शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धबधब्यांवरील बंदीमुळे कर्जतचे व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:10 IST

स्थानिक त्रस्त : जमावबंदी आदेश लागू न करण्याची मागणी

कांता हाबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात अनेक पर्यटनस्थळांना कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे. शिवाय पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात तेथील स्थानिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त झाले आहे. मुंबई-पुण्याहून अगदी काही तासांच्या अंतरावर असलेल्या नेरळ, भिवपुरी रोड, कर्जत व खोपोली या रेल्वे स्थानकांवर पर्यटनासाठी आलेल्या मुंबईकरांची असलेली तुफान गर्दी हे चित्र स्पष्ट करते. परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे येथे दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासनाच्या नियोजनाअभावी आणि जमावबंदी आदेशामुळे कर्जत तालुक्यातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आले आहे.पावसाला सुरुवात झाली की कर्जत परिसराला जणू हिरवेगार शालू परिधान केलेलं रूप प्राप्त होतं. आल्हाददायक व थंडगार वातावरण निर्माण होऊन डोंगरातून झरे वाहायला सुरुवात होते. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असलेला कर्जत तालुका पावसाळी पर्यटनासाठी ओळखला जाऊ लागला. तो येथील निसर्गरम्य परिसरात असलेल्याडोंगर कपारीतील फेसाळत वाहणाऱ्या धबधब्यांमुळे. वीकेंडला येणाऱ्यांची भलतीच गर्दी आणि अर्थात या सर्वांचा फायदा येथील आषाणे -कोषाणे, कोदींवडे, खांडस मार्गे भीमाशंकर घाटमाथा ट्रेकिंग, नेरळ येथील टपालवाडी, जुमापट्टी, बेकरेयेथील धबधब्यांची पावसाळी पर्यटनस्थळांच्या यादीत नोंदझाली.सोलनपाडा हे नेरळपासून अर्ध्या तासाच्या अंतरावरील धरण त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे अल्पावधीतच लोकप्रिय झाले. या धरणावर पर्यटकांची अलोट गर्दी होऊ लागली. त्यामुळे येथील व्यवसाय तेजीत आला होता. परंतु अति उत्साही पर्यटकांना त्यांच्याच चुकीमुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. परंतु प्रशासनाने यावर उपाययोजना न करता आणि स्थानिकांना विचारात न घेता सतत दोन वर्षे १४४ कलम लागू करून सरसकट बंदी घातली, त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला खीळ बसली आहे.या जमावबंदीचा सर्वात जास्त परिणाम येथील हॉटेल व्यवसायावर झाला आहे. पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने ऐन हंगामात हा व्यवसाय थंडावल्याचे चित्र आहे. नेरळ, कशेळे, कर्जत, खोपोली येथून पर्यटनस्थळी पोचवणारे खासगी वाहन चालक यांच्याकडून देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. खासगी भाडे मारून दिवसागणिक २५०० ते ३००० इतकी कमाई होत होती. मात्र पर्यटकांनी पाठ फिरवल्याने १००० रुपये कमवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे स्थानिक व्यवसायिक, वन समिती, रिक्षा संघटना यांना विचारात घेऊन शासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे हॉटेल व्यावसायिक, स्थानिक व्यावसायिकांनी, रिक्षा संघटना यांचे मत आहे.नियोजनाअभावी ओसरला पर्यटन व्यवसायकर्जत तालुक्यात पावसाळी सहलींसाठी पर्यटकांची कमालीची गर्दी होऊ लागली अन् अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी धबधब्यांवर दगड कोसळून, पाण्यात बुडून पर्यटकांचे होणारे मृत्यू चिंतेची बाब तसेच स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास, छेडछाडीचे वाढलेले प्रमाण, मद्यप्राशन केल्यानंतर ठिकठिकाणी फोडलेल्या काचेच्या बाटल्या यामुळे क्षणात नावारूपाला आलेल्या या सर्व पर्यटन स्थळांवर शासनाने जमावबंदीचा आदेश काढला. यामुळे येथील स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील व्यावसायिकांनी केली आहे.पोलीस प्रशासनाने नेरळ परिसरात नाकाबंदी सुरू केली आहे. मद्यपान करून जर कोणी गाडी चालवत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच दारू पिऊन आलेल्या व्यक्तीला अडवून धबधब्यावर जाण्यास बंदी घालण्यात येते, यासाठी ३ अधिकारी व ४ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.- सोमनाथ जाधव, पोलीस निरीक्षक, नेरळप्रशासनाने स्थानिकांना विचारात न घेता जमावबंदी आदेश लागू करू नये. त्यावर काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन करावे. स्थानिक ग्रामपंचायत, वन कमिटीला घेऊन चर्चा करावी, जेणे करून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच पर्यटकांनीही गैरवर्तवणूक करू नये, स्थानिक आणि प्रशासनाला सहकार्य करावे. जमावबंदी आदेश असाच सुरू राहिल्यास कर्जतमधील पर्यटन विकसित होण्याऐवजी धोक्यातच येईल.- सागर शेळके, हॉटेल व्यावसायिक, डिकसळ