शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

महलमिऱ्या डोंगरावर ढगफुटी, सहा जण थोडक्यात बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:46 IST

भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली.

पेण : भोगावती नदीचे पात्र गुरुवार सकाळी कोरडे होते. मात्र दुपारी दोननंतर विजांच्या कडकडाटासह महलमि-या डोंगर, वरवणे, वाक्रळ, कामार्ली, शेणे, सापोली, आंबेघर व हेटवणे धरण परिसर ते पेण शहरापर्यंत २३ किमी परिसरात ही पर्जन्यवृष्टी झाली. ढगफुटीचा केंद्रबिंदू महलमिºया डोंगर असल्याने पेण शहरापासून ८०० ते १००० मीटर उंचीवरच्या या ढगफुटीने अवघ्या ३५ ते ४० मिनिटात भोगावती नदीची पातळी झपाट्याने वाढली.प्रवाहात धावटे आदिवासी वाडीवरील पाच जण तर पेण कोळीवाड्यातील तिघे जण असे एकूण आठ जण वाहून गेले. त्यापैकी ६ जण सुखरूप बचावले तर सागर वाघमारे (२३, रा. धावटे) आणि अनिकेत वास्कर (२३, रा. पेण कोळीवाडा) हे बुडाले.पेणमध्ये गुरुवार २१ जूनच्या पावसाची नोंद १३५.०४ एवढीच झालेली आहे. एकूण ४१६.०७ एवढाच पाऊस पेणमध्ये पडल्याची नोंद झालेली असताना नदीला अचानक आलेला पूर ढगफुटीमुळे होता. येथील महलमिºया डोंगर आणि त्याखाली असलेल्या ग्रामीण परिसरातही मोठा पाऊस झाला. ढगफुटीमुळे झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा २३ किमी अंतरापर्यंत होता त्यामुळे उंचावरून आलेल्या पावसाच्या गाळयुक्त पाण्याने अर्ध्या तासात नदी अचानक आक्रमक झाली. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेले ३ कोळी बांधव व नदीपात्रातून धावटे गावाकडे जाणारे ५ आदिवासी बांधव प्रवाहात वाहून गेले. पेणमधील चार पर्जन्यमापक केंद्रावर पाऊस कमी पडला, तर कामार्ली या केंद्रात ढगफुटीचा परिसर असताना पावसाची नोंद नाही. मात्र एकूण पाच केंद्रावर १३५.०४ मिमी नोंद झाली.>नागोठणेतील रस्ते जलमयनागोठणे : ग्रामपंचायतीकडून पावसाळ्याच्या आधी शहरात नालेसफाईची मोहीम राबविण्यात येते. यंदा मोहीम पूर्ण झाल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला जात असला तरी, गुरु वारी दुपारी अडीच ते तीन तास पडलेल्या पावसामुळे काही मिनिटांतच नाल्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने काही भागातील रस्ते जलमय झाले, तर नाल्यांतील पाणी घरात शिरले होते. शहरात काही ठिकाणी गटारांवर अतिक्र मण केल्याने पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्यामुळे मुसळधार पावसात रस्त्यावरूनच गटाराचे पाणी वाहताना दिसत आहे. पावसामुळे रस्त्यावरून फूट - दीड फूट पाण्यातूनच नागरिकांना जावे लागले. दरम्यान, येथील कचेरी शाळेच्या पटांगणात बसविण्यात आलेल्या पर्जन्यमापक यंत्रात गुरु वारी ७४ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून, शुक्र वारी सकाळपर्यंत १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.>श्रीवर्धनमध्ये सर्वाधिक पावसाची नोंदअलिबाग : जिल्ह्यात चोवीस तासांत श्रीवर्धन येथे सर्वाधिक १४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात उर्वरित ठिकाणी पेण-१३५,रोहा-१२०, मुरु ड-९५, म्हसळा-९०.४०, अलिबाग-६५, माणगाव-६४, खालापूर-५४, तळा-५०, पोलादपूर-४९, उरण-४०, महाड-३६, सुधागड-३०.५०, पनवेल-२०.२०, कर्जत-७ तर माथेरान येथे ४५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी या प्रमुख नद्यांच्या जलपातळीत वाढ झाली आहे, मात्र ती नियंत्रणात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.