शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

भारतीय नागरिकत्वाची ओढ

By admin | Updated: January 5, 2016 02:05 IST

जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले

आविष्कार देसाई, अलिबागजगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानातील नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्थान, श्रीलंका, युक्रेन, नेपाळ, फिलिपाइन्स, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना भारताच्या नागरीकत्वाची ओढ लागली आहे.गेल्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीतील हे प्रस्ताव असून, एकच प्रकरण रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. तोही प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात येत्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधींना वाव आहे. जिल्ह्यातून परदेशामध्ये नोकरी-धंद्यानिमित्त काही प्रमाणात स्थलांतर झाले आहे. मात्र जिल्ह्यात होऊ घातलेली डेव्हलपमेंट आता सर्वांच्याच नजरेपासून लपून राहिलेली नाही. भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी २२ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले होते. त्यातील एक प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे. या सर्व प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने भारत देशाच्या फाळणीच्या वेळी काही जण हे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांच्यासह त्यांच्या पिढीला आता भारत देशाची ओढ लागली आहे. मोहनदास कटारीया आणि रंजना कटारीया यांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आले आहेत. तेथून ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अर्जदाराचा पती अथवा पत्नी हे भारतीय नागरिकत्व धारण केलेले आहेत. त्यामुळे लग्नानंतर ते आता भारताचे नागरिकत्व प्राप्त करून येथेच राहू इच्छितात. युक्रेनच्या स्नेहा गोयल, जेसिका गोयल, इराणी गोयल यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याआधी कायद्यानुसार त्यांना पूर्वीचे नागरिकत्व रद्द करणे गरजेचे आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. धार्मिकतेच्या कट्टरवादाचा प्रभाव येथे कमी आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात शांतता आहे. नोकरी- धंद्याची कवाडे येथे अपकमिंग प्रोजेक्टमुळे खुली होणार आहेत. त्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.