शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

महाराष्ट्र-गुजरातच्या नद्या जोडणार

By admin | Updated: January 20, 2016 02:03 IST

पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे.

पनवेल : पाणीप्रश्न निकाली काढण्याकरिता महाराष्ट्र आणि गुजरातच्या नद्या जोडण्यात येणार आहेत. याशिवाय अन्य उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे. भविष्यात पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी आतापासून नियोजन हाती घेतले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केले. ओडिशा येथील कार्यक्रम आटपून रेल्वेमार्गे भारती पनवेलला आल्या होत्या. याठिकाणी विश्रामगृहात पत्रकारांशी सदिच्छा भेट घेतल्यावर त्या मुंबईला रवाना झाल्या. गंगा स्वच्छता अभियानावर दृष्टिक्षेप टाकताना भारती म्हणाल्या की, हे अभियान यशस्वी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: आग्रही आहेत. गंगेच्या पात्रात स्वच्छता अभियान प्रभावीपणे हाती घेण्यात आले असून, दोन ते तीन वर्षांत नदी स्वच्छ होईल. गंगेच्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याकडेही सरकार लक्ष देत असल्याचे भारती यांनी सांगितले. जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तापी नदीचे पाणी जमिनीत सोडण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळता येणार असून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणता येणार आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याचेही भारती यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी केंद्रीय मंत्री उमा भारती यांचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षा चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती सीता पाटील, बांधकाम सभापती राजू सोनी, पंचायत समितीचे सदस्य नीलेश पाटील, तहसीलदार दीपक आकडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बाजारे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)आमदार प्रशांत ठाकूर हे युवा आमदार असून त्यांचे काम अतिशय चांगले असल्याचे सांगत उमा भारती यांनी कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. भीमाशंकरला जाताना आपण एकदा पनवेलला थांबले होतो, त्यानंतर आता योग आल्याचे भारती यांनी सांगितले.