शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

जिल्ह्यातील ४० टक्के भात लावण्या पूर्ण

By admin | Updated: July 4, 2017 06:59 IST

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकू ण भात लावणी क्षेत्राच्या ४० टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रावर भात लावण्या जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत; परंतु प्रत्यक्षात १ लाख १० हजार हेक्टरावर भात लावण्या होतील, अशी अपेक्षा असल्याचे तरकसे यांनी सांगितले. जिल्ह्यात गतवर्षी ३ जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते. ते यंदा याच कालावधीत म्हणजे ३ जुलै २०१७पर्यंत १००१.२८ झाले आहे. यंदाचे सरासरी पर्जन्यमान गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाले असून, ते भात पिकाकरिता चांगले असल्याची माहिती कृतिशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली. यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्याने आणि भात पिकासाठी पोषण हवामान असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११३.५० मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. अलिबाग १७, पेण ४३.२०, मुरुड ०९, पनवेल ३६.४०, उरण २२, कर्जत ६५, खालापूर ५७, रोहा ४२, पाली-सुधागड ५१, तळा ४७, महाड ४५, पोलादपूर ५५, म्हसळा १७, तर श्रीवर्धन येथे २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मजूर मिळत नसल्याने अडचणपाली : पावसाला सुरुवात झाल्यापासून कधी पाऊस, तर कधी ऊन अशी अवस्था होती; परंतु नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बैलाच्या साहाय्याने नांगर घेऊन, तर कोणी आधुनिकयंत्रे घेऊन लावणी करण्यास सुरुवात केली आहे; परंतु या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. सकाळी उठल्यानंतर लावणीची कामे पूर्ण कशी होणार? ही चिंता घेऊन आदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. तर ज्याच्याकडे बैलजोडी नाही, ते दुसऱ्याच्या आधाराखाली आपल्या लावणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. मग शेतकरी आपल्या कुटुंबातील व नात्यातील मंडळींना घेऊन भात लावणीच्या कामास सुरुवात करत आहेत.मुरु डमध्ये लावणीला सुरु वातआगरदांडा : मुरु ड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. त्यापैकी ९० टक्के भातपिकाची लागवड करण्यात आली. यंदा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीला सुरुवात केली होती. लवकर पेरणी केल्याने लावणीयुक्त रोपे लवकर तयार झाली. मुरु ड पंचक्र ोशीतील शेतकरी विविध प्रकारच्या भातांची लागवड करत आहेत. चांगल्या पावसामुळे शेतातील सर्व भागात पाणीच पाणी साचले आहे. पावसाचा जोर आता कमी होताच, शेतकरी लावणीच्या कामात गर्क झालेला पाहावयास मिळत आहे.