शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

रायगड किल्ल्याची स्वच्छता

By admin | Updated: February 3, 2016 02:16 IST

रायगड महोत्सव संपल्यानंतर या महोत्सवाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी पाचाड गावची साफसफाई केली. मात्र महत्त्वाच्या वास्तू, हत्ती, घोडे, मंडपाचे सामान

सिकंदर अनवारे, दासगांवरायगड महोत्सव संपल्यानंतर या महोत्सवाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी पाचाड गावची साफसफाई केली. मात्र महत्त्वाच्या वास्तू, हत्ती, घोडे, मंडपाचे सामान उचलून मंडपाच्या कापडातील टाकाऊ चिंध्या, खोके, प्लास्टिकच्या बाटल्या तेथेच टाकून गड सोडला. महोत्सवानंतर गडावरील सफाईचे काम मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या माथी मारले गेले. पुरातत्त्व विभाग गडावरील केरकचरा गोळा करीत आहेत आणि हा कचरा किल्ल्यावर जाळला जात असल्याने प्रदूषण होत आहे.२१ ते २४ जानेवारी हे चार दिवस पाचाड आणि किल्ले रायगडावर रायगड महोत्सव साजरा करण्यात आला. कोट्यवधी रुपये महोत्सवावर खर्च केले जात असताना तेथील स्थानिकांच्या मूलभूत सोईसुविधांचे काय, या प्रश्नावरून हा महोत्सव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कोणताही उत्सव, महोत्सव, जत्रा साजऱ्या झाल्या की त्या जागेच्या स्वच्छतेकडे आयोजक कधीही पाहात नाहीत. सामाजिक संस्थांना साफसफाईची ही जबाबदारी पार पाडावी लागते. नितीन देसाई हे ठेकेदार असले तरी या महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक संचालनालय होते. त्यामुळे महोत्सव साजरा झाल्यानंतर स्वच्छतेत कोठेही कमी पडणार नाही, अशी भावना होती. मात्र ती भावना या महोत्सवानंतर फोल ठरली आहे.महोत्सव पार पडल्यानंतर ठेकेदार देसाई यांनी सामानाची बांधाबांध केली. ती करीत असताना पाचाड गावातील साफसफाई अगदी प्रामाणिकपणे केली, मात्र साफसफाईतील तो प्रामाणिकपणा त्यांनी किल्ले रायगडावर दाखविला नाही. किल्ले रायगडावरील राण्यांच्या महालात राज्याभिषेकापूर्वी महिलांची लगबग दाखविली होती. यासाठी वेगवेगळे सेट उभे क रण्यात आले होते. हे सेटचे सामान, मंडपाचे कापड, महत्त्वाच्या वस्तू, नेण्यात आले. मात्र कापडाच्या चिंध्या, तुटलेले दोरखंड, तारांचे तुकडे आदी टाकावू सामान त्याच ठिकाणी टाकण्यात आले. किल्ल्यावरील पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांनी गड बकाल झाला आहे.