शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

जिल्ह्यात मत्स्यशेतीला तरु णांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:34 IST

शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन

वैभव गायकर ।पनवेल : शेती करताना मजूर, पीक खर्च व मिळणारे उत्पन्न यांचे गणित जुळवल्यास शेतकºयांना फारसा नफा होताना दिसत नाही. शेतीला पर्याय म्हणून मत्स्यशेती करण्याला रायगड जिल्ह्यातील तरुण शेतकºयांकडून पसंती मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी गुंतवणुकीत अधिक फायदा मिळवण्यावर भर दिला जात आहे.मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी नीलक्रांतीसारख्या योजना राबविल्या जात आहेत. पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्रात नजीकच्या काळात मत्स्यशेतीविषयक माहिती मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी भेट देत आहेत.इस्रायल, चीन, व्हिएतनाम या देशांच्या तुलनेत भारतात प्रगत मत्स्यशेती अद्याप केली जात नाही. महाराष्ट्रातदेखील भारताच्या एकूण मत्स्य उत्पादनाच्या केवळ ६ टक्के मत्स्यशेती केली जाते. समुद्रातील मासेमारीत संपूर्ण जगात भारताचा सातवा क्रमांक लागतो. शासनाच्या अन्न आणि कृषी संस्थेने (एफएवो) २०१४-१५च्या दिलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन ४ लाख टन एवढे आहे. यामध्ये भूजल (गोड्या पाण्यातील) मत्स्योत्पादन दीड लाख टन एवढे आहे. ही आकडेवारी भारताच्या एकूण मत्स्योत्पादनाच्या केवळ ६ टक्के असल्याने महाराष्ट्रात मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातआहेत. मत्स्योत्पादन वाढविणे, हा यामागचा उद्देश असून महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र पनवेलमध्ये आहे. केंद्रातच मत्स्यशेती व्यवसाय करण्यासाठी उत्सुक उद्योजकांना प्रशिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे, मत्स्यबीजाचीही या ठिकाणी विक्री केली जात असल्याने नजीकच्या काळात या संशोधन केंद्राला भेट देणाºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी २०१७ ते जुलै महिन्यांपर्यंत या संशोधन केंद्राला ५००पेक्षा जास्त शेतकºयांनी भेट देऊन मत्स्यशेतीविषयक प्रशिक्षण सहभाग घेतला. प्रशिक्षण घेतलेल्या शेतकºयांपैकी ८० टक्के शेतकºयांनी मत्स्यशेती व्यवसायाला सुरुवातही केली आहे.एकेकाळी रायगड जिल्ह्याला भात शेतीचे भांडार म्हणून संबोधले जायचे. मात्र, लोकवस्ती वाढल्याने तसेच विविध आंतरराष्टÑीय प्रकल्प परिसरात होऊ घातल्याने शेतजमीन कमी झाली. शिवाय गुंतवणुकीच्या तुलनेत उत्पन्नही मिळत नसल्याने अनेकांनी शेतीकडे पाठ फिरवली.गेल्या दीड-दोन वर्षांपासून जिल्ह्यात मत्स्यशेतीला चालना मिळत आहे. तरुण शेतकºयांमध्ये मत्स्यशेतीचे विशेष आकर्षण असून ते मोठ्या प्रमाणात याकडे वळत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रायगड जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या हजारोवर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात संशोधन केंद्राच्या नोंदीनुसार ३००० तळ्यांवर मत्स्यशेती केली जाते. यामध्ये पेण तालुक्यात सर्वात जास्त मत्स्यशेती केली जाते.जिल्ह्यातील नोंदणीकृत ३००० तलावांपैकी १२०० तलाव पेणमध्ये आहेत. पनवेल तालुक्यात ५०० नोंदणीकृत तलाव आहेत. या व्यतिरिक्त संशोधन केंद्रात नोंद नसलेल्या हजारो तलावांतदेखील मत्स्यशेती मोठ्या प्रमाणात केली जाते.आधुनिक पद्धतीने मत्स्यशेती केल्यास एक किलोचा मासा तयार करण्यासाठी ६० रु पये एवढा अंदाजित खर्च येतो. बाजारात किरकोळ विक्री केल्यास या एका माशामागे १५० रु पये प्रतिकिलो बाजारभाव मिळतो. म्हणजेच शेतकºयाला एका माशामागे ९० रु पये नफा मिळतो. १० गुंठ्याच्या तलावात एक टन उत्पादन निघू शकते. शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्यशेती केल्यास यामधून एक लाख उत्पादन मिळते. म्हणजेच शेतकºयाला १०गुंठ्यातून सुमारे ९० हजार एवढानफा अवघ्या ९ महिन्यांच्या कालावधीत मिळू शकते. मात्र, यासाठी मत्स्यशेती तंत्रज्ञान, मत्स्यपालन व्यवसायातील तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे.