शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या निकषांमध्ये बदल

By admin | Updated: July 23, 2015 04:02 IST

स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती

आविष्कार देसाई, अलिबागस्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना सरकारसह प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होत आहे. २०१९ सालापर्यंत ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे स्वप्न सरकारला दिसेनासे झाले आहे. त्यामुळे सरकारने हागणदारीमुक्तीचे निकष बदलून वेळेआधीच पल्ला गाठण्याची एक नामी शक्कल लढविली असल्याचे समोर आले आहे.आघाडी सरकारच्या मूळ योजनेचे नाव बदलून स्वच्छ भारत मिशन असे नामकरण भाजपा सरकारने केले आहे. तोच कार्यक्रम पुढे सुरू होता, मात्र विविध ग्रामपंचायती आणि विशेष करून नागरिक अजूनही वैयक्तिक शौचालयांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करीत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. पेयजल आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा वेळ, पैसा खर्च होतो, परंतु त्यातून अपेक्षित निकाल मिळत नाही. वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे हे बंधनकारक नसून हा कार्यक्रम ऐच्छिक स्वरूपाचा असल्याने तो कोणावर लादता येत नाही.गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी केवळ वैयक्तिक शौचालयांचा विचार केला, तर हजारो शौचालयांचे बांधकाम करावे लागणार असून हे सरकारसमोर मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे अशा बऱ्याच अडचणी येत असल्याचे सरकारच्या आता लक्षात आले आहे. या अडचणींवर लवकर मात केली नाही, तर २०१९ सालापर्यंतचे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नाही. यासाठीच सरकारने या हागणदारीमुक्त गाव मिशनच्या निकषात १७ जून २०१५च्या पत्रानुसार काही बदल केले आहेत. याची अंमलबजावणी संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात मात्र कोणतेच बदल केलेले नाहीत. त्यामुळे ते बांधण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरूच राहणार आहेत. तसेच पुरस्कारांमध्ये बदल केलेले नाहीत. रायगड जिल्ह्यात ८२४ ग्रामपंचायती आहेत. पैकी ४७१ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. ३५३ ग्रामपंचायती निर्मल होणे बाकी असून २६५ ग्रामपंचायती नवीन आणि जुन्या निकषाप्रमाणे २०१५ पर्यंत निर्मल करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.