शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

धबधब्यांवरील बंदीमुळे कर्जतचे व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:10 IST

स्थानिक त्रस्त : जमावबंदी आदेश लागू न करण्याची मागणी

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात अनेक पर्यटनस्थळांना कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे येथे दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि जमावबंदी आदेशामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्याडोंगर कपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे. वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी आणि अर्थात या सर्वांचा फायदा येथील आषाणे -कोषाणे, कोदींवडे, खांडस मार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, जुमापट्टी, बेकरेयेथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंदझाली.सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आला होता. परंतु अति उत्साही पर्यटकांना त्यांच्याच चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु प्रशासनाने यावर उपाययोजना न करता आणि स्थानिकांना विचारात न घेता सतत दोन वर्षे १४४ कलम लागू करून सरसकट बंदी घातली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेळे, कर्जत, खोपोली येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहन चालक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी भाडे मारून दिवसागणिक २५०० ते ३००० इतकी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १००० रुपये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, वन समिती, रिक्षा संघटना यांना विचारात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिकांनी, रिक्षा संघटना यांचे मत आहे.नियोजनाअभावी ओसरला पर्यटन व्यवसायकर्जत तालुक्यात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची कमालीची गर्दी होऊ लागली अन् अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी धबधब्यांवर दगड कोसळून, पाण्यात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू चिंतेची बाब तसेच स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, छेडछाडीचे वाढलेले प्रमाण, मद्यप्राशन केल्यानंतर ठिकठिकाणी फोडलेल्या काचेच्या बाटल्या यामुळे क्षणात नावारूपाला आलेल्या या सर्व पर्यटन स्थळांवर शासनाने जमावबंदीचा आदेश काढला. यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.पोलीस प्रशासनाने नेरळ परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला अडवून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात येते, यासाठी ३ अधिकारी व ४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळप्रशासनाने स्थानिकांना विचारात न घेता जमावबंदी आदेश लागू करू नये. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करावे. स्थानिक ग्रामपंचायत, वन कमिटीला घेऊन चर्चा करावी, जेणे करून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांनीही गैरवर्तवणूक करू नये, स्थानिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटन विकसित होण्याऐवजी धोक्यातच येईल.- सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक, डिकसळ