शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

जिल्हाधिकारी देणार फौजी आंबवडेला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:29 IST

पहिल्या महायुद्धापासून अनन्यसाधाराण शौर्यांची परंपरा अबाधीत राखलेल्या आणि आजही भारतीय लष्करात देशसेवेसाठी कार्यरत ३०० जवानांच्या महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव

अलिबाग : पहिल्या महायुद्धापासून अनन्यसाधाराण शौर्यांची परंपरा अबाधीत राखलेल्या आणि आजही भारतीय लष्करात देशसेवेसाठी कार्यरत ३०० जवानांच्या महाड तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून नावलौकिक प्राप्त ‘फौजी आंबवडे गाव विकासापासून वंचित’ या विशेष वृत्तातून शासनाची निष्क्रीयता ‘लोकमत’ने सर्वांसमोर मांडली. यानंतर शासकीय यंत्रणेत मोठीच धावपळ उडाली. सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी फौजी आंबवडे गावाबाबतचे आपले अहवाल तत्काळ पाठवावेत, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेआहेत.आपण स्वत: फौजी आंबवडे गावांत जाऊन पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माजी सैनिकांच्या कल्याणाकरिता केंद्र सरकार एकीकडे मोठा डांगोरा पिटत असताना, राज्यात माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सरकार गंभीर नसल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे.रायगडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर प्रांजल जाधव यांच्याकडे रायगडसह पालघर, ठाणे, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या तब्बल सहा जिल्ह्यांचा पदभार आहे. शासन जिल्हानिहाय जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी देऊ शकले नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.दरम्यान, फौजी आंबवडे गावांच्या अक्षम्य गंभीर परिस्थिती ‘लोकमत’च्या वृत्ताच्या अनुषंगाने माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संवेदनशीलतेने या परिस्थितीकडे पाहून फौजी आंबवडेगावांच्या विकासाकरिता विशेष निधी उपलब्ध करून देऊन, थेट आपल्या देखरेखीखाली गावाची विकास योजना राबवावी, अशी विनंती केली आहे.