शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 01:42 IST

स्वच्छतेमध्ये अडथळा : वाहने उचलण्यासाठी महापालिकेकडील यंत्रणा अपुरी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छता अभियानादरम्यान रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे स्वच्छता अभियानावरही परिणाम होत आहे. रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी महानगरपालिकेची यंत्रणा अपुरी पडत असून त्यासाठी ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने उचलण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनानेही वाहनांना नेाटीस लावणे व ती उचलून नेण्यास सुरुवात केली आहे. परंतु बेवारस वाहनांची संख्या खूप असल्यामुळे ही वाहने ठेवण्यासाठी महानगरपालिकेकडील जागा अपुरी पडत असून ती घेऊन जाण्यासाठीची यंत्रणाही अपुरी पडत आहे. यामुळे सद्यस्थितीमध्ये प्रत्येक नोडमध्ये नोटीस चिकटवल्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप अनेक वाहने उचलण्यात आलेली नाहीत. एक महिन्यापूर्वी तुर्भे वाशी रोडवर कांदा मार्केटच्या जवळील पेट्रोल पंपासमोर एका रिक्षाला आग लागली होती. एक महिना झाल्यानंतरही रिक्षाचा सांगाडा अद्याप उचलण्यात आलेला नाही. पामबीच रोडवरही बेलापूरकडून वाशीकडे जाणाऱ्या मार्गीकेवर सारसोळेजवळ एक कार आग लागून खाक झाली आहे. अनेक दिवसांपासून कारचा सांगाडा तसाच पडून आहे.

शहरातील प्रत्येक नोडमध्ये वापर होत नसलेली वाहने धूळखात पडून आहेत. या वाहनांमुळे रस्त्याची साफसफाईही करता येत नाही. या वाहनांच्या खाली मोठ्या प्रमाणात कचरा साठल्याचे चित्र पाहावयास मिळते. स्वच्छता अभियानानिमित्त महानगरपालिकेने नियमित रस्ते सफाई, रोडच्या बाजूच्या संरक्षण भिंतींची रंगरंगोटी व इतर सुशोभीकरणाची कामे करण्यास प्राधान्य दिले आहे. परंतु बेवारस वाहनांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे.

ठोस यंत्रणा हवीशहरातील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने ठोस यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे. नियमाप्रमाणे वाहनांवर नोटीय चिकटवणे, नोटीस संपल्यानंतर ती वाहने उचलून नेणे, उचलण्यात आलेली वाहने ठेवण्यासाठी वाहनतळ व योग्य मुदतीनंतर त्यांचा लिलाव करणे याविषयी नियमाप्रमाणे व वेेळेत कार्यवाही झाली तरच हा प्रश्न मिळणार आहे. अन्यथा रोडवरील बेवारस वाहनांचा कचरा दिवसेंदिवस वाढतच राहणार आहे.