शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील जलस्रोतांचे संवर्धन करा- महेंद्र थोरवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:06 IST

जलसंधारणमंत्र्यांकडे पाझर तलाव, केटी बंधाऱ्यांची मागणी

कर्जत : तालुक्यातील उन्हाळ्यात कोरड्या असलेल्या नद्यांमध्ये कोल्हापूर टाइपचे बंधारे आणि पाझर तलावांची किमान ३० वर्षे नवीन बांधणी झालेली नाही, तसेच असलेले जुने बंधारे, तसेच सहापैकी चार पाझर तलावांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे कर्जत तालुक्यातील पाण्याचे स्रोतांचे जतन करून, संवर्धन करण्याच्या मागणीसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांची भेट घेऊन मागणी केली.रायगड जिल्ह्यातील जलसंधारण विभागासंदर्भात राज्याचे जलसंधारणमंत्री शंकर गडाख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जतमधील जलसंधारण संदर्भात चर्चा केली. कर्जत तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे. येथील शेतकरी शेतीशिवाय कोणताही व्यवसाय नाही. औद्योगिक वसाहतींना परवानगी नसल्याने स्थानिक शेतकरी भाजीपाला, दुग्धव्यवसाय, मासे व्यवसाय, फळ लागवड आदी जोडधंदे करीत असतात. यासाठी शेतकऱ्यांना लागणाºया पाण्याची आवश्यकता असते. मात्र, कर्जत तालुक्यातील उल्हासनदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. मात्र, तालुक्यातील चिल्हार आणि पोसरी या नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात.त्यात कर्जत तालुक्यात १९८० नंतर एकही नवीन पाझर तलाव बांधण्यात आलेल्या नाही, याची माहिती मंत्र गडाख यांना दिली. त्यात १९८०च्या दशकात बांधण्यात आलेले सर्व सहा पाझर तलाव यांच्यापैकी डोंगर पाडा आणि सोलन पाडा या दोनच पाझर तलाव यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अन्य पाझर तलाव हे कधीही फुटू शकतात, अशी भीती स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.खांडपे, साळोख, कशेळे, खांडस या पाझर तलावांची शासनाने तात्काळ दुरुस्ती करावी आणि त्यातील पाणीसाठा यांचा योग्य वापर करावा, अशी सूचना केली, तसेच पाझर तलाव यांच्या दुरुस्तीबरोबर नांदगाव, गुडवण, ओलमन आदी ठिकाणी नवीन पाझर तलावांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव आमदार महेंद्र थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यापुढे ठेवला आहे.कर्जत तालुक्यात जलसंधारण विभाग आणि पाटबंधारे विभागाने बांधलेले कोल्हापूर टाइपचे बंधारे यांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे उल्हास नदीमधील कोंडीवडेपासून चांदईपर्यंतच्या भागात असलेल्या कोल्हापूर टाइपच्या बंधाºयात पाणी साठत नाही.तिच अवस्था चिल्हार नदीमधील कोल्हापूर टाइपच्या बंधाºयाची झाली असून, शासनाने कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जुन्या बंधाºयांची दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी आमदार थोरवे यांनी राज्याचे जलसंधारणमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यावेळी रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते.