शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

धबधब्यांवरील बंदीमुळे कर्जतचे व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:10 IST

स्थानिक त्रस्त : जमावबंदी आदेश लागू न करण्याची मागणी

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात अनेक पर्यटनस्थळांना कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे येथे दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि जमावबंदी आदेशामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्याडोंगर कपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे. वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी आणि अर्थात या सर्वांचा फायदा येथील आषाणे -कोषाणे, कोदींवडे, खांडस मार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, जुमापट्टी, बेकरेयेथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंदझाली.सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आला होता. परंतु अति उत्साही पर्यटकांना त्यांच्याच चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु प्रशासनाने यावर उपाययोजना न करता आणि स्थानिकांना विचारात न घेता सतत दोन वर्षे १४४ कलम लागू करून सरसकट बंदी घातली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेळे, कर्जत, खोपोली येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहन चालक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी भाडे मारून दिवसागणिक २५०० ते ३००० इतकी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १००० रुपये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, वन समिती, रिक्षा संघटना यांना विचारात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिकांनी, रिक्षा संघटना यांचे मत आहे.नियोजनाअभावी ओसरला पर्यटन व्यवसायकर्जत तालुक्यात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची कमालीची गर्दी होऊ लागली अन् अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी धबधब्यांवर दगड कोसळून, पाण्यात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू चिंतेची बाब तसेच स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, छेडछाडीचे वाढलेले प्रमाण, मद्यप्राशन केल्यानंतर ठिकठिकाणी फोडलेल्या काचेच्या बाटल्या यामुळे क्षणात नावारूपाला आलेल्या या सर्व पर्यटन स्थळांवर शासनाने जमावबंदीचा आदेश काढला. यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.पोलीस प्रशासनाने नेरळ परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला अडवून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात येते, यासाठी ३ अधिकारी व ४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळप्रशासनाने स्थानिकांना विचारात न घेता जमावबंदी आदेश लागू करू नये. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करावे. स्थानिक ग्रामपंचायत, वन कमिटीला घेऊन चर्चा करावी, जेणे करून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांनीही गैरवर्तवणूक करू नये, स्थानिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटन विकसित होण्याऐवजी धोक्यातच येईल.- सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक, डिकसळ