शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कर्नाळा वृक्षतोडप्रकरणाची तक्रार वनमंत्र्याकडे; गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 23:29 IST

स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे

पनवेल : कर्नाळा ग्रामपंचायत हद्दीत खासगी वने असलेल्या जमिनीवरील वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी यांनी थेट वनमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कामावर असलेल्या आदिवासी समाजाच्या बांधवावर गुन्हा दाखल करून मूळ मालकाला संरक्षण दिले आहे. या घटनेची तक्रार जिल्हा उपवनसंरक्षकाकडे करण्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या सुरक्षारक्षकावर केलेला गुन्हा मागे घेऊन संबंधित जमीन मालकावर गुन्हा दाखल करण्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पनवेल तालुक्यातील कर्नाळा ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील तारा गावाशेजारी असलेल्या जागेतील वृक्षतोड करण्यात आली आहे. संबंधित वनअधिकारी वनपाल यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी या जागेत अवघ्या महिन्याभरापूर्वी मोलमजुरीसाठी रोजंदारीवर काम करणाºया खैराटवाडी आदिवासी वाडीतील बाळाराम पवार ह्या मजुरावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा प्रकार मूळ मालकाला वाचविण्याचा असून, संबंधित जागेचे मालक व मशीन लावून वृक्षतोड करणाºया ठेकेदारावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होणे अपेक्षित असताना, अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे संतोष ठाकूर यांचे म्हणणे आहे.

पनवेलचे वनपरिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनावणे यांना २२ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून केलेल्या कारवाईचे दस्तावेज महितीसाठी देण्यात येण्याची मागणी केली, परंतु आजतगायत काय कारवाई झाली, त्याची माहिती मिळालेली नसल्याची तक्रार त्यांनी केली. या प्रकरणाची उपवनसंरक्षक कार्यालयाकडून चौकशी करून जमीनमालक व वृक्षतोड करणाºया ठेकेदारांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी वनविभागाचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे केली आहे.केंद्र सरकारची पूर्वपरवानगी गरजेची

  • केंद्र शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय वनेतर कामास बंदी आहे, महाराष्ट्र खासगी वने अधिनियम अंतर्गत कलम २२ अ अंतर्गत खासगी वने हा कायदा लागू असताना, स्थानिक वनविभाग कर्मचाऱ्यांच्या व जमीन मालकाच्या संगनमताने सुमारे तीस वर्षे जुनी सागवान, करंज, गुलमोहर, जांभूळ, आंबा यांसारख्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
  • वृक्षतोडीची वन विभागाकडून कागदोपत्री कोणतीही परवानगी घेतलेली नसताना, संबंधित जमीनमालक व वृक्षतोड करणाºया कंत्राटदारावर आजपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आले नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांनी तक्रारीत म्हटले आहे.
टॅग्स :forestजंगल