शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

कर्जत तालुक्यातील जलस्रोतांचे संवर्धन करा- महेंद्र थोरवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:06 IST

जलसंधारणमंत्र्यांकडे पाझर तलाव, केटी बंधाऱ्यांची मागणी

कर्जत : तालुक्यातील उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नद्यांमध्ये कोल्हापूर टाइपचे बंधारे आणि पाझर तलावांची किमान ३० वर्षे नवीन बांधणी झालेली नाही, तसेच असलेले जुने बंधारे, तसेच सहापैकी चार पाझर तलावांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाण्याचे स्रोतांचे जतन करून, संवर्धन करण्याच्या मागणीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांची भेट घेऊन मागणी केली.रायगड जिल्ह्यातील जलसंधारण विभागासंदर्भात राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमधील जलसंधारण संदर्भात चर्चा केली. कर्जत तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील शेतकरी शेतीशिवाय कोणताही व्यवसाय नाही. औद्योगिक वसाहतींना परवानगी नसल्याने स्थानिक शेतकरी भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मासे व्यवसाय, फळ लागवड आदी जोडधंदे करीत असतात. यासाठी शेतकऱ्यांना लागणाºया पाण्याची आवश्यकता असते. मात्र, कर्जत तालुक्यातील उल्हासनदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. मात्र, तालुक्यातील चिल्हार आणि पोसरी या नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.त्यात कर्जत तालुक्यात १९८० नंतर एकही नवीन पाझर तलाव बांधण्यात आलेल्या नाही, याची माहिती मंत्र गडाख यांना दिली. त्यात १९८०च्या दशकात बांधण्यात आलेले सर्व सहा पाझर तलाव यांच्यापैकी डोंगर पाडा आणि सोलन पाडा या दोनच पाझर तलाव यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य पाझर तलाव हे कधीही फुटू शकतात, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.खांडपे, साळोख, कशेळे, खांडस या पाझर तलावांची शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी आणि त्यातील पाणीसाठा यांचा योग्य वापर करावा, अशी सूचना केली, तसेच पाझर तलाव यांच्या दुरुस्तीबरोबर नांदगाव, गुडवण, ओलमन आदी ठिकाणी नवीन पाझर तलावांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यापुढे ठेवला आहे.कर्जत तालुक्यात जलसंधारण विभाग आणि पाटबंधारे विभागाने बांधलेले कोल्हापूर टाइपचे बंधारे यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे उल्हास नदीमधील कोंडीवडेपासून चांदईपर्यंतच्या भागात असलेल्या कोल्हापूर टाइपच्या बंधाºयात पाणी साठत नाही.तिच अवस्था चिल्हार नदीमधील कोल्हापूर टाइपच्या बंधाºयाची झाली असून, शासनाने कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जुन्या बंधाºयांची दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी आमदार थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यावेळी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.