शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

सिडकोचे जागेवर अतिक्रमण? रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:59 IST

वीस वर्षांपासून रस्ता रखडला 

- वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : खारघरमधील वास्तू विहार ते तळोजाकडे जाणारा मागील रस्ता तब्बल वीस वर्षांपासून रखडला आहे. शहरातील रांजणपाडा गावाजवळील रस्त्याची एक मार्गिका कित्येक वर्षांपासून बंद आहे. या अर्धवट रस्त्यामुळे शेकडो अपघात याठिकाणी घडले आहेत. सिडकोची उदासीनता यामुळे समोर आली आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाच्या नावाखाली सिडको कारवाया करीत असताना या रस्त्यावर सिडकोने अतिक्रमण केल्याचा रांजणपाडा ग्रामस्थांचा आरोप आहे. 

एकीकडे शहरात रातोरात उभारलेला कोपरा पुलामुळे सिडकोची तत्परता समोर आली आहे. मात्र, शहरात महत्त्वाच्या मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ असताना सिडको हा रस्ता बनविण्यास अपयशी ठरली आहे. याच मार्गावर रांजणपाडा गावातील स्मशानभूमी होती. सिडकोने ती जमीनदोस्त केली होती. ग्रामस्थांचा या गोष्टीला विरोध होता. ग्रामस्थ आणि सिडकोच्या वादात महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता कित्येक वर्षे अर्धवट राहिला आहे. या ठिकाणाहून जाताना वाहन चालकांना विरुद्ध दिशेने वाहनाला वळसा घेऊन पुढे वास्तू विहाराकडे जावे लागत आहे.सिडकोने हा रस्ता बांधताना संपादन झाली नसलेल्या जागेवरील स्मशानभूमी जबरदस्तीने पाडली. सात गुंठे जागेला पर्यायी जागा देऊन आमच्या गावासाठी नव्याने स्मशानभूमी उभारण्याची मागणी आम्ही करीत असल्याने रांजणपाडा येथील ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी सांगितले. मात्र, सिडको असे न करता जबरदस्ती याठिकाणी रस्ता बनविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दरम्यान सिडको अधिकाऱ्यांनी धाक दाखवून रस्ता बनविण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी डांबरीकरणासाठी खडी देखील टाकली होती. मात्र, ग्रामस्थ गुरुनाथ चौधरी यांनी उधळून लावला.

 अपघातांची मालिका सुरूच  दोन्ही बाजुला डांबरी रस्ता आणि मध्येच खड्डा अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे.त्यामुळे वाहन चालकांना रात्रीच्या वेळेला या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होऊन अनेकजण याठिकाणी जखमी झाले आहेत.