शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

रायगड किल्ल्याची स्वच्छता

By admin | Updated: February 3, 2016 02:16 IST

रायगड महोत्सव संपल्यानंतर या महोत्सवाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी पाचाड गावची साफसफाई केली. मात्र महत्त्वाच्या वास्तू, हत्ती, घोडे, मंडपाचे सामान

सिकंदर अनवारे, दासगांवरायगड महोत्सव संपल्यानंतर या महोत्सवाचे ठेकेदार नितीन देसाई यांनी पाचाड गावची साफसफाई केली. मात्र महत्त्वाच्या वास्तू, हत्ती, घोडे, मंडपाचे सामान उचलून मंडपाच्या कापडातील टाकाऊ चिंध्या, खोके, प्लास्टिकच्या बाटल्या तेथेच टाकून गड सोडला. महोत्सवानंतर गडावरील सफाईचे काम मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या माथी मारले गेले. पुरातत्त्व विभाग गडावरील केरकचरा गोळा करीत आहेत आणि हा कचरा किल्ल्यावर जाळला जात असल्याने प्रदूषण होत आहे.२१ ते २४ जानेवारी हे चार दिवस पाचाड आणि किल्ले रायगडावर रायगड महोत्सव साजरा करण्यात आला. कोट्यवधी रुपये महोत्सवावर खर्च केले जात असताना तेथील स्थानिकांच्या मूलभूत सोईसुविधांचे काय, या प्रश्नावरून हा महोत्सव सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. कोणताही उत्सव, महोत्सव, जत्रा साजऱ्या झाल्या की त्या जागेच्या स्वच्छतेकडे आयोजक कधीही पाहात नाहीत. सामाजिक संस्थांना साफसफाईची ही जबाबदारी पार पाडावी लागते. नितीन देसाई हे ठेकेदार असले तरी या महोत्सवाचे आयोजक महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक संचालनालय होते. त्यामुळे महोत्सव साजरा झाल्यानंतर स्वच्छतेत कोठेही कमी पडणार नाही, अशी भावना होती. मात्र ती भावना या महोत्सवानंतर फोल ठरली आहे.महोत्सव पार पडल्यानंतर ठेकेदार देसाई यांनी सामानाची बांधाबांध केली. ती करीत असताना पाचाड गावातील साफसफाई अगदी प्रामाणिकपणे केली, मात्र साफसफाईतील तो प्रामाणिकपणा त्यांनी किल्ले रायगडावर दाखविला नाही. किल्ले रायगडावरील राण्यांच्या महालात राज्याभिषेकापूर्वी महिलांची लगबग दाखविली होती. यासाठी वेगवेगळे सेट उभे क रण्यात आले होते. हे सेटचे सामान, मंडपाचे कापड, महत्त्वाच्या वस्तू, नेण्यात आले. मात्र कापडाच्या चिंध्या, तुटलेले दोरखंड, तारांचे तुकडे आदी टाकावू सामान त्याच ठिकाणी टाकण्यात आले. किल्ल्यावरील पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांनी गड बकाल झाला आहे.