शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा वृक्षतोडप्रकरणाची तक्रार वनमंत्र्याकडे; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:29 IST

स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे

पनवेल : कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत खासगी वने असलेल्या जमिनीवरील वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे. या घटनेची तक्रार जिल्हा उपवनसंरक्षकाकडे करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या सुरक्षारक्षकावर केलेला गुन्हा मागे घेऊन संबंधित जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तारा गावाशेजारी असलेल्या जागेतील वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित वनअधिकारी वनपाल यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी या जागेत अवघ्या महिन्याभरापूर्वी मोलमजुरीसाठी रोजंदारीवर काम करणाºया खैराटवाडी आदिवासी वाडीतील बाळाराम पवार ह्या मजुरावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा प्रकार मूळ मालकाला वाचविण्याचा असून, संबंधित जागेचे मालक व मशीन लावून वृक्षतोड करणाºया ठेकेदारावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होणे अपेक्षित असताना, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे संतोष ठाकूर यांचे म्हणणे आहे.

पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांना २२ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून केलेल्या कारवाईचे दस्तावेज महितीसाठी देण्यात येण्याची मागणी केली, परंतु आजतगायत काय कारवाई झाली, त्याची माहिती मिळालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. या प्रकरणाची उपवनसंरक्षक कार्यालयाकडून चौकशी करून जमीनमालक व वृक्षतोड करणाºया ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी वनविभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली आहे.केंद्र सरकारची पूर्वपरवानगी गरजेची

  • केंद्र शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वनेतर कामास बंदी आहे, महाराष्ट्र खासगी वने अधिनियम अंतर्गत कलम २२ अ अंतर्गत खासगी वने हा कायदा लागू असताना, स्थानिक वनविभाग कर्मचाऱ्यांच्या व जमीन मालकाच्या संगनमताने सुमारे तीस वर्षे जुनी सागवान, करंज, गुलमोहर, जांभूळ, आंबा यांसारख्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
  • वृक्षतोडीची वन विभागाकडून कागदोपत्री कोणतीही परवानगी घेतलेली नसताना, संबंधित जमीनमालक व वृक्षतोड करणाºया कंत्राटदारावर आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे.
टॅग्स :forestजंगल