शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

जिल्ह्यातील ४० टक्के भात लावण्या पूर्ण

By admin | Updated: July 4, 2017 06:59 IST

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार

विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर रविवारपासून ओसरल्याने, लावण्यांकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजे एकू ण भात लावणी क्षेत्राच्या ४० टक्के भात लावण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित क्षेत्रावर भात लावण्या जोरात सुरू असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लावण्या प्रस्तावित आहेत; परंतु प्रत्यक्षात १ लाख १० हजार हेक्टरावर भात लावण्या होतील, अशी अपेक्षा असल्याचे तरकसे यांनी सांगितले. जिल्ह्यात गतवर्षी ३ जुलै २०१६पर्यंत सरासरी पर्जन्यमान ९९३ मि.मी. झाले होते. ते यंदा याच कालावधीत म्हणजे ३ जुलै २०१७पर्यंत १००१.२८ झाले आहे. यंदाचे सरासरी पर्जन्यमान गतवर्षीच्या तुलनेत अधिक झाले असून, ते भात पिकाकरिता चांगले असल्याची माहिती कृतिशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी दिली. यंदा पाऊस वेळेत दाखल झाल्याने आणि भात पिकासाठी पोषण हवामान असल्याने चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.सोमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ११३.५० मि.मी. पावसाची नोंद माथेरान येथे झाली आहे. अलिबाग १७, पेण ४३.२०, मुरुड ०९, पनवेल ३६.४०, उरण २२, कर्जत ६५, खालापूर ५७, रोहा ४२, पाली-सुधागड ५१, तळा ४७, महाड ४५, पोलादपूर ५५, म्हसळा १७, तर श्रीवर्धन येथे २५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.मजूर मिळत नसल्याने अडचणपाली : पावसाला सुरुवात झाल्यापासून कधी पाऊस, तर कधी ऊन अशी अवस्था होती; परंतु नंतर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी बैलाच्या साहाय्याने नांगर घेऊन, तर कोणी आधुनिकयंत्रे घेऊन लावणी करण्यास सुरुवात केली आहे; परंतु या कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. सकाळी उठल्यानंतर लावणीची कामे पूर्ण कशी होणार? ही चिंता घेऊन आदिवासीवाडी व गावागावांत जाऊन मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे. तर ज्याच्याकडे बैलजोडी नाही, ते दुसऱ्याच्या आधाराखाली आपल्या लावणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. मग शेतकरी आपल्या कुटुंबातील व नात्यातील मंडळींना घेऊन भात लावणीच्या कामास सुरुवात करत आहेत.मुरु डमध्ये लावणीला सुरु वातआगरदांडा : मुरु ड तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रात भातपिकासाठी लागवड केली जाते. त्यापैकी ९० टक्के भातपिकाची लागवड करण्यात आली. यंदा पाऊस जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने पेरणीला सुरुवात केली होती. लवकर पेरणी केल्याने लावणीयुक्त रोपे लवकर तयार झाली. मुरु ड पंचक्र ोशीतील शेतकरी विविध प्रकारच्या भातांची लागवड करत आहेत. चांगल्या पावसामुळे शेतातील सर्व भागात पाणीच पाणी साचले आहे. पावसाचा जोर आता कमी होताच, शेतकरी लावणीच्या कामात गर्क झालेला पाहावयास मिळत आहे.