शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

जिल्हाधिकारी देणार फौजी आंबवडेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:29 IST

पहिल्या महायुद्धापासून अनन्यसाधाराण शौर्यांची परंपरा अबाधीत राखलेल्या आणि आजही भारतीय लष्करात देशसेवेसाठी कार्यरत ३०० जवानांच्या महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव

अलिबाग : पहिल्या महायुद्धापासून अनन्यसाधाराण शौर्यांची परंपरा अबाधीत राखलेल्या आणि आजही भारतीय लष्करात देशसेवेसाठी कार्यरत ३०० जवानांच्या महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त ‘फौजी आंबवडे गाव विकासापासून वंचित’ या विशेष वृत्तातून शासनाची निष्क्रीयता ‘लोकमत’ने सर्वांसमोर मांडली. यानंतर शासकीय यंत्रणेत मोठीच धावपळ उडाली. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी फौजी आंबवडे गावाबाबतचे आपले अहवाल तत्काळ पाठवावेत, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेआहेत.आपण स्वत: फौजी आंबवडे गावांत जाऊन पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकार एकीकडे मोठा डांगोरा पिटत असताना, राज्यात माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार गंभीर नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.रायगडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव यांच्याकडे रायगडसह पालघर, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या तब्बल सहा जिल्ह्यांचा पदभार आहे. शासन जिल्हानिहाय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी देऊ शकले नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.दरम्यान, फौजी आंबवडे गावांच्या अक्षम्य गंभीर परिस्थिती ‘लोकमत’च्या वृत्ताच्या अनुषंगाने माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संवेदनशीलतेने या परिस्थितीकडे पाहून फौजी आंबवडेगावांच्या विकासाकरिता विशेष निधी उपलब्ध करून देऊन, थेट आपल्या देखरेखीखाली गावाची विकास योजना राबवावी, अशी विनंती केली आहे.