शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:42 IST

स्वच्छतेमध्ये अडथळा : वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडील यंत्रणा अपुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छता अभियानादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानावरही परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असून त्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने उचलण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनानेही वाहनांना नेाटीस लावणे व ती उचलून नेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बेवारस वाहनांची संख्या खूप असल्यामुळे ही वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडील जागा अपुरी पडत असून ती घेऊन जाण्यासाठीची यंत्रणाही अपुरी पडत आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये नोटीस चिकटवल्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप अनेक वाहने उचलण्यात आलेली नाहीत. एक महिन्यापूर्वी तुर्भे वाशी रोडवर कांदा मार्केटच्या जवळील पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला आग लागली होती. एक महिना झाल्यानंतरही रिक्षाचा सांगाडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. पामबीच रोडवरही बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सारसोळेजवळ एक कार आग लागून खाक झाली आहे. अनेक दिवसांपासून कारचा सांगाडा तसाच पडून आहे.

शहरातील प्रत्येक नोडमध्ये वापर होत नसलेली वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची साफसफाईही करता येत नाही. या वाहनांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता अभियानानिमित्त महानगरपालिकेने नियमित रस्ते सफाई, रोडच्या बाजूच्या संरक्षण भिंतींची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे.

ठोस यंत्रणा हवीशहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नियमाप्रमाणे वाहनांवर नोटीय चिकटवणे, नोटीस संपल्यानंतर ती वाहने उचलून नेणे, उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ व योग्य मुदतीनंतर त्यांचा लिलाव करणे याविषयी नियमाप्रमाणे व वेेळेत कार्यवाही झाली तरच हा प्रश्न मिळणार आहे. अन्यथा रोडवरील बेवारस वाहनांचा कचरा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.