शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वळके गावात व्यावसायिक गाळ्यावर घरांचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:04 IST

रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे.

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेमधील एकामागून एक घोटाळे समोर येत आहेत. मुरुड तालुक्यातील वळके ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार आता उघड झाला आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक आणि ग्रामसेविका यांना विस्तार अधिकारी यांनी दोषी ठरवले आहे. घोटाळेबाजांच्या विरोधात अहवाल असतानाही उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांनी अद्यापही कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.प्रशासनाने दोषींवर कडक कारवाई न केल्यास ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी दिला आहे.वळके ग्रामपंचायतीने १९९४-९५, १९९५-९६ या कालावधीत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत मंजूर करुन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या येसदे येथील जागेवर व्यावसायिक गाळ््यांचे बांधकाम केले होते. दारिद्र्य रेषेखाली तसेच बेरोजगार असलेल्या तरुणांना हे गाळे भाड्याने देऊन त्यामार्फत ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे या हेतूने गाळ््यांचे बांधकाम करण्यात आले होते. सदरचे चार गाळे ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे यांना ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिले होते. त्यानंतर २०१३ रोजी किशोर यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा गैरवापर करुन गाळ््यांच्या जागेवर पक्क्या घरांचे बांधकाम केले. तसेच ग्राम निधी विकासासाठी न वापरता स्वत:च्या फायद्यासाठी वापरला गेला. दोन्ही प्रकरणात किशोर यांनी ग्रामसेवक राहुल पोरे आणि ग्रामसेविका आशा बिरवाडकर, स्वप्नाली नाईक यांना हाताशी धरुन ग्रामपंचायतीची मिळकत लाटण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समिती यांच्याकडे २०१५ रोजी तक्रार केली होती, अशी माहिती पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मोहिते यांनी दिली. या गैरव्यवहाराबाबत पंचायत समितीने डोळेझाक केली होती, असेही त्यांनी स्पष्टकेले.ग्रामस्थांनी लावलेल्या सातत्याच्या रेट्यामुळे अखेर पंचायत समितीने विस्तार अधिकारी चव्हाण यांना याबाबतचा तपास करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार विस्तार अधिकारी चव्हाण आणि गटविकास अधिकारी वाणी यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य किशोर काजारे, ग्रामसेवक राहुल पोरे, ग्रामसेविका आशा बिरवाडकर यांच्यासह अन्य काही जण दोषी असल्याचा अहवाल पंचायत समितीसह जिल्हा परिषदेला दोन महिन्यांपूर्वीच पाठवलाआहे. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.>अहवाल ग्रामपंचायतीकडे धूळखातगेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे अहवाल धूळखात पडलेला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी या अहवालावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.प्रकाश खोपकर हे कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण होऊन ते त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्या राजश्री मिसाळ यांनी केला आहे.