शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

भारतीय नागरिकत्वाची ओढ

By admin | Updated: January 5, 2016 02:05 IST

जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले

आविष्कार देसाई, अलिबागजगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने पाकिस्तानातील नागरिकांचा समावेश आहे. अफगाणिस्थान, श्रीलंका, युक्रेन, नेपाळ, फिलिपाइन्स, टांझानिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकांना भारताच्या नागरीकत्वाची ओढ लागली आहे.गेल्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीतील हे प्रस्ताव असून, एकच प्रकरण रायगड जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे. तोही प्रस्ताव लवकरच राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले.रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असणारा जिल्हा आहे. जिल्ह्यात येत्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक असलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने रोजगाराच्या संधींना वाव आहे. जिल्ह्यातून परदेशामध्ये नोकरी-धंद्यानिमित्त काही प्रमाणात स्थलांतर झाले आहे. मात्र जिल्ह्यात होऊ घातलेली डेव्हलपमेंट आता सर्वांच्याच नजरेपासून लपून राहिलेली नाही. भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी २२ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले होते. त्यातील एक प्रकरण जिल्हा प्रशासनाकडे पडून आहे. या सर्व प्रस्तावांमध्ये प्रामुख्याने भारत देशाच्या फाळणीच्या वेळी काही जण हे पाकिस्तानमध्ये गेले होते. त्यांच्यासह त्यांच्या पिढीला आता भारत देशाची ओढ लागली आहे. मोहनदास कटारीया आणि रंजना कटारीया यांचे प्रस्ताव राज्य सरकारच्या गृहविभागाकडे पाठविण्यात आले आहेत. तेथून ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये अर्जदाराचा पती अथवा पत्नी हे भारतीय नागरिकत्व धारण केलेले आहेत. त्यामुळे लग्नानंतर ते आता भारताचे नागरिकत्व प्राप्त करून येथेच राहू इच्छितात. युक्रेनच्या स्नेहा गोयल, जेसिका गोयल, इराणी गोयल यांचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. भारतीय नागरिकत्व स्वीकारण्याआधी कायद्यानुसार त्यांना पूर्वीचे नागरिकत्व रद्द करणे गरजेचे आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. धार्मिकतेच्या कट्टरवादाचा प्रभाव येथे कमी आहे. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात शांतता आहे. नोकरी- धंद्याची कवाडे येथे अपकमिंग प्रोजेक्टमुळे खुली होणार आहेत. त्यामुळे भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.