शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

नांदगाव भागात भरपाईची रक्कम त्वरित मिळावी; नारळ, सुपारीच्या बागांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 00:50 IST

अंकिता दळवी यांची मागणी, याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारीची सर्वाधिक झाडे मुळासकट पडली आहेत

मुरुड : तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील असंख्य नारळ-सुपारीच्या बागा आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे आमच्या परिसरातील हजारोच्या संख्येने सुपारी व नारळाची झाडे पडली आहेत. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला, तरी बागायतदारांना भरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. पैसे येऊनसुद्धा वाटप करण्यास दिरंगाई का? तहसीलदारांनी तातडीने वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायत सदस्या अंकिता दळवी यांनी केली आहे. त्या नांदगाव भागातील बगायतदारांचे जे नुकसान झाले आहे, त्याबाबत विस्तृत प्रमाणात माहिती देताना पत्रकारांशी बोलत होत्या.

याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्यातील सर्वात जास्त बागायत जमीन नांदगावमध्ये आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे सुपारीची सर्वाधिक झाडे मुळासकट पडली आहेत. ही पडलेली झाडे बागायत जमिनीतून हटविण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना मजूर घेऊन मोठा खर्च आला आहे. त्याचप्रमाणे, सुपारीचे पीक गेल्याने शेतकरी दु:खी झाला आहे. झाडे मुळासकट पडल्याने पुन्हा शेतकºयाला पीक घेता येणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊनसुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप भरपाई मिळत नाही. शेतकºयांना तातडीची मदत करणे आवश्यक असताना, विलंब होत असल्याबाबत अंकिता दळवी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मुरुड तहसील कार्यालयात बागायत व फळबागांसाठी तीन कोटी २२ लाख रुपये प्राप्त झाले. ४२५ लाभार्थ्यांना आतापर्यंत ३६ लाख तीन हजार ५०० रुपये वाटप केले आहेत. बागायत जमिनीसाठी शासन निर्णय हेक्टरी ५० हजार या नियमाप्रमाणे पैशाचे वाटप करीत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही. डी. अहिरे यांनी ‘लोकमत’ला दिली.८,६२५ शेतकºयांचे पंचनामेमुरुड तालुक्यातील एक हजार हेक्टर क्षेत्रापैकी ८,६२५ शेतकºयांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या सर्वांना नुकसान भरपाई देणार असून लवकरच नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांत पैसे जमा होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी व्ही.डी.अहिरे यांनीदिली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ