शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बोर्लीपंचतन स्थानकावर दिव्यांगांचे हाल; व्हिलचेअर, रॅम्प नसल्याने ज्येष्ठांचीही गैरसाेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 01:30 IST

सुविधा देण्याची प्रवाशांची मागणी 

गणेश प्रभाळेदिघी : एसटी बसस्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी व्हिलचेअर आणि रॅम्प उपलब्ध करून देण्याची घोषणा एसटी महामंडळाकडून करण्यात आली हाेती. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बसस्थानकात अद्याप व्हिलचेअर आणि रॅम्पची सुविधा नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांग प्रवाशांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्वर, दिघी - जंजिरा अशी पर्यटनस्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून येणाऱ्या - जाणाऱ्या ६४ गाड्यांची नोंद होत असून, मुंबई, पुणे शहरांसह गाव खेड्यातील  नागरिक प्रवास करत आहेत. अशा वर्दळीच्या बसस्थानकातून अपंग व वयोवृद्धांना व्हिलचेअर नसल्याने एसटीचा प्रवास करणे जिकिरीचे ठरत आहे.

तालुक्यामध्ये अपंगांची ११०० संख्या असून, यातील जवळपास ७०० नागरिक एसटी प्रवास करतात. याहून जास्त ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. शिवाय येथील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रातील बसस्थानक असल्याने प्रवाशांना एसटीची वाट पाहिल्याशिवाय पर्याय नाही, अशांची व्हिलचेअर अभावी फारच गैरसोय होते. दिव्यांगांना समान संधी व हक्काच्या संरक्षणासाठी अशा सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळाने ही पावले उचलली आहेत. मात्र, ग्रामीण भागातून उलट चित्र पाहायला मिळत आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढण्यासाठी वाहक मदत करेल, असे ‘एसटी’च्या दर्शनी भागावर लिहून असले तरी, ही मानवता अपवादानेच दाखविली जाते. शिवाय बसस्टॉपवरून बसपर्यंत पोहोचण्यासाठी दिव्यांगांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. परंतु प्रवाशांच्या गर्दीमध्ये मिळणारा हा मानवी आधारदेखील कुचकामी ठरतो, असे अपंग प्रवाशांकडून सांगण्यात येते.

बोर्लीपंचतन बसस्थानकामध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांकरिता व्हीलचेअर असावी तसेच एसटीमध्ये रिझर्व्ह असलेले दिव्यांगांचे आसन हे रिझर्व्हच ठेवले जावे. त्याठिकाणी अन्य प्रवाशांना बसू देऊ नये.-नीलेश नाक्ती, दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष

बोर्लीपंचतन एसटी स्थानक हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. अनेकवेळा येथे दिव्यांग प्रवासी येतात मात्र शेडखाली बसायला रॅम्प नसल्याने जाता येत नाही. त्यामुळे तसा रॅम्प हा बोर्लीपंचतन बस स्टँडला बांधला गेल्यास दिव्यांगांसाठी सोयीचे ठरेल. एसटी प्रशासनाने याचा विचार करावा.  -दिव्यांग प्रवासी

बसस्थानकात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हिलचेअरसह रॅम्पची सुविधा करणे गरजेचे आहे. तसा नियम आहे; मात्र त्याकडे साेयीस्करपणे डाेळेझाक केली जाते. व्हिलचेअर आणि रॅम्प नसल्याने प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागताे. -ज्येष्ठ नागरिक

श्रीवर्धन आगार व्यवस्थापनाकडून या समस्येचे निवारण करण्यात येईल. लवकरच रॅम्प बांधून व्हिलचेअरची सुविधा दिली जाईल. त्यामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना हाेणाऱ्या त्रासातून त्यांची सुटका हाेईल. -तेजस गायकवाड, आगार व्यवस्थापक, श्रीवर्धन

टॅग्स :state transportएसटी