शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

महाराष्ट्र-गुजरातच्या नद्या जोडणार

By admin | Updated: January 20, 2016 02:03 IST

पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे.

पनवेल : पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी आतापासून नियोजन हाती घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केले. ओडिशा येथील कार्यक्रम आटपून रेल्वेमार्गे भारती पनवेलला आल्या होत्या. याठिकाणी विश्रामगृहात पत्रकारांशी सदिच्छा भेट घेतल्यावर त्या मुंबईला रवाना झाल्या. गंगा स्वच्छता अभियानावर दृष्टिक्षेप टाकताना भारती म्हणाल्या की, हे अभियान यशस्वी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आग्रही आहेत. गंगेच्या पात्रात स्वच्छता अभियान प्रभावीपणे हाती घेण्यात आले असून, दोन ते तीन वर्षांत नदी स्वच्छ होईल. गंगेच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकडेही सरकार लक्ष देत असल्याचे भारती यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तापी नदीचे पाणी जमिनीत सोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, बांधकाम सभापती राजू सोनी, पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील, तहसीलदार दीपक आकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आमदार प्रशांत ठाकूर हे युवा आमदार असून त्यांचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगत उमा भारती यांनी कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भीमाशंकरला जाताना आपण एकदा पनवेलला थांबले होतो, त्यानंतर आता योग आल्याचे भारती यांनी सांगितले.