शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:34 IST

शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन

वैभव गायकर ।पनवेल : शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवण्यावर भर दिला जात आहे.मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी नीलक्रांतीसारख्या योजना राबविल्या जात आहेत. पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रात नजीकच्या काळात मत्स्यशेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी भेट देत आहेत.इस्रायल, चीन, व्हिएतनाम या देशांच्या तुलनेत भारतात प्रगत मत्स्यशेती अद्याप केली जात नाही. महाराष्ट्रातदेखील भारताच्या एकूण मत्स्य उत्पादनाच्या केवळ ६ टक्के मत्स्यशेती केली जाते. समुद्रातील मासेमारीत संपूर्ण जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. शासनाच्या अन्न आणि कृषी संस्थेने (एफएवो) २०१४-१५च्या दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४ लाख टन एवढे आहे. यामध्ये भूजल (गोड्या पाण्यातील) मत्स्योत्पादन दीड लाख टन एवढे आहे. ही आकडेवारी भारताच्या एकूण मत्स्योत्पादनाच्या केवळ ६ टक्के असल्याने महाराष्ट्रात मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातआहेत. मत्स्योत्पादन वाढविणे, हा यामागचा उद्देश असून महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्रातच मत्स्यशेती व्यवसाय करण्यासाठी उत्सुक उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, मत्स्यबीजाचीही या ठिकाणी विक्री केली जात असल्याने नजीकच्या काळात या संशोधन केंद्राला भेट देणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१७ ते जुलै महिन्यांपर्यंत या संशोधन केंद्राला ५००पेक्षा जास्त शेतकºयांनी भेट देऊन मत्स्यशेतीविषयक प्रशिक्षण सहभाग घेतला. प्रशिक्षण घेतलेल्या शेतकºयांपैकी ८० टक्के शेतकºयांनी मत्स्यशेती व्यवसायाला सुरुवातही केली आहे.एकेकाळी रायगड जिल्ह्याला भात शेतीचे भांडार म्हणून संबोधले जायचे. मात्र, लोकवस्ती वाढल्याने तसेच विविध आंतरराष्टÑीय प्रकल्प परिसरात होऊ घातल्याने शेतजमीन कमी झाली. शिवाय गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्नही मिळत नसल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली.गेल्या दीड-दोन वर्षांपासून जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना मिळत आहे. तरुण शेतकºयांमध्ये मत्स्यशेतीचे विशेष आकर्षण असून ते मोठ्या प्रमाणात याकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रायगड जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या हजारोवर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार ३००० तळ्यांवर मत्स्यशेती केली जाते. यामध्ये पेण तालुक्यात सर्वात जास्त मत्स्यशेती केली जाते.जिल्ह्यातील नोंदणीकृत ३००० तलावांपैकी १२०० तलाव पेणमध्ये आहेत. पनवेल तालुक्यात ५०० नोंदणीकृत तलाव आहेत. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रात नोंद नसलेल्या हजारो तलावांतदेखील मत्स्यशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती केल्यास एक किलोचा मासा तयार करण्यासाठी ६० रु पये एवढा अंदाजित खर्च येतो. बाजारात किरकोळ विक्री केल्यास या एका माशामागे १५० रु पये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो. म्हणजेच शेतकºयाला एका माशामागे ९० रु पये नफा मिळतो. १० गुंठ्याच्या तलावात एक टन उत्पादन निघू शकते. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यशेती केल्यास यामधून एक लाख उत्पादन मिळते. म्हणजेच शेतकºयाला १०गुंठ्यातून सुमारे ९० हजार एवढानफा अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत मिळू शकते. मात्र, यासाठी मत्स्यशेती तंत्रज्ञान, मत्स्यपालन व्यवसायातील तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.