शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:42 IST

स्वच्छतेमध्ये अडथळा : वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडील यंत्रणा अपुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छता अभियानादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानावरही परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असून त्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने उचलण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनानेही वाहनांना नेाटीस लावणे व ती उचलून नेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बेवारस वाहनांची संख्या खूप असल्यामुळे ही वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडील जागा अपुरी पडत असून ती घेऊन जाण्यासाठीची यंत्रणाही अपुरी पडत आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये नोटीस चिकटवल्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप अनेक वाहने उचलण्यात आलेली नाहीत. एक महिन्यापूर्वी तुर्भे वाशी रोडवर कांदा मार्केटच्या जवळील पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला आग लागली होती. एक महिना झाल्यानंतरही रिक्षाचा सांगाडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. पामबीच रोडवरही बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सारसोळेजवळ एक कार आग लागून खाक झाली आहे. अनेक दिवसांपासून कारचा सांगाडा तसाच पडून आहे.

शहरातील प्रत्येक नोडमध्ये वापर होत नसलेली वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची साफसफाईही करता येत नाही. या वाहनांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता अभियानानिमित्त महानगरपालिकेने नियमित रस्ते सफाई, रोडच्या बाजूच्या संरक्षण भिंतींची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे.

ठोस यंत्रणा हवीशहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नियमाप्रमाणे वाहनांवर नोटीय चिकटवणे, नोटीस संपल्यानंतर ती वाहने उचलून नेणे, उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ व योग्य मुदतीनंतर त्यांचा लिलाव करणे याविषयी नियमाप्रमाणे व वेेळेत कार्यवाही झाली तरच हा प्रश्न मिळणार आहे. अन्यथा रोडवरील बेवारस वाहनांचा कचरा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.