शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने घेतला मदतवाटपाचा आढावा; वादळग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:08 IST

जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्याला चांगलाच फटका दिला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घरे, बागा आणि विजेच्या खांबांचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीबाबत जिल्हा प्रशासनाने कोणती कार्यवाही केली याचा आढावा केंद्रीय पथकाने गुरुवारी घेतला. त्यांनी जिल्हाधिकारी यांना काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या.

केंद्र सरकारच्या आंतर मंत्रालयीन पथकामध्ये रमेशकुमार गंटा, आर.बी. कौल, एन.आर.एल.के. प्रसाद, एस.एस. मोदी, आर.पी. सिंग आणि तुषार व्यास यांचा समावेश होता. दौºयाच्या प्रारंभी या पथकाने अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आणि वरसोली या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून तेथील नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाकडून देण्यात आलेल्या मदतीबाबतची माहिती जाणून घेतली. पाहणी दौºयानंतर अलिबाग सोगाव येथील आउट पोस्ट हॉटेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी निधी चौधरी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे दोन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून केलेल्या कार्यवाहिची माहिती केंद्रीय पथकाला दिली.

नुकसानभरपाईपासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी चौधरी आणि मिश्रा यांना केल्या. कृषी विभाग, मत्स्य विभाग, महसूल विभाग, महावितरण यासंबंधित सर्व विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांनी जनतेच्या झालेल्या नुकसानीची तत्परतेने नोंद घेऊन आपली जी काही कामे असतील ती पूर्ण करून घ्यावीत, असेही सांगितले.

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, कार्यकारी अभियंता सा.बां. विभाग, अलिबाग आर.एस. मोरे, उपविभागीय अधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ तसेच रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाचे कौतुक

निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीमध्ये जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीमुळे अत्यंत कमी जीवितहानी झाली. संपर्क यंत्रणा अत्यंत कमी वेळात सुरू करण्यात यश मिळविले; तसेच वाहतुकीसाठी रस्ते अत्यंत कमी वेळात खुले करण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले. गरजूंना अत्यंत तातडीने अन्नधान्याचा पुरवठा करण्यात आला त्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष अभिनंदन केले.

टॅग्स :Raigadरायगड