शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

चाफेवाडीत 70 आदिवासी कुटुंबांनी श्रमदानातून बंधाऱ्यात साठवले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:56 IST

६० मीटरचा बंधारा : आठ झडपा केल्या बंद; पाणीटंचाईची समस्या होणार दूर

n विजय मांडेकर्जत : पाणी समस्येवर मात करण्यासाठी चाफेवाडी आदिवासी वाडीवरील ७० कुटुंबांनी श्रमदान केले. आदिवासी ग्रामस्थांनी लहान मुलांसह एकत्र येत ६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याच्या आठ झडपा बंद करून घेतल्या. दिवसभर केलेल्या श्रमदानातून त्या बंधाऱ्यात आणि परिसरात पाणीच पाणी दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागणार नसल्याचे दिसून येते.खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी, पादिरवाडी, पेटारवाडी, घुटेवाडी या ठिकाणी पिण्याचे पाणी मे आणि जून महिन्यात जमिनीत घुसून शोधावे लागते, कारण चाफेवाडीची उपनदी उन्हाळ्यात कोरडी पडते. मग डवरे खोदले जातात आणि त्यातून घरी पाणी नेले जाते. त्या भागात एक किलोमीटर अंतरात किमान चार ठिकाणी कोल्हापूर टाइपचे सिमेंट बंधारे आहेत. त्यातील दोन बंधारे तर २०१७ मध्ये किमान ५० लाख रुपये खर्च करून बांधले आहेत. मात्र नवीन दोन आणि जुने दोन असे सर्व सिमेंट बंधारे हे पाणी गळतीमुळे कुचकामी ठरत आहेत. पाणी जमिनीखालून वाहून जात असल्याने मग जानेवारी उजाडला की पाणी राहत नाही .फेब्रुवारी महिना सुरू झाला की येथील चाफेवाडीमधील आदिवासी लोक कोरड्या नदीमध्ये खोदलेल्या डवऱ्यामधून पाणी नेऊ शकत होते. मात्र जून महिन्यात नियोजित काळात पाऊस आला नसल्याने मग डवरे हे जमिनीमध्ये खोलवर पाणी शोधण्यासाठी खोदले जातात. त्या वेळी नदीमधील खडक असलेल्या ठिकाणी पाण्याचे झरे आढळून येत असल्याने मग ते पाणी शोधण्यासाठी आदिवासी लोक पाच फूट सहा फूट खोल पाणी शोधत खड्डे खोदत असतात. पोश्री आणि चिल्लार नदीमध्ये आणि त्यांच्या उपनद्यांमध्ये सध्या असे चित्र दिसत आहे. ग्रामस्थ हे चार-पाच जण मिळून असे खोल खड्डे खोदून पाणी शोधून ठेवतात आणि मग आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी चार चार तास बसून पाणी गोळा करतात.पाणीटंचाईची ही समस्या काही काळासाठी दूर करण्यासाठी १० डिसेंबर रोजी चाफेवाडीमधील सर्व ७० घरांतील प्रत्येकी एक व्यक्ती उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या नदीवर एकत्र आले होते. सकाळपासून सुरू झालेल्या श्रमदानामुळे साधारण ६० मीटर लांबीचा आणि आठ दरवाजे असलेला सिमेंट बंधारा सायंकाळी पाण्याने भरून गेला. ४०-४५ महिला, सोबत ५० हून अधिक पुरुष आणि ३५-४० लहान मुले यांच्यामुळे चाफेवाडीच्या पायथ्याशी असलेल्या नदीवर गर्दी दिसून येत होती. ग्रामस्थांनी दिवसभर तेथेच थांबून बंधाऱ्याच्या आठ दरवाजांमधील पाणी जाण्याच्या वाटा बंद करून टाकल्या. हे श्रमदान आदिवासी वाडीमधील तरुणवर्गाने दुंदा हिंदोळा, नीलेश मारुती खंडवी, लहू मालू खंडवी, योगेश खंडवी, पोलीस पाटील किसन सीताराम खंडवी, भाऊ हिंदोळा यांच्या पुढाकाराने यशस्वी झाला.   सिमेंट बंधाऱ्यात साचले १०-१२ फूट पाणी चाफेवाडीमधील आदिवासी कुटुंबांनी एकत्र येत केलेल्या श्रमदानामुळे जानेवारी महिन्यात कोरड्या पडणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यात किमान १०-१२ फूट पाणी साचून राहिले आहे. पाण्याची पातळी लक्षात घेता चाफेवाडी ग्रामस्थांना उन्हाळ्यात लवकर नदीमध्ये डवरे खोदण्याची वेळ येणार नाही.वाडीमधील महिलांना मार्च महिना सुरू झाला की कोरड्या पडणाऱ्या नदीत खड्डे खोदावे लागतात ही बाब लक्षात घेऊन आम्ही कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांना नदीमध्ये एक जागा दाखवली असून तेथे विहीर मंजूर करण्याची विनंती केली आहे. त्या ठिकाणी मे महिन्यात पाच फूट खोदले तरी पाणी असते.- दुंदा हिंदोळा, ग्रामस्थ