शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

माकपाच्या सरकारविरोधी रास्ता रोकोला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 3, 2015 02:47 IST

भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार,

जव्हार : भाजपप्रणीत केंद्र सरकार तसेच राज्य सरकारची धनिकधार्जिणी धोरणे, धर्मांध आणि भ्रष्ट कारभाराविरुद्ध मार्क्सवादी आणि जनसंघटना तालुका कमिटी विक्रमगड यांच्यातर्फे जव्हार, विक्रमगड, वाडा, डहाणू येथील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी बुधवारी रास्ता रोको करण्यात आले. त्याला पालघर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद लाभला असला तरी जव्हारमध्ये त्याचा परीणाम दिसून आला.या वेळी तलावली-वेहेलपाडा येथे यशवंत गरेल, सरपंच, बाबुलाल फडवळे यांच्या नेतृत्वाखाली १०० ते १२५ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला, तर तलवाडा येथे तालुका कमिटी सदस्य संजय काकड, अमृत भावर, चंदू भावर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. कासा येथे चंद्रकांत वरठा, विभागीय सचिव चिंतामण लाबड आणि कॉ. एडवर्ड वरठा यांच्या नेतृत्वाखाली ४०० ते ५०० कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. विक्रमगड नाका, घोलवड, सावटा, उपराळे, डहाणू, वाणगाव, तलासरी येथेही मोठ्या संख्येने मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला.या रास्ता रोकोमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. लांबून येणारे प्रवासी रास्ता रोकोमध्ये अडकल्यामुळे त्यांना अतोनात त्रास सहन करावा लागला. (वार्ताहर)सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियनतर्फे पुकारलेल्या देशव्यापी बंदला तलासरीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तलासरीत बाजारपेठ पूर्णत: बंद होती, तर तालुक्यातील चार ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रास्ता रोको करण्यात आल्याने दुपारपर्यंत वाहतूक ठप्प झाली. या बंदचा फटका नागरिकांबरोबर शालेय विद्यार्थ्यांनाही बसला. बंदच्या पार्श्वभूमीवर तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. ग्रामसेवक संघटनाही बंदमध्ये उतरल्याने ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाला. तसेच अंगणवाडी कार्यकर्त्याही संपात उतरल्या. वाहतूक बंद पडल्याने विद्यार्थ्यांना ६ ते ७ कि.मी. पायी चालत शाळेत यावे लागले.तलासरी-उधवा रोडवर मोडगावफाटा, तलासरी-उंबरगाव रोडवर वडवली नाका, करजगाव ते उंबरगाव रोडवर वसा-डोंगरीपाडा, आमगाव-संजान रोडवर आमगाव-मांगातपाडा येथील वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. या भागातील कारखाने, कॉलेजही बंद ठेवण्यात आली होती. तसेच भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकारने कामगार कायद्यात व भूसंपादन कायद्यात भयानक बदल केल्याने लाल बावटा जिल्हा कामगार युनियन यांच्या वतीने तलासरीत रॅलीचेही आयोजन करण्यात आले.