शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची

By admin | Updated: August 18, 2015 02:53 IST

जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ यशस्वी होत आहे. गावाने एकजुटीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडला.

अलिबाग : जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची लोकचळवळ यशस्वी होत आहे. गावाने एकजुटीने स्वच्छता अभियानात उत्कृष्ट काम केल्यामुळे आज हा कार्यक्रम पार पडला. उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. या गावाची स्वच्छतेतील कामगिरी कौतुकास्पद आहे,असे प्रतिपादन म्हसळा गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांनी केले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमात त्या बोलत होत्या.‘घर तिथे शौचालय’ ही संकल्पना साकारत असलेल्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ज्ञ व गावातील सरपंच, पदाधिकारी, व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून आयोजित हागणदारीमुक्ती कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल - ताशांच्या गजरात व स्वच्छतेच्या घोषणा देत विद्यार्थी व शिक्षक, ग्रामस्थ यांनी समाजमंदिरापासून प्रभात फेरी काढली. हागणदारीमुक्तीचा बॅनर व स्वच्छतेच्या घोषणांचे फलक हातात घेवून संपूर्ण गावात हा जल्लोष करण्यात आला. मंदिरासमोर स्वच्छतेची शपथ देण्यात आली. प्राथमिक शाळेत सरपंच रेखा भायदे व गटविकास अधिकारी नीलिमा गाडे यांच्या उपस्थितीत समारोप झाला. स्वच्छतेत सातत्य ठेवणे व शौचालयाच्या वापराबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे,असे आवाहन यावेळी बोलताना रायगड जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले. यावेळी संवादतज्ज्ञ सुरेश पाटील व दिलासा फाउंडेशन अध्यक्ष किरण शिरगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विस्तार अधिकारी डी.एस.दिघीकर, उपसरपंच प्रकाश लोणशीकर, जि.प.चे मनुष्यबळ विकास सल्लागार आनंद धिवर, समाजशास्त्रज्ञ रविकिरण गायकवाड, स्वच्छता तज्ज्ञ सुशांत नाईक, मुख्याध्यापक आर.बी. सावंत आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)