शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:42 IST

वादळग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच फटका दिला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे, बागा आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याचा आढावा केंद्रीय पथकाने गुरुवारी घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकामध्ये रमेशकुमार गंटा, आर.बी. कौल, एन.आर.एल.के. प्रसाद, एस.एस. मोदी, आर.पी. सिंग आणि तुषार व्यास यांचा समावेश होता. दौºयाच्या प्रारंभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली. पाहणी दौºयानंतर अलिबाग सोगाव येथील आउट पोस्ट हॉटेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहिची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

नुकसानभरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी चौधरी आणि मिश्रा यांना केल्या. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण यासंबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करून घ्यावीत, असेही सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाचे कौतुक

निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली. संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले; तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

टॅग्स :Raigadरायगड