शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: March 7, 2017 02:45 IST

राज्यातील संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांनी ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रामध्ये नियुक्ती मिळावी

बरवाडी : राज्यातील संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांनी ‘आपले सरकार’ सेवाकेंद्रामध्ये नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी बुधवार, १ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. २०११ पासून सुरू असलेले संग्राम योजनेची मुदत डिसेंबर २०१५मध्ये संपलेली असताना मुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री यांच्या आश्वासनानंतर राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांनी विनामानधन काम सुरू ठेवले होते. शासन निर्णयानुसार ११ आॅगस्ट, २०१६ला संग्राम प्रकल्पाऐवजी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र या प्रकल्पाची घोषणा करून त्यात या संगणक परिचालकांना सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते; परंतु शासन निर्णयातील १५ लाख रु पये उत्पन्न निधीच्या अटीमुळे, तसेच पंचायत समिती स्तरावर चुकीच्या पद्धतीने पडलेल्या क्लस्टरमुळे सेवा केंद्रांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील सुमारे २७५ संगणक परिचालकांना घरी बसण्याची वेळ आल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. गेले सहा महिने उलटूनही या परिचालकांना न्याय मिळालेला नाही.‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र करण्याचे मानस असून शासनाच्या हलगर्जीमुळे गेल्या पाच वर्षांपासून संग्राम प्रकल्पात काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांची नियुक्ती नसल्याने ते बेमुदत कामबंद आंदोलन करीत असल्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले असून, रायगड जिल्ह्यासह विविध ठिकाणी हे आंदोलन सुरू झाले आहे. संग्राम प्रकल्पात काम केलेले जिल्ह्यातील एकूण एक संगणक परिचालक ‘आपले सरकार’ सेवा केंद्र प्रकल्पामध्ये नियुक्त झाल्याशिवाय जिल्ह्यात एकही ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू होऊ देणार नाही. गरज भासली तर मंत्रालयावर मोर्चाची तयारी के ली असल्याची प्रतिक्रियाराज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.>रायगड जिल्हा संगणक परिचालक संघटना सहभागी आपले रायगड जिल्ह्यात एकूण ८२९ ग्रामपंचायती असून संग्राम प्रकल्पामध्ये सुमारे ६५० संगणक परिचालक कार्यरत होते. आता संग्राम बंद होऊन राज्य शासनाने ‘आपले सरकार’ सेवा केंद्र हा नवीन प्रकल्प आणला असून, त्यासाठी संग्राममधील सुमारे ५०० संगणक परिचालक परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. संग्राम प्रकल्पातील सर्व संगणक परिचालकांना नवीन प्रकल्पात समाविष्ट करण्यात येईल, असे आश्वासन राज्य शासनाने वेळोवेळी आम्हाला दिले आहे; परंतु शासन निर्णयातील जाचक अटी, तसेच पंचायत समिती स्तरावर पाडलेल्या चुकीच्या क्लस्टरमुळे रायगड जिल्ह्यात फक्त२७६ संगणक परिचालकांची नियुक्ती के ली असून,सुमारे २२५ संगणक परिचालकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड आली आहे. त्यामुळे १ मार्चपासून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या राज्यस्तरीय कामबंद आंदोलनाला रायगड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देत आम्ही संगणक परिचालक या कामबंदमध्ये सहभागी होत आहोत, असे कांबळे यांनी सांगितले.