शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
6
रामललाच्या अयोध्येत दिसणार रामायणातील आणखी २ व्यक्तिरेखा; ऑक्टोबर अखेरपर्यंत काम पूर्ण!
7
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
8
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
9
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
10
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
11
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
12
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
13
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
14
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
15
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
16
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
17
"ज्यांना नरकात जायचंय, त्यांनी 'गजवा-ए-हिंद'च्या नावावर..."; योगी आदित्यनाथांचा दंगेखोरांना इशारा
18
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
19
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
20
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 08:04 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीवर्धन : गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याच सोन्याचा वापर करून गणपतीचा अर्धांग मुखवटा तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या दिवशी गणपतीचा अर्धांग मुखवटा प्रथमच सापडला त्या दिवशी आणि योगायोगाने उच्च न्यायालयाने आदेश पारित केले, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. आता लवकरच गणपतीच्या अर्धांग मुखवट्याची दिवेआगर येथील गणेश मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यातील फासेपारध्यांनी २३ मार्च २०१२ रोजी सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोड्यानंतर गणेशमूर्ती आगीवर वितळवली. प्राप्त माहितीनुसार, १४६६ ग्रॅम वजनाचे सोने दरोडेखोरांनी लंपास केले त्यानंतर जबरी चोरी, दरोडा आणि खून या विविध कलमांनुसार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांनी दरोड्यात पळविलेल्या सोन्यापैकी १३६१.४३ ग्रॅम सोने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोरांना पकडण्यात आल्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला चालू असताना रायगड सत्र न्यायालयात सोने परत मिळावे म्हणून दिवेआगर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. परंतु सरकारने देवस्थानला दिलेला मुखवटाच अस्तित्वात राहिला नाही. सत्र न्यायालयाने सोने देवस्थान ट्रस्टला देण्यास नकार दिला आणि सोने सरकारजमा करण्याचा आदेश दिला.या गुन्ह्यातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केल्यामुळे या सोन्याचा वापर करता येणे शक्य नव्हते आणि त्यामुळे २०१२ पासून मुखवटा त्याच सोन्यापासून परत बनविला जावा या आशेवर सर्व भाविक प्रतीक्षेत होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी वर्धन अमित शेडगे यांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील श्रीकांत गावंड यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. गुन्ह्यानंतर परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मूळ गणपतीच्या अर्धांग मुखवट्यासारखा मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. ३१ मार्चला या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर झाली.   जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागलेला आहे. या प्रकरणी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. निश्चितच उच्च न्यायालयाच्या निकालाचे रायगडकरांच्या वतीने मी स्वागत करतो.- सुनील तटकरे, खासदार, रायगड उच्च न्यायालयाचा आजचा निकाल ही श्रींची इच्छा आहे. स्थानिक सर्व नागरिकांची इच्छा होती अगोदरचा मुखवटा पुन्हा मिळावा. त्या स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. माझा आनंद द्विगुणित झाला आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगडउच्च न्यायालयाच्या निकालाचे हार्दिक स्वागत आहे. दिवेआगरमधील जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागला आहे. - उदय बापट, सरपंच, दिवेआगर  

टॅग्स :RaigadरायगडCourtन्यायालय