शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

दोन वर्षांपासून कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:35 IST

कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत.

कर्जत : कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेची सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यातील सर्व सहा आरोग्य केंद्रांवर आणि त्या अंतर्गत असलेल्या ३२ आरोग्य उपकेंद्रे येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या केल्या जात नाहीत. त्यामागे अनेक कारणे असली तरी आपल्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया व्हावी असे कोणत्याही वैद्यकीय अधिकारी अथवा आरोग्य विभाग यांना वाटत नाही. वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजनांतर्गत ‘हम दो, हमारे दो’ या धोरणाबाबत सरकारकडून जागृती करण्यात येत असली तरी तालुक्यातील आरोग्य विभागाकडून यात हरताळ फासण्यात येत आहे.गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण अंतर्गत शस्त्रक्रिया बंद आहेत. यात कळंब, मोहिली, कडाव, नेरळ, खांडस, आंबिवली या सर्व सहा प्राथमिक आरोग्य केंद्रात अशी सेवा सुरू ठेवण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने खासगी रु ग्णालयाचे फावते आहे.सरकारी रु ग्णालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या करण्यासाठी माफक खर्च येत असतो. कर्जत तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नसल्याने शेवटी गोरगरीब रु ग्णांना खासगी रु ग्णालयाची पायरी चढावी लागत आहे.त्याचवेळी तेथे किमान १५,000 रु पयांपासून पुढे अधिक पैसे मोजावे लागत आहेत. ही बाब गोरगरीब कुटुंबांना परवडणारी नाही. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा तालुक्यातील किमान एका प्राथमिक आरोग्य केंद्रात व्हावी अशी सोय करण्याची गरज आहे. त्याकडे मागील दोन वर्षांपासून आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले आहे. कडाव, नेरळ, कळंब येथे नव्याने बांधकाम केल्याने तेथे शस्त्रक्रि या होत नाहीत तर आंबिवलीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने तेथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रि या होत नाहीत. त्याचवेळी मोहिली आणि खांडसमध्ये अपुऱ्या साधनसामग्री अभावी शस्त्रक्रि या होत नाहीत. हे सलग दोन वर्षे सुरू असल्याने खासगी रु ग्णालयामध्ये या शस्त्रक्रि या करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात..गोरगरीब महिलांना फॅमिली प्लॅनिंगचे आॅपरेशन करावे म्हणून अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. पण त्या शस्त्रक्रि या करण्यासाठी आरोग्य केंद्रात सोय आहे काय? याची माहिती त्यांना नाही.- जैतू पारधी, अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी संघटनाशासनाने हे काम पूर्वी टार्गेट म्हणून यशस्वीपणे राबविले आहे. मात्र, आता महिला स्वत:हून शस्त्रक्रि या करण्यासाठी पुढे येतात आणि ग्रामीण रुग्णालयात अशा शस्त्रक्रि या केल्या जात आहेत.- डॉ. श्याम पावरा, वैद्यकीय अधिकारी, कळंब