शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

स्वच्छतेच्या निकषांमध्ये बदल

By admin | Updated: July 23, 2015 04:02 IST

स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे स्वप्न सरकारला दिसेनासे झाले आहे. त्यामुळे सरकारने हागणदारीमुक्तीचे निकष बदलून वेळेआधीच पल्ला गाठण्याची एक नामी शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे.आघाडी सरकारच्या मूळ योजनेचे नाव बदलून स्वच्छ भारत मिशन असे नामकरण भाजपा सरकारने केले आहे. तोच कार्यक्रम पुढे सुरू होता, मात्र विविध ग्रामपंचायती आणि विशेष करून नागरिक अजूनही वैयक्तिक शौचालयांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करीत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा वेळ, पैसा खर्च होतो, परंतु त्यातून अपेक्षित निकाल मिळत नाही. वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे हे बंधनकारक नसून हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा असल्याने तो कोणावर लादता येत नाही.गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ वैयक्तिक शौचालयांचा विचार केला, तर हजारो शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून हे सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे अशा बऱ्याच अडचणी येत असल्याचे सरकारच्या आता लक्षात आले आहे. या अडचणींवर लवकर मात केली नाही, तर २०१९ सालापर्यंतचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. यासाठीच सरकारने या हागणदारीमुक्त गाव मिशनच्या निकषात १७ जून २०१५च्या पत्रानुसार काही बदल केले आहेत. याची अंमलबजावणी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात मात्र कोणतेच बदल केलेले नाहीत. त्यामुळे ते बांधण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरूच राहणार आहेत. तसेच पुरस्कारांमध्ये बदल केलेले नाहीत. रायगड जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायती आहेत. पैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी असून २६५ ग्रामपंचायती नवीन आणि जुन्या निकषाप्रमाणे २०१५ पर्यंत निर्मल करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.