शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिष्ठापनेचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 08:04 IST

गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

श्रीवर्धन : गेल्या अनेक वर्षांपासून दिवेआगर येथील सुवर्ण गणेश प्रतिमा पुनः प्रतिष्ठापनेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, ३१ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत हे सोने सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. याच सोन्याचा वापर करून गणपतीचा अर्धांग मुखवटा तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या दिवशी गणपतीचा अर्धांग मुखवटा प्रथमच सापडला त्या दिवशी आणि योगायोगाने उच्च न्यायालयाने आदेश पारित केले, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. आता लवकरच गणपतीच्या अर्धांग मुखवट्याची दिवेआगर येथील गणेश मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना होणार असल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यातील फासेपारध्यांनी २३ मार्च २०१२ रोजी सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी दरोड्यानंतर गणेशमूर्ती आगीवर वितळवली. प्राप्त माहितीनुसार, १४६६ ग्रॅम वजनाचे सोने दरोडेखोरांनी लंपास केले त्यानंतर जबरी चोरी, दरोडा आणि खून या विविध कलमांनुसार दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरोडेखोरांनी दरोड्यात पळविलेल्या सोन्यापैकी १३६१.४३ ग्रॅम सोने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. दरोडेखोरांना पकडण्यात आल्यानंतर अलिबाग सत्र न्यायालयाने सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा खटला चालू असताना रायगड सत्र न्यायालयात सोने परत मिळावे म्हणून दिवेआगर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. परंतु सरकारने देवस्थानला दिलेला मुखवटाच अस्तित्वात राहिला नाही. सत्र न्यायालयाने सोने देवस्थान ट्रस्टला देण्यास नकार दिला आणि सोने सरकारजमा करण्याचा आदेश दिला.या गुन्ह्यातील आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात शिक्षेविरोधात अपील दाखल केल्यामुळे या सोन्याचा वापर करता येणे शक्य नव्हते आणि त्यामुळे २०१२ पासून मुखवटा त्याच सोन्यापासून परत बनविला जावा या आशेवर सर्व भाविक प्रतीक्षेत होते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी वर्धन अमित शेडगे यांनी उच्च न्यायालयातील सरकारी वकील श्रीकांत गावंड यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. गुन्ह्यानंतर परत मिळविण्यात आलेल्या सोन्यापासून मूळ गणपतीच्या अर्धांग मुखवट्यासारखा मुखवटा बनवून तो पुन्हा दिवेआगर येथील गणेश मंदिरात ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला. ३१ मार्चला या अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर झाली.   जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागलेला आहे. या प्रकरणी वारंवार पाठपुरवठा केलेला आहे. निश्चितच उच्च न्यायालयाच्या निकालाचे रायगडकरांच्या वतीने मी स्वागत करतो.- सुनील तटकरे, खासदार, रायगड उच्च न्यायालयाचा आजचा निकाल ही श्रींची इच्छा आहे. स्थानिक सर्व नागरिकांची इच्छा होती अगोदरचा मुखवटा पुन्हा मिळावा. त्या स्वरूपाचा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. माझा आनंद द्विगुणित झाला आहे.- आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगडउच्च न्यायालयाच्या निकालाचे हार्दिक स्वागत आहे. दिवेआगरमधील जनतेला अपेक्षित असलेला निकाल लागला आहे. - उदय बापट, सरपंच, दिवेआगर  

टॅग्स :RaigadरायगडCourtन्यायालय