शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
2
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
3
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
4
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
5
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
6
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
7
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
8
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
9
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
10
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
11
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
12
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
13
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
14
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
16
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
17
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
18
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
19
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
20
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)

मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना देणार मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 23:26 IST

सध्याच्या घडीला संशोधन केंद्रात नऊ टन भात बियाणे उपलब्ध असल्याचे डॉ. सुरेश दोडके यांनी सांगितले. शेतकºयांनी शेत बियाणांसाठी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

वैभव गायकरपनवेल : शहरातील खार जमीन संशोधन केंद्रात मान्सूनपूर्व कामांच्या दृष्टीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणारे पनवेलमधील खार जमीन संशोधन केंद्र महाराष्ट्रातील एकमेव केंद्र आहे. शेती व मत्स्य उद्योगांसंबंधित संशोधन करणारे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उत्तर कोकण किनारपट्टीवरील हे महत्त्वाचे केंद्र आहे. गतपावसाळ्यात केंद्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. मत्स्यशेतीचेही मोठे नुकसान झाले होते. त्यादृष्टीने संशोधन केंद्राच्या माध्यमातून यंदा उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत.

लॉकडाउनचा केंद्रालाही फटका बसला असून शेतीविषयक रद्द करण्यात आल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे डॉ. सुरेश दोडके यांनी दिली. लॉकडाउनमुळे मनुष्यबळाअभावी मत्स्यशेतीदेखील अडचणीत आल्याचे मत्स्यशास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक यांनी सांगितले. खाडीच्या पाण्यामुळे क्षारमय झालेल्या जमिनीवर शेती तसेच मत्स्यविषयातून उत्पादन वाढवण्याकरिता वेगवेगळ्या भाताच्या जाती विकसित करणे, एकात्मिक शेतीपद्धतीबाबत संशोधन करणे, मत्स्य पिंजरा, एकात्मिक मत्स्यसंवर्धन प्रकल्प, मत्स्य खाद्य, प्रजैविक वापर, जिताडा मत्स्यसंवर्धन व इतर अनेक महत्त्वाचे व शेतकरीभिमुख संशोधन व विस्तार कार्य केंद्रावर राबवले जात आहे. सध्या देशभरात लॉकडाउन असतानाही कृषी विद्यापीठ व त्याअंतर्गत संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना देऊन उत्पादनासह आर्थिक उत्पन्न कशाप्रकारे टिकवून ठेवता येईल, याबाबतीत मार्गदर्शन करीत आहे.

मत्स्य व्यवसाय व कृषी क्षेत्रास केंद्र तसेच राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून सूट देऊन यातील महत्त्वाच्या कामांना बंधन न घालता सामाजिक अंतर व कोविडची नियमावली पाळून चालू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी तसेच संशोधन केंद्र्राची पावसाळ्यापूर्वीची कामे पार पाडू शकणार आहेत. सध्याच्या घडीला संशोधन केंद्रात नऊ टन भात बियाणे उपलब्ध असल्याचे डॉ. सुरेश दोडके यांनी सांगितले. शेतकºयांनी शेत बियाणांसाठी केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्रक्षार जमिनीवर संशोधन करणारे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्राची स्थापना १९४३ मध्ये कृषी संशोधन केंद्र म्हणून झाली. १९५९ मध्ये कृषी संशोधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-१ आणि योजना-१ यामधून पुरविण्यात आल्या. केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगाव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे.