शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालयाची शतकोत्तरी वाटचाल

By admin | Updated: May 8, 2016 02:50 IST

भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला

- जयंत धुळप,  अलिबाग

भारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर तत्कालीन ब्रिटिश सरकारची बंदी होती आणि तसे कुणी केले तर तो राजद्रोहाचा गुन्हा मानला जात असे व संबंधित व्यक्तीही शिक्षेस पात्र ठरत असे. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील आगरी समाजाच्या शहाबाज गावात तत्कालीन आगरी युवकांनी विचार स्वातंत्र्य मिळवण्याच्या हेतूने ३ एप्रिल १९१६ रोजी सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करुन आपल्या स्तरावर ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलनाची मुहूर्तमेढच रोवली. तेच शहाबाज वाचनालय पारतंत्र्य ते स्वातंत्र्य अशा वाचन व विचार चळवळीचा तब्बल १०० वर्षांचा यशस्वी प्रवास यंदा पूर्ण करीत आहे. त्या निमित्ताने शनिवार ७ व रविवार ८ मे २०१६ रोजी याच वाचनालयाचा शतसांवत्सरिक महोत्सव संपन्न होत आहे.पारतंत्र्याच्या काळातील या वाचन चळवळीच्या जन्माची कहाणी मोठी रोचक आहे. शहाबाज गावामध्ये शिक्षणप्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने १८६५ मध्ये मराठी प्राथमिक शाळा सुरु झाली. जनता शिक्षित होऊ लागली. शिक्षणाचा प्रसार वाढू लागला होता. पारतंत्र्याचा काळ होता, सामूहिक वाचनाला बंदी होती. गावातील शिक्षित तरु णांना आपल्या बांधवांना शिक्षणाबरोबर चालू घडामोडी कळाव्यात असे वाटत होते. त्याच प्रेरणेतून १९१० मध्ये गावच्या भैरवनाथाच्या मंदिरात वाचन मंडळाची स्थापना झाली आणि तेथेच वाचन चळवळीचा श्रीगणेशा झाला. वृत्तपत्र वाचनबंदी कायद्याचा भंग करून वृत्तपत्राचे प्रथम वाचन करण्याचे धाडस कमळ पाटील या तत्कालीन विद्यार्थ्यांने केले. म्हणून कमळ पाटील यांना शहाबाज वाचन चळवळीचे जनक मानले जाते. भैरवनाथाच्या मंदिरात जागा अपुरी पडू लागली म्हणून काशी विश्वेश्वराच्या मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ३ एप्रिल १९१६ रोजी विठोबा राघोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वाचनालय शहाबाज संस्थेची स्थापना झाली. सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र काशिनाथ पाटील (आर. के. पाटील) यांच्या प्रयत्नाने वाचनालयाची ६ फेब्रुवारी १९२९ रोजी संस्था नोंदणीकृत करण्यात आली. शतसांवत्सरिक महोत्सवाचा शुभारंभभारत पारतंत्र्यात असताना वाचन, सामूहिक वाचन, अभिव्यक्ती, विचार या सर्व स्वातंत्र्यावर बंदी होती. त्या काळात शहाबाज गावामध्ये शिक्षणप्रेमी मंडळींच्या प्रयत्नाने १८६५ मध्ये मराठी प्राथमिक शाळा सुरू केली ही घटना १८५७ च्या बंडा इतकी किंबहुना त्यापेक्षाही अधिक मोठी व महत्त्वाची घटना आहे, असे प्रतिपादन ग्रंथाली वाचन चळवळीचे प्रणेते दिनकर गांगल यांनी शनिवारी केले आहे. शहाबाज सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालयाच्या स्थापनेस १०० वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ग्रथालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसांच्या शतसांवत्सरिक महोत्सवाचे उद्घाटन गांगल यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.