शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

जिल्ह्यात थंडीचा कडाका तापमान १४ अंशापर्यंत खाली : थंडीच्या लाटेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:31 IST

उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. पहाटे सुमारे १४ अंश तर दिवसा १६ अंशापर्यंत तापमान खाली गेले आहे.

अलिबाग : उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. पहाटे सुमारे १४ अंश तर दिवसा १६ अंशापर्यंत तापमान खाली गेले आहे.रायगड हा उद्योगांचा जिल्हा असल्याने येथे स्टील निर्मितीसह केमिकलचे प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत. आरसीएफ, एचपीसीएल, गेल, ओएनजीसी, एचओसी, आयपीसीएल अशा विविध कंपन्यांचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये तीन शिफ्टमध्ये उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील तापमान नेहमीच वाढलेले असते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला तरी, त्या थंडीचा विशेष फटका येथे जाणवत नाही. परंतु गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढल्याने रायगडकरांना मात्रचांगलीच हुडहुडी भरली असल्याचे दिसून येते.उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आल्याने राज्यही चांगलेच गारठले आहे. रायगड जिल्ह्याचे तापमान रात्री आणि पहाटे सुमारे १४ अंश तर, दुपारी १६ अंशापर्यंत खाली उतरत आहे. सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे दिवसाही गारवा जाणवत आहे. रात्री आणि पहाटे त्या गारव्यामध्ये कमालीची वाढ होत असल्याने कडाक्याच्या थंडीचा फटका बसत आहे. वातावरणातील हे तापमान असेच पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याने रात्री परिधान केले जाणारे स्वेटर, जॅकेट, मफलर, शाल अन्य गरम कपडे आता दिवसाही घातले जात आहेत. त्यावरून कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, माथेरान, श्रीवर्धन, महाड येथील रायगड किल्ला येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. नाताळ आणि थर्टी फर्स्टला केलेल्या नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर पर्यटकांची गर्दी कमी होईल असे वाटले होते, मात्र गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे.थंडी वाढल्याने स्वेटर, गरम कपडे खरेदीचा कल वाढल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील दुकानांमधून नागरिकांची गर्दी दिसून येत होती. थंडीच्या कालावधीमध्ये गरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. चहाच्या टपºयांवर वाफाळणारा चहा पिण्यासाठीही गर्दी होताना दिसत आहे.थंडीचा कडाका वाढल्याने गरम पेय पिण्याला पसंती दिली जात आहे. त्यामध्ये मद्याला जास्त पसंती दिली जात असल्याने कोल्ड्रिंक्स, थंड बीअर पिणाºयांची संख्या रोडावल्याचे सांगण्यात येते. जागोजागी रात्रीच्या शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी पोपटी पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. त्यामध्ये स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने पोपटी पार्ट्या करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड