शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

जिल्ह्यात थंडीचा कडाका तापमान १४ अंशापर्यंत खाली : थंडीच्या लाटेचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 02:31 IST

उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. पहाटे सुमारे १४ अंश तर दिवसा १६ अंशापर्यंत तापमान खाली गेले आहे.

अलिबाग : उत्तर भारतामध्ये आलेल्या थंडीच्या लाटेमुळे महाराष्ट्र राज्याच्या दिशेने वाहणारे वारे हे अतिशय थंड आहेत. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमध्ये तापमानात कमालीची घट होऊन येत्या पाच दिवस हुडहुडी कायम राहणार आहे. रायगड जिल्ह्याच्या तापमानावरही त्याचा परिणाम झाला आहे. पहाटे सुमारे १४ अंश तर दिवसा १६ अंशापर्यंत तापमान खाली गेले आहे.रायगड हा उद्योगांचा जिल्हा असल्याने येथे स्टील निर्मितीसह केमिकलचे प्रकल्प मोठ्या संख्येने आहेत. आरसीएफ, एचपीसीएल, गेल, ओएनजीसी, एचओसी, आयपीसीएल अशा विविध कंपन्यांचे जाळे जिल्हाभर पसरलेले आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये तीन शिफ्टमध्ये उत्पादन घेतले जाते. त्यामुळे येथील तापमान नेहमीच वाढलेले असते. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला तरी, त्या थंडीचा विशेष फटका येथे जाणवत नाही. परंतु गेले काही दिवस थंडीचा कडाका वाढल्याने रायगडकरांना मात्रचांगलीच हुडहुडी भरली असल्याचे दिसून येते.उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आल्याने राज्यही चांगलेच गारठले आहे. रायगड जिल्ह्याचे तापमान रात्री आणि पहाटे सुमारे १४ अंश तर, दुपारी १६ अंशापर्यंत खाली उतरत आहे. सध्या सुरू असलेल्या थंडीमुळे दिवसाही गारवा जाणवत आहे. रात्री आणि पहाटे त्या गारव्यामध्ये कमालीची वाढ होत असल्याने कडाक्याच्या थंडीचा फटका बसत आहे. वातावरणातील हे तापमान असेच पुढील पाच दिवस कायम राहणार असल्याने रात्री परिधान केले जाणारे स्वेटर, जॅकेट, मफलर, शाल अन्य गरम कपडे आता दिवसाही घातले जात आहेत. त्यावरून कडाक्याच्या थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसून येते.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, माथेरान, श्रीवर्धन, महाड येथील रायगड किल्ला येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. नाताळ आणि थर्टी फर्स्टला केलेल्या नववर्षाच्या सेलिब्रेशननंतर पर्यटकांची गर्दी कमी होईल असे वाटले होते, मात्र गुलाबी थंडीची मजा लुटण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढली आहे.थंडी वाढल्याने स्वेटर, गरम कपडे खरेदीचा कल वाढल्याचे दिसून येते. बाजारपेठेतील दुकानांमधून नागरिकांची गर्दी दिसून येत होती. थंडीच्या कालावधीमध्ये गरम चहा पिण्याची मजा काही औरच असते. चहाच्या टपºयांवर वाफाळणारा चहा पिण्यासाठीही गर्दी होताना दिसत आहे.थंडीचा कडाका वाढल्याने गरम पेय पिण्याला पसंती दिली जात आहे. त्यामध्ये मद्याला जास्त पसंती दिली जात असल्याने कोल्ड्रिंक्स, थंड बीअर पिणाºयांची संख्या रोडावल्याचे सांगण्यात येते. जागोजागी रात्रीच्या शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी पोपटी पार्ट्यांचे बेत आखले जात आहेत. त्यामध्ये स्थानिकांसह पर्यटकही मोठ्या संख्येने पोपटी पार्ट्या करत आहेत.

टॅग्स :Raigadरायगड