शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

दळणवळणासाठी नागरिकांना करावी लागते पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:02 IST

कोळवट पंचक्रोशीतील रस्त्याची दुरवस्था; १५ वर्षांपासून परिस्थिती जैसे थे

लोकमत न्यूज नेटवर्क म्हसळा : तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागात ताम्हणे करंबेवाडी, ताम्हणे करंबे, रातिवणे, कोळवट, भापट अशा सहा गावांचा समावेश आहे. या गावांना दळणवळण करण्यासाठी प्रवासाचे साधन म्हणजे कोळवट रस्ता. तो रस्ता गेली १५ वर्षे नादुरुस्त आहे. अनेक वेळा त्या गावातील ग्रामस्थांची विविध पक्ष, आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदन देऊन रस्त्यासाठी मागणी केली. वारंवार प्रस्ताव देऊनही कोणीही या रस्त्याकडे गांभीर्याने घेत नसल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.

प्रस्तावांचा ढीग पडला असून आजही हा रस्ता दुर्लक्षित आहे. त्यासाठी कोळवट गाव अंतर्गत सहा गावांनी मुंबई व ग्रामीण ठिकाणी पंचक्रोशी कमिटी स्थापन केली होती. रखडलेला रस्ता पूर्ण करण्यासाठी तत्कालीन सरकार भारतीय जनता पक्ष, शिवसेना, तत्कालीन विरोधी पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय, मनसे, अन्य पक्षांतून या रस्त्याचे काम व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हा रस्ता गेली कित्येक वर्षे दगडमातीचा आहे. परंतु, पंचक्रोशीतील ग्रामस्थ दरवर्षी अंगमेहनत करून रस्त्यावर माती टाकून तात्पुरती अडचण दूर करतात; परंतु हे आणखीन किती वर्षे चालायचे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. आजपर्यंत अनेक निवडणुका येऊन गेल्या, त्या संबंधित पक्षाने शाब्दिक लेखी आश्वासन दिले, परंतु कोणीही शब्द, आश्वासन आजही पाळले नाही. त्यामुळे आजही त्या रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करायचा म्हणजे तारेवरची कसरत करावी लागते.

वास्तविक पाहता भेकऱ्याचा कोंड, ताम्हाणे करंबे, भापट, कोकबलवाडी, रातिवणे, कोळवट ही गावे दुर्गम आणि डोंगराळ असून या गावांतील नागरिकांचे सर्व व्यवहार हे केवळ म्हसळ्यावरच अवलंबून आहेत. शिक्षण, कामधंदा यासाठी नागरिकांना म्हसळ्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हा रस्ता प्रामुख्याने होणे गरजेचे आहे. महामंडळाची एसटी बस प्रवास करते, तीदेखील समुद्राच्या तरंगणाऱ्या लाटासारखी करते. काही वेळा महामंडळाची बसदेखील बंद केली जाते. त्यावेळी खासगी वाहनाने प्रवास करायला गेल्यास वाहनचालक प्रत्येक वेळी नाकारतात. त्यासाठी खासगी वाहनचालक दामदुपटीने भाडे घेतात आणि सर्वसामान्य मोलमजुरी करण्याच्या ते आवाक्याबाहेरचे असते. त्यामुळे कोळवट रस्ता हा पूर्ण करण्यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांनी जातीने लक्ष घालावे अशी ग्रामस्थांनी केली.

ग्रामस्थांची गैरसोयnआम्ही सर्व ग्रामस्थ गेली अनेक वर्षे रस्त्याला कंटाळलो असून जीवन जगणे केवळ रस्त्यामुळे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष या रस्त्याचे आश्वासन देण्यासाठी धावत येत असतात. nपरंतु, बाकी इतर दिवस वगळता रस्त्यावरती कुठला राजकीय नेता फिरकूनदेखील बघत नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक पक्षाला प्रस्ताव सादर केला आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.