शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयाच्या तीरावर रिसॉर्टचे बांधकाम; अवसरे येथील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:48 IST

पाटबंधारे विभागाची न्यायालयात धाव

नेरळ : कर्जत तालुक्यातील अवसरे येथे राज्याच्या पाटबंधारे विभागाचा, शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून लघु-पाटबंधारे प्रकल्प आहे. त्या धरणाच्या डाव्या बाजूला धरणाच्या जलाशयाला लागून रिसॉर्टचे बांधकाम सुरू केले आहे. गृहप्रकल्प राबविणाऱ्या कंपनीने त्या ठिकाणी रिसॉटर््सचे बांधकाम सुरू केले असून, यापूर्वीच पाटबंधारे खात्याने या कंपनीविरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. तरीदेखील कंपनी आपले काम थांबवत नाही असे दिसून येत असून शेतकरी संतप्त झाले आहेत.पाटबंधारे विभागाने अवसरे, बिरदोले आणि वरई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून अवसरे हे लघु-पाटबंधारे प्रकल्पाचे धरण साकारले. त्या भागातील सात गावांतील ३०० हेक्टर जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेल्या अवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाच्या धरणाची अनेक वर्षे दुरुस्ती केली नसल्याने शेतीला पाणी कमी पडते. त्यामुळे अवसरे भागातील शेतकरी वगळता कोदिवले, बिरडोळे, वरई, मानवली, निकोप आणि मोहाली भागातील शेतकरी भातशेती उन्हाळ्यात करीत नाहीत. दरवर्षी शेतकरी धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी करीत असतात; पण पाटबंधारे विभागाला शेतकºयांच्या मागणीकडे बघायला वेळ नाही. गेल्या चार-पाच वर्षांत किरकोळ प्रमाणात शेतकरी उन्हाळी भातशेती करीत आहेत. तर शेतकºयांच्या ३० हेक्टर जमिनीवर अवसरे धरण बांधण्यात आले असून, या धरणाच्या जलाशयात पाण्याखाली गेलेल्या जमिनीचे केवळ भू भाडे असून काही शेतकºयांच्या जमिनी या सांडवा, मातीचा बांध आणि कालवे यांच्यासाठी वापरल्या आहेत. त्या जमिनी आता शेतकरी आपल्याला वापरायला मिळाव्यात म्हणून मागणी करीत आहेत. त्यामुळे पाटबंधारे विभागावर या भागातील शेतकरी नाराज आहेत.असे असताना मात्र दुसरीकडे धरणाच्या जलाशयाला लागून रिसॉर्ट्सचे बांधकाम एक्सर्बिया या कंपनीकडून सुरू आहे. त्यामुळे शेतकºयांच्या नाराजीत भर पडली असून, आमच्या शेतीसाठी पाणी दिले जात नाही म्हणून आम्ही जमिनी अन्य कामासाठी वापरायला मागत असताना पाटबंधारे विभाग त्या जमिनी देत नाही. त्या जमिनी तशाच पडून असताना त्या जमिनीवर पाटबंधारे विभाग आपला अधिकार बजावत असताना दुसरीकडे आपल्या धरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या जमिनीत रिसॉटर््स उभे राहत असताना पाटबंधारे विभाग मूग गिळून गप्प का? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. रिसॉर्टच्या भिंती या जलाशयात बांधल्या असून उन्हाळाच्या चार महिने वगळता त्या रिसॉर्टच्या पायºयांना धरणाचे पाणी लागणार आहे.मात्र, त्याच रिसॉर्टच्या पलीकडे बिरोडोळे येथील शेतकºयांच्या जमिनी आहेत; पण त्या शेतकºयांना त्या जमिनीत जायला साधी परवानगी पाटबंधारे विभाग देत नाही. त्यामुळे एवढे मोठे बांधकाम आणि तेदेखील धरणाच्या जलाशयाला लागून कसे होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.आमची कंपनी कधीही अन्य कोणाच्या जागेत बांधकाम करत नाही, त्यामुळे धरणाच्या जवळ बांधकाम झाले असले तरी ती जमीन आमच्या कंपनीच्या नावे आहे. पाटबंधारे खात्याने आम्हाला बांधकाम करायला परवानगी दिली आहे.- दीपक जाधव, अधिकारी, एक्सर्बिया कंपनीअवसरे लघु-पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयाला लागून बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र, ही कंपनी यापूर्वीच शासनाच्या जागेत घुसली असून आम्ही या कंपनी विरुद्ध न्यायालयात गेलो आहोत, न्यायालयाचा निकाल आल्यावर त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.- भरत काटले, उप अभियंता, पाटबंधारे विभागआमची जमीन सांडव्याच्या पलीकडे असलेल्या भागात आहे; पण तिकडे आम्हाला जाऊ देत नाहीत. मात्र, आमच्या जमिनीत जाण्याच्या रस्त्यावर रिसॉर्टचे बांधकाम सुरू होते, हा काय प्रकार आहे. आम्ही मागील वर्षी जमीन कोणत्याही कमाविना पडून असल्याने वापरण्यासाठी द्यावी, अशी मागणी केली; पण पाटबंधारे खाते आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही.- भगवान जामघरे, शेतकरी