शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आंदोलन चिघळण्याची शक्यता; मागण्या मान्य न केल्यास आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:01 IST

पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.

अलिबाग : पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. नदी बचाव आंदोलनाचा शुक्रवारी, २८वा दिवस आहे, तर लक्षवेधी उपोषणाचा १९वा आणि बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने आंदोलकांकडून प्रशासनासह लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त होत आहे. आदिवासी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य विचार न केल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे.पेण तालुुक्यातील मुंगेशी गौण खनिज परवाना रद्द करावा, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या प्रमुख मागणीसाठी मुंगोशी-बेलवडे आदिवासीवाड्या संघर्ष समितीचे अध्यक्ष हरीष बेकावडे यांनी आंदोलन छेडले आहे. चार दिवसांपूर्वी पेण तहसीलदार यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण सुरू केले होते. त्यानंतर शुक्रवारपासून ते समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. त्याचप्रमाणे पेण तहसीलदार येथील उपोषणचा १९वा दिवस आहे. तेथेही त्यांचे समर्थक उपोषण पुढे नेत आहेत. तर नदीच्या पात्रातील आंदोलनाला २८ दिवस झाले आहेत. गौण खनिजाचे उत्खनन केल्याने पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. दिवसाला ६० ब्रास खडींचे उत्खनन करण्यात येत आहे. संबंधितांनी उत्खनन करण्यासाठी फक्त प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्याला परवाना नसतानाही अर्जदाराने उत्खनन सुरू केले असल्याकडे बेकावडे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मात्र, प्रशासनाकडून डोळेझाक सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तेथील खडी क्रशर प्लांट बंद करण्याचे आदेश पेण तहसीलदार यांनी दिले. त्यानंतर प्रशासनाने विदूर तांडेल याच्या मालकीच्या जागेत निकेश तांडेल याला परवाना देऊन आदिवासी समाजाच्या भावनांवर मीठ चोळल्याची भावना आंदोलकांची झाली आहे. त्यामुळे तातडीने परवाना रद्द करावा, खोटे दाखले देणारा मंडळ अधिकारी डी. डी. निकम याला तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी केली आहे.- पेण येथील आंदोलकांची भेट घेण्यासाठी अलिबागचे प्रातांधिकारी, पेण तहसीलदार गेले होते. मात्र, त्यावर योग्य तोडगा न निघाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे बेकावडे यांनी स्पष्ट केले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासनातील अधिकारी फिरकला नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Raigadरायगड