शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यात पीकविमा योजनेबाबत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 01:03 IST

परतीच्या पावसात झालेल्या पीकनुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी धडपडत असताना कृषी, महसूल ग्रामपंचायत किंवा पीकविमा कंपनी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाला आहे.

संजय गायकवाड कर्जत : परतीच्या पावसात झालेल्या पीकनुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी धडपडत असताना कृषी, महसूल ग्रामपंचायत किंवा पीकविमा कंपनी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हतबल झाला आहे. पीकविमा कंपनीने केवळ एका कर्मचाऱ्यावर संपूर्ण तालुक्याची जबाबदारी सोपवली असून हे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करणार असल्याने हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची हेळसांड सुरू असल्याचे वास्तव समोर येत आहे.जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार महसूल, कृषी, ग्रामपंचायत या विभागांनी पथके तयार करून तातडीने शेतपीकनुकसानीचे पंचनामे करणे अपेक्षित आहे. मात्र, अजून कोणत्याही शेतकºयांच्या बांधावर असे कुठलेही पथक पोहोचलेले नाही. पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत लाभ मिळावा, याकरिता शेतकºयांनी अर्ज भरलेले आहेत. मात्र, हे भरलेले अर्ज जमा कुठे करायचे, याबाबत ग्रामीण भागातील शेतकरी अनभिज्ञ असल्याने वेळेत अर्ज दाखल होऊन विम्याची रक्कम मिळेल की नाही, याची शाश्वती वाटत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. अ‍ॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पीकविमा कंपनीचा इमेल असल्याचा व जिल्हा समन्वयक यांचा फोन नंबरही बरोबर नसल्याचा आरोप शेतकºयांकडून केला जात आहे.संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी एकाच कर्मचाºयाची नियुक्ती केली असून हा कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केल्याशिवाय पंचनामा स्वीकारणार नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली. या कर्मचाºयांशी फोनवर संपर्क केला असता कर्जत तालुक्यात अजूनही पंचनामे सुरू झाले नसून एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतावर जाऊन पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे आधीच पावसाने अडलेला शेतकरी पीकविम्याचे भरलेले अर्ज घेऊन सेवा सोसायटी, बँक, कृषी विभाग यांच्याकडे आलटून पालटून चकरा मारताना दिसत आहे.>तक्रार निवारण समितीबाबत शेतकरी अनभिज्ञपंतप्रधान पीकविमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकºयांना लाभ मिळावा व त्यांच्या तक्रारीचे स्थानिक पातळीवर निरसन व्हावे, या उद्देशाने कृषी विभागाने १२ जुलैला एक अध्यादेश पारित करून तालुका तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे आदेश दिले होते.तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, दोन शेतकरी प्रतिनिधी, विमा कंपनी प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्राचे प्रतिनिधी, जिल्हा सहकारी बँक प्रतिनिधी यांचा समावेश असलेली अशी तक्रार निवारण समिती कर्जत तालुक्यातही गठीत करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी अधिकाºयांनी दिली. मात्र, शेतकºयांना समितीबाबत कल्पनाच नसल्याने गोंधळात भर पडली आहे.>पीकविमा काढलेल्या शेतकºयांनी आपले अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आधार कार्ड, विमा हप्ता पावती, बँकेच्या तपशिलासह जमा करावेत. या संदर्भात विमा प्रतिनिधीला तत्काळ पंचनामे सुरू करण्याचा सूचना केल्या आहेत.- शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी, कर्जतपीकविमा कंपनीने तालुक्यासाठी एकच कर्मचारी नेमला असून त्यांचाही संपर्क होत नसल्याने व मेलही बंद असल्याने शेतकºयांची कुचंबणा होत आहे. मी स्वत: आठ दिवसांपासून अर्ज घेऊन बँकेत तर कधी तहसील कार्यालयात चकरा मारत आहे, अखेर आजच माझा अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्वीकारला आहे. ग्रामीण भागात तर शेतकºयांना अर्ज कुठे दाखल करायचा याची माहिती नसल्याने विमा प्रक्रिया वेळात होईल की नाही, या विवंचनेत आहेत, त्यामुळे पीकविमा नामंजूर होण्याची भीती वाटत आहे.- शरद रामचंद्र म्हसे, शेतकरी, वारे