शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यांवरील बंदीमुळे कर्जतचे व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:10 IST

स्थानिक त्रस्त : जमावबंदी आदेश लागू न करण्याची मागणी

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात अनेक पर्यटनस्थळांना कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे येथे दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि जमावबंदी आदेशामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्याडोंगर कपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे. वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी आणि अर्थात या सर्वांचा फायदा येथील आषाणे -कोषाणे, कोदींवडे, खांडस मार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, जुमापट्टी, बेकरेयेथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंदझाली.सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आला होता. परंतु अति उत्साही पर्यटकांना त्यांच्याच चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु प्रशासनाने यावर उपाययोजना न करता आणि स्थानिकांना विचारात न घेता सतत दोन वर्षे १४४ कलम लागू करून सरसकट बंदी घातली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेळे, कर्जत, खोपोली येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहन चालक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी भाडे मारून दिवसागणिक २५०० ते ३००० इतकी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १००० रुपये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, वन समिती, रिक्षा संघटना यांना विचारात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिकांनी, रिक्षा संघटना यांचे मत आहे.नियोजनाअभावी ओसरला पर्यटन व्यवसायकर्जत तालुक्यात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची कमालीची गर्दी होऊ लागली अन् अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी धबधब्यांवर दगड कोसळून, पाण्यात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू चिंतेची बाब तसेच स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, छेडछाडीचे वाढलेले प्रमाण, मद्यप्राशन केल्यानंतर ठिकठिकाणी फोडलेल्या काचेच्या बाटल्या यामुळे क्षणात नावारूपाला आलेल्या या सर्व पर्यटन स्थळांवर शासनाने जमावबंदीचा आदेश काढला. यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.पोलीस प्रशासनाने नेरळ परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला अडवून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात येते, यासाठी ३ अधिकारी व ४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळप्रशासनाने स्थानिकांना विचारात न घेता जमावबंदी आदेश लागू करू नये. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करावे. स्थानिक ग्रामपंचायत, वन कमिटीला घेऊन चर्चा करावी, जेणे करून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांनीही गैरवर्तवणूक करू नये, स्थानिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटन विकसित होण्याऐवजी धोक्यातच येईल.- सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक, डिकसळ