शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:08 IST

भारतीय बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य : प्लॅस्टिकबंदीमुळे विद्युत रोषणाईवर भर; पर्यावरणपूरक साहित्यालाही मागणी

अलिबाग : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाच्या आगमनामुळे वातावरणात प्रसन्नता आणि उत्साह निर्माण झाला आहे. दीड दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत बाप्पाचा मुक्काम भक्तांच्या घरी राहणार आहे. बाप्पाच्या सेवेत कसलीच कमतरता राहू नये, यासाठी जिल्ह्यातील विविध बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी चांगलीच धूम आहे. सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य, हार, फळे अशा हरतºहेच्या वस्तूंना बाजारपेठेत मागणी आहे. त्यामुळे बाजारपेठ फुलून गेल्या आहेत.

घरगुती अथवा सार्वजनिक मंडळाचा गणेशोत्सव हा उत्सव अधिकाधिक प्रकाशित करण्यासाठी भाविक आकर्षक विद्युत रोषणाई करण्यावर भर देतात. त्या दृष्टीने विविध प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. विद्युत रोषणाईच्या बाजारपेठेमध्ये यंदा भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी, दहा ते शंभर वॉटच्या सिंगल-मिल्टकलर फ्रेड लाइट्स, झालर यासारखे प्रकार उपलब्ध आहेत. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळत आहे. याबरोबरच रोब लाइट्स, लेझर लाइट्स, पार लाइट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र , एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तीन रंग, सहा रंग ते १६ रंगांच्या एलईडी स्ट्रीप सेटलाही जास्त मागणी असल्याचे दिसून येते. त्यांच्या किमती ८० रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत आहेत. स्वदेशी वस्तू महाग असल्या तरी त्या खरेदी केल्या जात आहेत.सार्वजनिक मंडळांचेही सजावट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पावसापासून बाप्पाचे रक्षण करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना चोख व्यवस्था केल्याचे दिसून येते.पेणच्या बाजारात गणेशभक्तांची लगबग१पेण : उत्सवाच्या खरेदीसाठी पेणच्या बाजारापेठेत अलोट गर्दी उसळली होती. फळे, फुले, मेवा, मिठाई, पूजेसाठी २१ पत्री, धूप, अगरबत्ती, विविध प्रकारच्या शोभेची फुले, कापडी तोरण, दही, दूध, मध, तूप, लोणी, केशर, नारळ आदी वस्तूंच्या खरेदीसाठी गणेशभक्तांची सकाळपासून लगबग सुरू होती.२पावसाचा व्यत्यय असला तरी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. एकीकडे बाजारात झुंबड उडाली असताना, दुसरीकडे वाहतूककोंडीमुळे पेण शहरात जागोजागी नागरिकांना मुख्य रस्त्यावर मार्ग काढण्यासाठी जिकिरीचे प्रयत्न करावे लागत होते.३गणेशमूर्ती नेण्यासाठी खासगी वाहने, स्थानिक वाहने, एसटी महामंडळाच्या बसेस, दुचाकी, टेम्पो या वाहनांची रेलचेल सतत सुरू होती. 

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगड