासून शोभेच्या वस्तू तयार करण्यासाठीही कासवांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. शिवाय मच्छीमारांच्या जाळ्यात अडकणे किंवा वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने अशा अनेक कारणांमुळे समुद्रीकासवांचे जीवन धोक्यात आले आहे. ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यशस्थानिक ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाला तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती केली. किनारपट्टीवरील १५ ते २० ठिकाणी कासवांच्या अंड्यांसाठी ६०० ते ७०० घरटी तयार केली जातात. गेल्या १० ते १२ वर्षांत कार्यकर्ते, पर्यटकांनी ३५ ते ४० हजार कासवांची पिल्ले समुद्रात सोडण्यात यश मिळविले आहे. पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एखादी चळवळ सुरू व्हावी आणि ती चळवळ वन विभागाने अखंडित सुरू ठेवावी, याचे हे देशातील एक आगळे उदाहरणच म्हणावे लागेल.संरक्षण मोहिमेला चळवळीचे रूप : भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. सागरी कासवांचे संवर्धन झाले पाहिजे, त्यासाठी किनारीभागात चळवळ उभी केली. दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत कासवे किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात आणि पिल्ले बाहेर येण्याची वाट न पाहता निघून जात असल्याचे आढळून आले.- 2002मध्ये मंडळाने सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. वेळास सागरीकिनारी पहिल्या वर्षी कार्यकर्त्यांना कासवांनी ५० अंडी घातल्याचे लक्षात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेली पिल्ले समुद्रात सोडण्याचा आनंद लुटला. महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर सागरी कासव संरक्षण मोहीम सुरू केली. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथोर, मुरूड, रायगड जिल्ह्यात दिवेआगार, मारळ हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश मिळविले. या ठिकाणी कासवांनी अंडी घातल्यानंतर त्यांच्या संरक्षणासाठी कम्पाऊंड तयार केली.