शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
2
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
3
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
4
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
5
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
6
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
7
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
8
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
9
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
10
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
11
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
12
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
13
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
14
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
15
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
16
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
17
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
18
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
19
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 01:42 IST

वादळग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच फटका दिला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे, बागा आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याचा आढावा केंद्रीय पथकाने गुरुवारी घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकामध्ये रमेशकुमार गंटा, आर.बी. कौल, एन.आर.एल.के. प्रसाद, एस.एस. मोदी, आर.पी. सिंग आणि तुषार व्यास यांचा समावेश होता. दौºयाच्या प्रारंभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली. पाहणी दौºयानंतर अलिबाग सोगाव येथील आउट पोस्ट हॉटेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहिची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

नुकसानभरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी चौधरी आणि मिश्रा यांना केल्या. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण यासंबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करून घ्यावीत, असेही सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाचे कौतुक

निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली. संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले; तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

टॅग्स :Raigadरायगड