शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ४० टक्के भात लावण्या पूर्ण

By admin | Updated: July 4, 2017 06:59 IST

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकू ण भात लावणी क्षेत्राच्या ४० टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रावर भात लावण्या जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत; परंतु प्रत्यक्षात १ लाख १० हजार हेक्टरावर भात लावण्या होतील, अशी अपेक्षा असल्याचे तरकसे यांनी सांगितले. जिल्ह्यात गतवर्षी ३ जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते. ते यंदा याच कालावधीत म्हणजे ३ जुलै २०१७पर्यंत १००१.२८ झाले आहे. यंदाचे सरासरी पर्जन्यमान गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाले असून, ते भात पिकाकरिता चांगले असल्याची माहिती कृतिशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली. यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्याने आणि भात पिकासाठी पोषण हवामान असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११३.५० मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. अलिबाग १७, पेण ४३.२०, मुरुड ०९, पनवेल ३६.४०, उरण २२, कर्जत ६५, खालापूर ५७, रोहा ४२, पाली-सुधागड ५१, तळा ४७, महाड ४५, पोलादपूर ५५, म्हसळा १७, तर श्रीवर्धन येथे २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मजूर मिळत नसल्याने अडचणपाली : पावसाला सुरुवात झाल्यापासून कधी पाऊस, तर कधी ऊन अशी अवस्था होती; परंतु नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बैलाच्या साहाय्याने नांगर घेऊन, तर कोणी आधुनिकयंत्रे घेऊन लावणी करण्यास सुरुवात केली आहे; परंतु या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. सकाळी उठल्यानंतर लावणीची कामे पूर्ण कशी होणार? ही चिंता घेऊन आदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. तर ज्याच्याकडे बैलजोडी नाही, ते दुसऱ्याच्या आधाराखाली आपल्या लावणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. मग शेतकरी आपल्या कुटुंबातील व नात्यातील मंडळींना घेऊन भात लावणीच्या कामास सुरुवात करत आहेत.मुरु डमध्ये लावणीला सुरु वातआगरदांडा : मुरु ड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. त्यापैकी ९० टक्के भातपिकाची लागवड करण्यात आली. यंदा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीला सुरुवात केली होती. लवकर पेरणी केल्याने लावणीयुक्त रोपे लवकर तयार झाली. मुरु ड पंचक्र ोशीतील शेतकरी विविध प्रकारच्या भातांची लागवड करत आहेत. चांगल्या पावसामुळे शेतातील सर्व भागात पाणीच पाणी साचले आहे. पावसाचा जोर आता कमी होताच, शेतकरी लावणीच्या कामात गर्क झालेला पाहावयास मिळत आहे.